शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Ganpati Festival : कोल्हापूरातील ६३ कुटूंबांचे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 15:13 IST

कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवाराकडून गतवर्षी घरगुती गणेश विसर्जन पर्यावरण पूरक करण्याचा अभिनव प्रयोग यावर्षी यशस्वी झाला.

ठळक मुद्देकोल्हापूरातील ६३ कुटूंबांचे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन यशस्वीवनौषधींचे वृक्षसंवर्धन : जमिनीकडून घेतले, जमिनीला दिले, निसर्ग मित्र संस्थेचा पुढाकार

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवाराकडून गतवर्षी घरगुती गणेश विसर्जन पर्यावरण पूरक करण्याचा अभिनव प्रयोग यावर्षी यशस्वी झाला.संस्थेने सुमारे ६३ कुटुंबांना बेल, सीता अशोक, कुंकू फळ, शेंद्री, पारिजातक, अंकोल, हुंब, हनुमान फळ, म्हाळुंगे, सोनचाफा, हिरडा, बेहडा, आवळा, शमी, कदंब, भद्राक्ष, काटेसावर इत्यादी विविध प्रजातीच्या वनौषधी गतवर्षी गणेश विसर्जनावेळी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. या सर्व निसर्गप्रेमी भाविकांनी आपल्या आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना केली होती.गतवर्षी या कुटूंबांनी घरच्या गणेश मूर्तीचे आपल्या घराच्या परिसरात, अंगणातच, टप, बादलीतील पाण्यात विसर्जन केले होते. दुसऱ्या दिवशी ही माती कुंडीत भरून त्यामध्ये निर्माल्यापासूनच तयार केलेले खत घालून संस्थेने दिलेल्या रोपांचे संवर्धन केले. यावर्षी ही सर्व कुंडीतील पूर्ण वाढ झालेली रोपे सर्व भाविकांनी संस्थेकडे परत केली. या संपूर्ण उपक्रमात अनिल चौगुले, पराग केमकर, अभय कोटणीस, कमलाकर आरेकर, प्रकाश आरेकर, अस्मिता चौगुले यांनी मेहनत घेतली.देवराईत वृक्षसंवर्धनसंस्थेने ही सर्व रोपे राधानगरी तालुक्यात कपिलेश्वर येथील स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून नव्याने आकारात येत असलेल्या एकविरा देवी देवराईत लागवडीसाठी देण्यात आली. येथील ग्रामपंचायतीच्यावतीने तातडीने वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करण्यात आले. त्यामुळे पर्यावरणपूरक सणउत्सव साजरे करण्याच्या निमित्ताने जमिनीकडून घेतले आणि जमिनीलाच परत दिले हे निसर्गचक्र पूर्ण केले.गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन कराकोरोनाचे संकट टाळण्यासाठी नदी, तलावांवर गर्दी न करता घरच्या घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने आपल्या गणेशाचे विसर्जन करून पर्यावरणाला व कोरोनाचे संकट टाळण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहेत.

यावर्षीही संस्थेमार्फत असा पर्यावरणपूरक उपक्रम नव्या संकल्पनेतून राबवला जाणार आहे. त्यामुळे सर्वच निसर्गप्रेमी भाविकांनी घरातच पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करून निसर्ग संवर्धनात हातभार लावावा. ज्या भाविकांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची स्थापना केली असेल त्यांनीदेखील अमोनियम बायकाबोर्नेटचा वापर करून गणेशमूर्ती घरच्या घरीच विसर्जित करावी.- अनिल चौगुले,कार्यवाह, निसर्गप्रेमी परिवार, कोल्हापूर.

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवenvironmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर