शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

‘दत्त-आसुर्ले’ प्रवर्तक मंडळ वादात अडकणार

By admin | Updated: March 18, 2017 01:08 IST

मुदत संपल्याने कायदेशीर गुंता : जिल्हा बॅँकेसमोरील अडचणी वाढणार

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखाना सोसायटीवरील (दालमिया शुगर्स) प्रवर्तक मंडळ वादात अडकण्याची शक्यता आहे. कारखान्यावर अवसायक मंडळाची नेमणूक करून १0 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने कायदेशीररीत्या असा निर्णय घेता येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. ‘दालमिया’ने जिल्हा बॅँकेकडून कारखाना घेतल्याने सरकारच्या या भूमिकेने बॅँकेसमोरीलही अडचणी वाढणार, हे मात्र निश्चित आहे. निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतल्याने संपूर्ण जिल्ह्णात खळबळ उडाली. मुळात कायदा काय सांगतो, सरकारला अधिकार आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. सहकार कायदा कलम १८ नुसार सार्वजनिक हित अथवा सदस्यांच्या हिताच्यादृष्टीने एकत्रीकरण, विभागणी व पुनर्रचना करण्यास निर्देश देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. या कलमाचा आधार घेऊनच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘दत्त’च्या प्रवर्तक मंडळाची नेमणूक केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘दालमिया’ न्यायालयात जाणार हे निश्चित आहे. ‘दालमिया’ने जिल्हा बॅँकेने निश्चित केलेल्या निर्धारित मूल्यापेक्षा अधिक रक्कम देऊन कारखाना घेतला. बॅँकेने १०६ कोटी निर्धारित मूल्य जाहीर केले होते. त्यामध्ये दोन कोटींची वाढ करून १०८ कोटीला कारखाना खरेदी केला. सरकारने प्रवर्तक मंडळ नेमल्याने ‘दालमिया’ कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार हे निश्चित असून आहे. (प्रतिनिधी)कायदा काय सांगतोसहकार कलम १०९ नुसार अवसायक मंडळाची मुदत संपताच आपोआपच संबंधित संस्थेची नोंदणी रद्द होते. कलम १०३(२) नुसार अवसायक मंडळाची मुदत वाढविता येते. सहा वर्षांच्या आत मंडळाची मुदत संपली पाहिजे; पण निबंधकांना वाटले तर ते जास्तीत जास्त आणखी चार वर्षे मुदत वाढ देऊ शकतात. म्हणजेच अवसायक मंडळाच्या नेमणुकीपासून दहा वर्षे मुदत राहू शकते. ‘दत्त’वर १६ सप्टेंबर २००६ ला अवसायक मंडळाची नेमणूक केली. त्यामुळे दहा वर्षे सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. कोण आहेत अवसायक मंडळात सचिन रावल (प्रादेशिक साखर सहसंचालक, कोल्हापूर) व डी. बी. पाटील (लेखापरीक्षक-साखर).‘दत्त’बाबत डझनभर तक्रारी : ‘दत्त’ कारखान्याचे कर्मचारी, सभासद, दालमिया शुगर्स यांसह विविध बाबतीत न्यायालयात डझनभर तक्रारी दाखल आहेत. त्यात या निर्णयाने आणखी गुंता वाढला असून, न्यायालयीन पातळीवर आणखी भर पडणार आहे. सरकारच्या मान्यतेनेच व्यवहार‘दालमिया’ने शासकीय येणे-देणे निश्चित करून, लिलावात सर्वोच्च बोलीने सरकारचा अभिप्राय घेऊन कारखाना खरेदी केला. सरकारच्या मान्यतेने व्यवहार झाला असताना पुन्हा सरकारच दुहेरी भूमिका कसे घेते, अशी विचारणा होऊ लागली आहे.