शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

कळंबा तलावास प्रदूषणाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:20 IST

अमर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कळंबा : १३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा एकेकाळी शहराचा तर सध्या कळंबा, पाचगावसह ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : १३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा एकेकाळी शहराचा तर सध्या कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत्र असणारा कळंबा तलाव ग्रामपंचायत प्रशासन व तलावाची निव्वळ मालकी मिरवणाऱ्या पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाढत्या प्रदूषणाने पाण्याचा रंग बदलला असून परिसरात पाण्याचा उग्र दर्प सुटला आहे.तलावातील पाण्याचा वापर जनावरे, गाड्या, कपडे धुणे व आंघोळीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. कात्यायनी टेकड्यांतून वाहणारे सात नैसर्गिक नाले हे तलावाचे मुख्य जलस्रोत. तलावाकाठी नागरी वस्ती वाढू नये म्हणून हे क्षेत्र ‘नो डेव्हलपमेंट व सायलेंट झोन’ घोषित केले होते पण याच पाणलोट क्षेत्रात बेकायदा नागरी वस्त्या वाढून त्यांचे प्रदूषित पाणी तलावात येत आहे.पालिका मालकीच्या कळंबा तलावाच्या हद्दीतील वीस एकर क्षेत्रांत शेतकºयांनी अतिक्रमण करत रासायनिक शेती सुरू केली आहे. शेतीतील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात जमिनीत झिरपून तलावात मिसळत आहे. तलावातील नैसर्गिक पाणी विषारी होत असतानाही लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. १३६ वर्षांत दोन वर्षांपूर्वी तलाव कोरडा पडला व जैवविविधता संपुष्टात आली. नव्याने निर्माण करण्यासाठी प्रयत्न न झाल्याने पाणी प्रदूषणात भर पडली आहेराजर्षी शाहू महाराजांच्या आॅपरेटिंग झू ट्रस्टने कुळांना कसायला दिलेल्या कात्यायनी पार्कातील जमिनीवर आज बेकायदा नागरी वस्त्या निर्माण झाल्या असून येथे शौचालये नसल्याने नैसर्गिक ओढ्यांचा वापर शौचालयासाठी केला जातो. हे मैलामिश्रीत पाणी थेट तलावात मिसळते. तलाव परिसर मद्यपि व खवय्ये लोकांच्या जेवणावळीचा अड्डा बनलाय. त्याचा घनकचरा तलावात टाकला जातो. तलाव परिसरास हॉटेलचा विळखा बसला असून त्याचाही कचरा तलाव परिसरात पसरला आहे. तलावात निर्माल्य बिनदिक्कत फेकले जात आहे. परिणामी पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढून विषारी जलपर्णी फोफावत आहेत. वाढत्या प्रदूषणाने मध्यंतरी कित्येक मासे मेले होते. तर गळतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने तलावातील पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे आज तलावातून पाणीपुरवठा केंद्रात येणारे पाणी प्रचंड प्रदूषित असल्याने शुद्धिकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागतो तरीही पाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेतच. तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आता पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्तरित्या प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे.तलाव प्रदूषणमुक्त राहावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी तलाव काठावरील बालिंगा गाव अन्यत्र वसवले. पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी पाण्यास हात न लावता बादलीने घ्या, असा त्यांचा आदेश होता.