शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘दत्त-आसुर्ले’ प्रवर्तक मंडळ वादात अडकणार

By admin | Updated: March 18, 2017 01:08 IST

मुदत संपल्याने कायदेशीर गुंता : जिल्हा बॅँकेसमोरील अडचणी वाढणार

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखाना सोसायटीवरील (दालमिया शुगर्स) प्रवर्तक मंडळ वादात अडकण्याची शक्यता आहे. कारखान्यावर अवसायक मंडळाची नेमणूक करून १0 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने कायदेशीररीत्या असा निर्णय घेता येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. ‘दालमिया’ने जिल्हा बॅँकेकडून कारखाना घेतल्याने सरकारच्या या भूमिकेने बॅँकेसमोरीलही अडचणी वाढणार, हे मात्र निश्चित आहे. निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतल्याने संपूर्ण जिल्ह्णात खळबळ उडाली. मुळात कायदा काय सांगतो, सरकारला अधिकार आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. सहकार कायदा कलम १८ नुसार सार्वजनिक हित अथवा सदस्यांच्या हिताच्यादृष्टीने एकत्रीकरण, विभागणी व पुनर्रचना करण्यास निर्देश देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. या कलमाचा आधार घेऊनच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘दत्त’च्या प्रवर्तक मंडळाची नेमणूक केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘दालमिया’ न्यायालयात जाणार हे निश्चित आहे. ‘दालमिया’ने जिल्हा बॅँकेने निश्चित केलेल्या निर्धारित मूल्यापेक्षा अधिक रक्कम देऊन कारखाना घेतला. बॅँकेने १०६ कोटी निर्धारित मूल्य जाहीर केले होते. त्यामध्ये दोन कोटींची वाढ करून १०८ कोटीला कारखाना खरेदी केला. सरकारने प्रवर्तक मंडळ नेमल्याने ‘दालमिया’ कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार हे निश्चित असून आहे. (प्रतिनिधी)कायदा काय सांगतोसहकार कलम १०९ नुसार अवसायक मंडळाची मुदत संपताच आपोआपच संबंधित संस्थेची नोंदणी रद्द होते. कलम १०३(२) नुसार अवसायक मंडळाची मुदत वाढविता येते. सहा वर्षांच्या आत मंडळाची मुदत संपली पाहिजे; पण निबंधकांना वाटले तर ते जास्तीत जास्त आणखी चार वर्षे मुदत वाढ देऊ शकतात. म्हणजेच अवसायक मंडळाच्या नेमणुकीपासून दहा वर्षे मुदत राहू शकते. ‘दत्त’वर १६ सप्टेंबर २००६ ला अवसायक मंडळाची नेमणूक केली. त्यामुळे दहा वर्षे सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. कोण आहेत अवसायक मंडळात सचिन रावल (प्रादेशिक साखर सहसंचालक, कोल्हापूर) व डी. बी. पाटील (लेखापरीक्षक-साखर).‘दत्त’बाबत डझनभर तक्रारी : ‘दत्त’ कारखान्याचे कर्मचारी, सभासद, दालमिया शुगर्स यांसह विविध बाबतीत न्यायालयात डझनभर तक्रारी दाखल आहेत. त्यात या निर्णयाने आणखी गुंता वाढला असून, न्यायालयीन पातळीवर आणखी भर पडणार आहे. सरकारच्या मान्यतेनेच व्यवहार‘दालमिया’ने शासकीय येणे-देणे निश्चित करून, लिलावात सर्वोच्च बोलीने सरकारचा अभिप्राय घेऊन कारखाना खरेदी केला. सरकारच्या मान्यतेने व्यवहार झाला असताना पुन्हा सरकारच दुहेरी भूमिका कसे घेते, अशी विचारणा होऊ लागली आहे.