शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:16 IST

आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचलावझरे, खोतवाडी, पेरणोलीसह भुदरगड सिमाभागाला धोका

आजरा :आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.भुदरगड व आजरा तालुक्याच्या सीमेलगत २५ ते ३० किलोमीटर लांबीचा व १ हजार फूट उंचीच्या जंगलाने व्यापलेला हा कडा आहे. कड्यावरच्या कांही अंतरावर मैदानी पठार आहे तर कांही भाग घनदाट झाडांनी व्यापला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या कड्याच्या इतिहासात कड्याला प्रथमच धोका निर्माण झाला आहे.१९८३ नंतर प्रथमच दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडीजवळील १ हजार फूट उंच असलेल्या कड्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पहिल्यांदाच या भेगा नागरिकांना दिसल्याने दोन्ही तालुक्यातील कड्याच्या क्षेत्रातील गावामध्ये भिती पसरली आहे.कड्याला आडव्या भेगा पडल्या आहेत. भेगा पाच ते सात किलोमीटर अंतरावर पडून कडा खचल्याने खोतवाडी, वझरे व नावलकरवाडी या वस्त्यांना प्राथमिक स्तरावर धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसापासून ग्रामस्थामध्ये घालमेल सुरू आहे. खोतवाडी येथून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर हा कडा आहे. कड्याच्या कांही अंतरावरच खोतवाडी, नालकरवाडी या वस्त्यासह वझरे गाव वसलेले आहे. कड्यावर मोठे दगड व झाडे आहेत.भेगा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने दगड, झाडे कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतात अशी परिस्थितीत तयार झाली झाली. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.या गावांना आहे धोकाआजरा तालुक्यातील खोतवाडी, वझरे, पेरणोलीपैकी नावलकरवाडी, हरपवडेपैकी धनगरवाडा तर भुदरगड तालुक्यातील मेघोली, मेघोलीपैकी धनगरवाडा, तळकरवाडी या वस्त्या व गावांना धोका पोहचू शकतो.----------------------------* प्रशासनाकडून दक्षतेची गरजतालुक्यात व जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे प्रशासनाचे या घटनेकडे लक्ष गेलेल नाही. दोन्ही तालुक्यातील सीमाभागातील गावांना सतर्कतेसाठी प्रशासनाने दक्ष राहून सतर्कतेचा आदेश देण्याची गरज आहे.----------------------------फोटो ओळी : आजरा तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडी येथील शिवबाची राई’ या कठड्या अशाप्रकारे भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कठ्यावरील माती व वृक्ष उन्मळून पडत असल्याने या परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.क्रमांक : १२०८२०१९-गड-०१/०२

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर