शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

कळंबा तलावास प्रदूषणाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:20 IST

अमर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कळंबा : १३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा एकेकाळी शहराचा तर सध्या कळंबा, पाचगावसह ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : १३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा एकेकाळी शहराचा तर सध्या कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत्र असणारा कळंबा तलाव ग्रामपंचायत प्रशासन व तलावाची निव्वळ मालकी मिरवणाऱ्या पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाढत्या प्रदूषणाने पाण्याचा रंग बदलला असून परिसरात पाण्याचा उग्र दर्प सुटला आहे.तलावातील पाण्याचा वापर जनावरे, गाड्या, कपडे धुणे व आंघोळीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. कात्यायनी टेकड्यांतून वाहणारे सात नैसर्गिक नाले हे तलावाचे मुख्य जलस्रोत. तलावाकाठी नागरी वस्ती वाढू नये म्हणून हे क्षेत्र ‘नो डेव्हलपमेंट व सायलेंट झोन’ घोषित केले होते पण याच पाणलोट क्षेत्रात बेकायदा नागरी वस्त्या वाढून त्यांचे प्रदूषित पाणी तलावात येत आहे.पालिका मालकीच्या कळंबा तलावाच्या हद्दीतील वीस एकर क्षेत्रांत शेतकºयांनी अतिक्रमण करत रासायनिक शेती सुरू केली आहे. शेतीतील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात जमिनीत झिरपून तलावात मिसळत आहे. तलावातील नैसर्गिक पाणी विषारी होत असतानाही लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. १३६ वर्षांत दोन वर्षांपूर्वी तलाव कोरडा पडला व जैवविविधता संपुष्टात आली. नव्याने निर्माण करण्यासाठी प्रयत्न न झाल्याने पाणी प्रदूषणात भर पडली आहेराजर्षी शाहू महाराजांच्या आॅपरेटिंग झू ट्रस्टने कुळांना कसायला दिलेल्या कात्यायनी पार्कातील जमिनीवर आज बेकायदा नागरी वस्त्या निर्माण झाल्या असून येथे शौचालये नसल्याने नैसर्गिक ओढ्यांचा वापर शौचालयासाठी केला जातो. हे मैलामिश्रीत पाणी थेट तलावात मिसळते. तलाव परिसर मद्यपि व खवय्ये लोकांच्या जेवणावळीचा अड्डा बनलाय. त्याचा घनकचरा तलावात टाकला जातो. तलाव परिसरास हॉटेलचा विळखा बसला असून त्याचाही कचरा तलाव परिसरात पसरला आहे. तलावात निर्माल्य बिनदिक्कत फेकले जात आहे. परिणामी पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढून विषारी जलपर्णी फोफावत आहेत. वाढत्या प्रदूषणाने मध्यंतरी कित्येक मासे मेले होते. तर गळतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने तलावातील पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे आज तलावातून पाणीपुरवठा केंद्रात येणारे पाणी प्रचंड प्रदूषित असल्याने शुद्धिकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागतो तरीही पाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेतच. तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आता पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्तरित्या प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे.तलाव प्रदूषणमुक्त राहावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी तलाव काठावरील बालिंगा गाव अन्यत्र वसवले. पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी पाण्यास हात न लावता बादलीने घ्या, असा त्यांचा आदेश होता.