शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष दिपांनी उजळला कोल्हापुरातील ’पंचगंगा ’ किनारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:37 IST

 पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.

ठळक मुद्देशिवमुद्रा फ्रेंडस् सर्कलने लावल्या ५१ हजार पणत्या भक्ती गीतांची साथ ; रांगोळीतून प्रबोधन

कोल्हापूर ,दि. ०४ :  पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.

जीवनातील संघर्षरूपी अंधकार दूर करून आपल्या प्रकाशाने मने उजळून टाकणाऱ्या ‘दिवाळी’ची सांगता झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये भल्या पहाटे अथवा दिवेलागणीच्या वेळी दिवे प्रज्वलित करून या प्रकाशोत्सवाची सांगता करण्यात येते. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा फें्रड्स सर्कलच्यावतीने ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.

नदीवरील सर्व घाट, ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, रावणेश्वर, कुणकेश्वर मंदिर, पिकनिक पॉइंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात केली. नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरांवर विविधरंगी प्रकाशझोत टाकण्यात आले होते.

या उत्सवाची सुरुवात दिप पुजनाने झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई , उद्योजक चंद्रकांत जाधव, सुनील पाटील, हर्ष कुलकर्णी, अमोल डांगे, अभिजीत साळोखे, डॉ. प्रविण कोडोलीकर, दिपक देसाई आदी उपस्थित होते.

या दीपोत्सवाच्या आयोजनात प्रविण डांगे, अक्षय मिठारी, अवधूत कोळी, रोहीत फराकटे, पृथ्वीराज निकम आदींनी परिश्रम केले. याकरीता अनेक रंगावलीकारांनी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून रांगोळी काढण्यास प्रारंभ केला होता. या अपूर्व सोहळ्याचा आनंद हजारो नागरिकांनी पहाटे साडेतीनपासून साडेसहा वाजेपर्यंत लुटला.

लक्षवेधी ठरल्या रांगोळ्यादिपोत्सवाबरोबरच पंचगंगा परिसरात प्रबोधनात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारीत ‘ नका घेऊ फाशी’ जग राहील उपाशी ’ असा संदेश देणारी रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरले. तर सेल्फीमुळे हौस की वेडेपणा यावरही ‘ माणसाने आपली माणुसकी दाखविण्याचा कहर ’ अशी विडबनात्मक रांगोळी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

‘ तुझ्यात जीव रंगला ’ या एका वाहीनीवर सुरु असलेल्या मालिकेतील ‘राणा दा गणेशाबरोबर कुस्ती करतानाची रांगोळी तर तरुणाईने मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी जणु स्पर्धाच लागली होती. रविवार पेठेतील सत्यनारायण तालीम मंडळाने पंचगंगा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी ‘ विष्णू आणि लक्ष्मी प्रकट ’ झाल्याचा देखावा चक्क नदीत उभा केला होता. ‘

मुलगी झाली म्हणून बाळगू नका भिती, गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती ’ अशा स्त्री भू्रण हत्या, देवदर्शन, आदी विषयांवरील रांगोळी काढून रंगावलीकार व मंडळांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता. यासह जुना बुधवार पेठेतील ‘ सोल्जर गु्रप ’ ने सोलर सिटीचा आराखडा मॉडेलच्या रुपाने सादर केला होता.

भक्ती गीतांनी दिपोत्सवाला चारचाँद लावले‘रसिकरंजन‘ तर्फे दिपोत्सव पहाट म्हणून भावगीत, भक्ती गीते सादर करण्यात आली. यामध्ये ‘व्यंकटेश स्त्रोत्र ’ ने वैदा सोनुले, वैदही जाधव यांनी सुरुवात केली. तर उत्तरोत्तर रंगलेल्या या भक्ती गीतांच्या मैफीत महेश सोनुले, स्वानंद जाधव, निखील मधाळे, विजय दावडे, यांनी अनेक भक्ती व भावगीते सादर करीत रसिकांना अक्षरश: न्हाऊन काढले. 

पार्किगकरिता स्वयंशिस्त हवीदिपोत्सव पाहण्यासाठी अक्षरश: शहर लोटत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मोठा निर्माण होत आहे. अनेक नागरीकांनी पंचगंगा तालीम मंडळ मार्ग, तोरस्कर चौक, शिवाजी पुल चौक या मार्गावर जागा दिसेल त्या ठिकाणी आपली वाहने वेडीवाकडी लावली होती. त्यामुळे अनेक वाहनधारकांना अर्धातासाहून अधिक काळ वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढच्या दिपोत्सवावेळी तरी नागरीकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे बनले आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी