शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

दुर्गाताई पिसाळ कोल्हापूर विभागातील पहिल्या पदवीधर 'तृतीयपंथी विद्यार्थी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 11:26 IST

पिसाळ या समाजशास्त्र विषयातील प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापूर विभागातील पहिल्या तृतीयपंथी विद्यार्थी ठरल्या आहेत.

कोल्हापूर : ‘शिक्षणामुळे व्यक्तीला दर्जाची व संधीची समानता प्राप्त होते. तृतीयपंथीयांनी शिक्षणाच्या माध्यमातून अध्यात्माबरोबरच आर्थिक उन्नतीचे स्त्रोत निवडून भेद विरहित जीवन अंगीकारावे. शिक्षणच तृतीयपंथीयांना सन्मानाचे जगणे देईल, असे विचार आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मोहन गरगटे यांनी व्यक्त केले. ते महावीर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात दुर्गाताई रणजित पिसाळ या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या पदवी प्रदान समारंभप्रसंगी बोलत होते.

महावीर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात तृतीयपंथीयांना पदवी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापैकी पिसाळ या समाजशास्त्र विषयातील प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापूर विभागातील पहिल्या तृतीयपंथी विद्यार्थी ठरल्या आहेत.

यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात पिसाळ यांनी, मी व माझ्या समाजाने सहन केलेल्या वेदनांची प्रकर्षाने आठवण होते, यातून बाहेर पडण्याचा शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे. ही ज्ञानगंगा तृतीयपंथीयांच्या घरात पोहोचविण्यासाठी हे अभ्यासकेंद्र व विद्यापीठ अग्रेसर राहील याची खात्री आहे, असे प्रतिपादन केले. पोलीस दलात निवडीबद्दल बी. कॉम. विभागातील विद्यार्थिनी अश्विनी चौगले हिचा सत्कार केला.

केंद्रसंयोजक प्रा. डॉ. महादेव शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर केंद्र सहायक प्रा. बसवराज वस्त्रद यांनी आभार मानले. प्रा. विश्वास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, निमंत्रक व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर