शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘दत्त-आसुर्ले’ प्रवर्तक मंडळ वादात अडकणार

By admin | Updated: March 18, 2017 01:08 IST

मुदत संपल्याने कायदेशीर गुंता : जिल्हा बॅँकेसमोरील अडचणी वाढणार

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखाना सोसायटीवरील (दालमिया शुगर्स) प्रवर्तक मंडळ वादात अडकण्याची शक्यता आहे. कारखान्यावर अवसायक मंडळाची नेमणूक करून १0 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने कायदेशीररीत्या असा निर्णय घेता येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. ‘दालमिया’ने जिल्हा बॅँकेकडून कारखाना घेतल्याने सरकारच्या या भूमिकेने बॅँकेसमोरीलही अडचणी वाढणार, हे मात्र निश्चित आहे. निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतल्याने संपूर्ण जिल्ह्णात खळबळ उडाली. मुळात कायदा काय सांगतो, सरकारला अधिकार आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. सहकार कायदा कलम १८ नुसार सार्वजनिक हित अथवा सदस्यांच्या हिताच्यादृष्टीने एकत्रीकरण, विभागणी व पुनर्रचना करण्यास निर्देश देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. या कलमाचा आधार घेऊनच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘दत्त’च्या प्रवर्तक मंडळाची नेमणूक केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘दालमिया’ न्यायालयात जाणार हे निश्चित आहे. ‘दालमिया’ने जिल्हा बॅँकेने निश्चित केलेल्या निर्धारित मूल्यापेक्षा अधिक रक्कम देऊन कारखाना घेतला. बॅँकेने १०६ कोटी निर्धारित मूल्य जाहीर केले होते. त्यामध्ये दोन कोटींची वाढ करून १०८ कोटीला कारखाना खरेदी केला. सरकारने प्रवर्तक मंडळ नेमल्याने ‘दालमिया’ कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार हे निश्चित असून आहे. (प्रतिनिधी)कायदा काय सांगतोसहकार कलम १०९ नुसार अवसायक मंडळाची मुदत संपताच आपोआपच संबंधित संस्थेची नोंदणी रद्द होते. कलम १०३(२) नुसार अवसायक मंडळाची मुदत वाढविता येते. सहा वर्षांच्या आत मंडळाची मुदत संपली पाहिजे; पण निबंधकांना वाटले तर ते जास्तीत जास्त आणखी चार वर्षे मुदत वाढ देऊ शकतात. म्हणजेच अवसायक मंडळाच्या नेमणुकीपासून दहा वर्षे मुदत राहू शकते. ‘दत्त’वर १६ सप्टेंबर २००६ ला अवसायक मंडळाची नेमणूक केली. त्यामुळे दहा वर्षे सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. कोण आहेत अवसायक मंडळात सचिन रावल (प्रादेशिक साखर सहसंचालक, कोल्हापूर) व डी. बी. पाटील (लेखापरीक्षक-साखर).‘दत्त’बाबत डझनभर तक्रारी : ‘दत्त’ कारखान्याचे कर्मचारी, सभासद, दालमिया शुगर्स यांसह विविध बाबतीत न्यायालयात डझनभर तक्रारी दाखल आहेत. त्यात या निर्णयाने आणखी गुंता वाढला असून, न्यायालयीन पातळीवर आणखी भर पडणार आहे. सरकारच्या मान्यतेनेच व्यवहार‘दालमिया’ने शासकीय येणे-देणे निश्चित करून, लिलावात सर्वोच्च बोलीने सरकारचा अभिप्राय घेऊन कारखाना खरेदी केला. सरकारच्या मान्यतेने व्यवहार झाला असताना पुन्हा सरकारच दुहेरी भूमिका कसे घेते, अशी विचारणा होऊ लागली आहे.