शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष दिपांनी उजळला कोल्हापुरातील ’पंचगंगा ’ किनारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:37 IST

 पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.

ठळक मुद्देशिवमुद्रा फ्रेंडस् सर्कलने लावल्या ५१ हजार पणत्या भक्ती गीतांची साथ ; रांगोळीतून प्रबोधन

कोल्हापूर ,दि. ०४ :  पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.

जीवनातील संघर्षरूपी अंधकार दूर करून आपल्या प्रकाशाने मने उजळून टाकणाऱ्या ‘दिवाळी’ची सांगता झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये भल्या पहाटे अथवा दिवेलागणीच्या वेळी दिवे प्रज्वलित करून या प्रकाशोत्सवाची सांगता करण्यात येते. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा फें्रड्स सर्कलच्यावतीने ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.

नदीवरील सर्व घाट, ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, रावणेश्वर, कुणकेश्वर मंदिर, पिकनिक पॉइंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात केली. नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरांवर विविधरंगी प्रकाशझोत टाकण्यात आले होते.

या उत्सवाची सुरुवात दिप पुजनाने झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई , उद्योजक चंद्रकांत जाधव, सुनील पाटील, हर्ष कुलकर्णी, अमोल डांगे, अभिजीत साळोखे, डॉ. प्रविण कोडोलीकर, दिपक देसाई आदी उपस्थित होते.

या दीपोत्सवाच्या आयोजनात प्रविण डांगे, अक्षय मिठारी, अवधूत कोळी, रोहीत फराकटे, पृथ्वीराज निकम आदींनी परिश्रम केले. याकरीता अनेक रंगावलीकारांनी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून रांगोळी काढण्यास प्रारंभ केला होता. या अपूर्व सोहळ्याचा आनंद हजारो नागरिकांनी पहाटे साडेतीनपासून साडेसहा वाजेपर्यंत लुटला.

लक्षवेधी ठरल्या रांगोळ्यादिपोत्सवाबरोबरच पंचगंगा परिसरात प्रबोधनात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारीत ‘ नका घेऊ फाशी’ जग राहील उपाशी ’ असा संदेश देणारी रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरले. तर सेल्फीमुळे हौस की वेडेपणा यावरही ‘ माणसाने आपली माणुसकी दाखविण्याचा कहर ’ अशी विडबनात्मक रांगोळी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

‘ तुझ्यात जीव रंगला ’ या एका वाहीनीवर सुरु असलेल्या मालिकेतील ‘राणा दा गणेशाबरोबर कुस्ती करतानाची रांगोळी तर तरुणाईने मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी जणु स्पर्धाच लागली होती. रविवार पेठेतील सत्यनारायण तालीम मंडळाने पंचगंगा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी ‘ विष्णू आणि लक्ष्मी प्रकट ’ झाल्याचा देखावा चक्क नदीत उभा केला होता. ‘

मुलगी झाली म्हणून बाळगू नका भिती, गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती ’ अशा स्त्री भू्रण हत्या, देवदर्शन, आदी विषयांवरील रांगोळी काढून रंगावलीकार व मंडळांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता. यासह जुना बुधवार पेठेतील ‘ सोल्जर गु्रप ’ ने सोलर सिटीचा आराखडा मॉडेलच्या रुपाने सादर केला होता.

भक्ती गीतांनी दिपोत्सवाला चारचाँद लावले‘रसिकरंजन‘ तर्फे दिपोत्सव पहाट म्हणून भावगीत, भक्ती गीते सादर करण्यात आली. यामध्ये ‘व्यंकटेश स्त्रोत्र ’ ने वैदा सोनुले, वैदही जाधव यांनी सुरुवात केली. तर उत्तरोत्तर रंगलेल्या या भक्ती गीतांच्या मैफीत महेश सोनुले, स्वानंद जाधव, निखील मधाळे, विजय दावडे, यांनी अनेक भक्ती व भावगीते सादर करीत रसिकांना अक्षरश: न्हाऊन काढले. 

पार्किगकरिता स्वयंशिस्त हवीदिपोत्सव पाहण्यासाठी अक्षरश: शहर लोटत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मोठा निर्माण होत आहे. अनेक नागरीकांनी पंचगंगा तालीम मंडळ मार्ग, तोरस्कर चौक, शिवाजी पुल चौक या मार्गावर जागा दिसेल त्या ठिकाणी आपली वाहने वेडीवाकडी लावली होती. त्यामुळे अनेक वाहनधारकांना अर्धातासाहून अधिक काळ वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढच्या दिपोत्सवावेळी तरी नागरीकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे बनले आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी