शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

आजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:16 IST

आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचलावझरे, खोतवाडी, पेरणोलीसह भुदरगड सिमाभागाला धोका

आजरा :आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.भुदरगड व आजरा तालुक्याच्या सीमेलगत २५ ते ३० किलोमीटर लांबीचा व १ हजार फूट उंचीच्या जंगलाने व्यापलेला हा कडा आहे. कड्यावरच्या कांही अंतरावर मैदानी पठार आहे तर कांही भाग घनदाट झाडांनी व्यापला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या कड्याच्या इतिहासात कड्याला प्रथमच धोका निर्माण झाला आहे.१९८३ नंतर प्रथमच दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडीजवळील १ हजार फूट उंच असलेल्या कड्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पहिल्यांदाच या भेगा नागरिकांना दिसल्याने दोन्ही तालुक्यातील कड्याच्या क्षेत्रातील गावामध्ये भिती पसरली आहे.कड्याला आडव्या भेगा पडल्या आहेत. भेगा पाच ते सात किलोमीटर अंतरावर पडून कडा खचल्याने खोतवाडी, वझरे व नावलकरवाडी या वस्त्यांना प्राथमिक स्तरावर धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसापासून ग्रामस्थामध्ये घालमेल सुरू आहे. खोतवाडी येथून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर हा कडा आहे. कड्याच्या कांही अंतरावरच खोतवाडी, नालकरवाडी या वस्त्यासह वझरे गाव वसलेले आहे. कड्यावर मोठे दगड व झाडे आहेत.भेगा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने दगड, झाडे कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतात अशी परिस्थितीत तयार झाली झाली. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.या गावांना आहे धोकाआजरा तालुक्यातील खोतवाडी, वझरे, पेरणोलीपैकी नावलकरवाडी, हरपवडेपैकी धनगरवाडा तर भुदरगड तालुक्यातील मेघोली, मेघोलीपैकी धनगरवाडा, तळकरवाडी या वस्त्या व गावांना धोका पोहचू शकतो.----------------------------* प्रशासनाकडून दक्षतेची गरजतालुक्यात व जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे प्रशासनाचे या घटनेकडे लक्ष गेलेल नाही. दोन्ही तालुक्यातील सीमाभागातील गावांना सतर्कतेसाठी प्रशासनाने दक्ष राहून सतर्कतेचा आदेश देण्याची गरज आहे.----------------------------फोटो ओळी : आजरा तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडी येथील शिवबाची राई’ या कठड्या अशाप्रकारे भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कठ्यावरील माती व वृक्ष उन्मळून पडत असल्याने या परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.क्रमांक : १२०८२०१९-गड-०१/०२

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर