शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:19 IST

अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल

सदाशिव मोरेआजरा : घटनाबाह्य सरकार महानगरपालिका व जि.प.च्या निवडणुका काही तरी कारण दाखवून पुढे ढकलत आहे. सरकारने निवडणुका घेऊन दाखवाव्यात जनता त्यांची मूळ जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका पुढे ढकलणे ही लोकशाहीची शोकांतिका व संविधानाचा अपमान आहे. अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल अशी अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर व शिवसेनेच्या (ठाकरे गट)  नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. त्या पेद्रेवाडी (ता. आजरा)  येथे कार्यक्रमासाठी आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.शिवसेनेचे निवडणूक चिन्ह व पक्ष काढून घेतला असला तरी ज्यांनी काढून दिलाय ते निवडणूक आयोग अनधिकृत  असल्याचे न्यायालयाने सांगून चपराक मारली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला पक्ष व चिन्हाबाबतचा  निर्णयही आम्ही मानायला तयार नाही. घटनाबाह्य सरकारकडून सुरु असलेल्या धुळवडीला त्याचपद्धतीने उत्तर दिले जाईल. जनाधार गमाविल्यामुळे सरकारकडून  चिन्हाव्यतिरिक्त निवडणुका घेवून महानगरपालिका व जि.प.च्या निवडणूका पुढे ढकलत आहे. निवडणुका कितीही पुढे ढकला जनता तुम्हाला मूळ जागेवर आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही. तीन-तीन वर्षे प्रशासक ठेवल्यामुळे नागरिकांनी जायचे कुणाकडे असा सवाल करीत सरकारने योजनांची नुसती धुळवड उडवली आहे असाही आरोप केला. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय संविधान व लोकशाहीला धरून देईल असे अपेक्षा आहे. केदारी रेडेकर व शिवसेनेची नाळ जोडली आहे. वडिलांनी जे शिवसेनेत कमाविले आहे ते पुढे नेण्याची जबाबदारी युवा नेते अनिरुद्ध रेडेकर यांच्यावर आहे. ते ठाकरे शिवसेनेसोबत राहून कोल्हापूर व मुंबईत शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील असेही पेडणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKishori Pednekarकिशोरी पेडणेकरElectionनिवडणूक