शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष दिपांनी उजळला कोल्हापुरातील ’पंचगंगा ’ किनारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:37 IST

 पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.

ठळक मुद्देशिवमुद्रा फ्रेंडस् सर्कलने लावल्या ५१ हजार पणत्या भक्ती गीतांची साथ ; रांगोळीतून प्रबोधन

कोल्हापूर ,दि. ०४ :  पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांची सजावट, समाधी मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युत रोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने शनिवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला.

जीवनातील संघर्षरूपी अंधकार दूर करून आपल्या प्रकाशाने मने उजळून टाकणाऱ्या ‘दिवाळी’ची सांगता झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये भल्या पहाटे अथवा दिवेलागणीच्या वेळी दिवे प्रज्वलित करून या प्रकाशोत्सवाची सांगता करण्यात येते. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा फें्रड्स सर्कलच्यावतीने ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.

नदीवरील सर्व घाट, ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, रावणेश्वर, कुणकेश्वर मंदिर, पिकनिक पॉइंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात केली. नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरांवर विविधरंगी प्रकाशझोत टाकण्यात आले होते.

या उत्सवाची सुरुवात दिप पुजनाने झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई , उद्योजक चंद्रकांत जाधव, सुनील पाटील, हर्ष कुलकर्णी, अमोल डांगे, अभिजीत साळोखे, डॉ. प्रविण कोडोलीकर, दिपक देसाई आदी उपस्थित होते.

या दीपोत्सवाच्या आयोजनात प्रविण डांगे, अक्षय मिठारी, अवधूत कोळी, रोहीत फराकटे, पृथ्वीराज निकम आदींनी परिश्रम केले. याकरीता अनेक रंगावलीकारांनी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून रांगोळी काढण्यास प्रारंभ केला होता. या अपूर्व सोहळ्याचा आनंद हजारो नागरिकांनी पहाटे साडेतीनपासून साडेसहा वाजेपर्यंत लुटला.

लक्षवेधी ठरल्या रांगोळ्यादिपोत्सवाबरोबरच पंचगंगा परिसरात प्रबोधनात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारीत ‘ नका घेऊ फाशी’ जग राहील उपाशी ’ असा संदेश देणारी रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरले. तर सेल्फीमुळे हौस की वेडेपणा यावरही ‘ माणसाने आपली माणुसकी दाखविण्याचा कहर ’ अशी विडबनात्मक रांगोळी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

‘ तुझ्यात जीव रंगला ’ या एका वाहीनीवर सुरु असलेल्या मालिकेतील ‘राणा दा गणेशाबरोबर कुस्ती करतानाची रांगोळी तर तरुणाईने मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी जणु स्पर्धाच लागली होती. रविवार पेठेतील सत्यनारायण तालीम मंडळाने पंचगंगा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी ‘ विष्णू आणि लक्ष्मी प्रकट ’ झाल्याचा देखावा चक्क नदीत उभा केला होता. ‘

मुलगी झाली म्हणून बाळगू नका भिती, गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती ’ अशा स्त्री भू्रण हत्या, देवदर्शन, आदी विषयांवरील रांगोळी काढून रंगावलीकार व मंडळांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता. यासह जुना बुधवार पेठेतील ‘ सोल्जर गु्रप ’ ने सोलर सिटीचा आराखडा मॉडेलच्या रुपाने सादर केला होता.

भक्ती गीतांनी दिपोत्सवाला चारचाँद लावले‘रसिकरंजन‘ तर्फे दिपोत्सव पहाट म्हणून भावगीत, भक्ती गीते सादर करण्यात आली. यामध्ये ‘व्यंकटेश स्त्रोत्र ’ ने वैदा सोनुले, वैदही जाधव यांनी सुरुवात केली. तर उत्तरोत्तर रंगलेल्या या भक्ती गीतांच्या मैफीत महेश सोनुले, स्वानंद जाधव, निखील मधाळे, विजय दावडे, यांनी अनेक भक्ती व भावगीते सादर करीत रसिकांना अक्षरश: न्हाऊन काढले. 

पार्किगकरिता स्वयंशिस्त हवीदिपोत्सव पाहण्यासाठी अक्षरश: शहर लोटत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मोठा निर्माण होत आहे. अनेक नागरीकांनी पंचगंगा तालीम मंडळ मार्ग, तोरस्कर चौक, शिवाजी पुल चौक या मार्गावर जागा दिसेल त्या ठिकाणी आपली वाहने वेडीवाकडी लावली होती. त्यामुळे अनेक वाहनधारकांना अर्धातासाहून अधिक काळ वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढच्या दिपोत्सवावेळी तरी नागरीकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे बनले आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी