शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

गुऱ्हाळघर म्हणजे ‘लग्नाचा खर्च गोंधळावर’, गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:38 IST

कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूत

राजाराम लोंढेकोल्हापूर : गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख आहे. मात्र अस्थिर दर, मजुरांची वानवा आणि इतर जिल्ह्यातील गुळाच्या अतिक्रमणामुळे येथील व्यवसाय अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या पटीत दर मिळत नाही, ‘गुऱ्हाळघर म्हणजे लग्नाचा खर्च गोंधळावर’ असाच प्रकार असल्याने यंदा अनेकांनी गुऱ्हाळघरे बंद ठेवली आहेत.‘कोल्हापुरी गुळाने साता समुद्रापार भुरळ पाडली आहे. येथे मोठ्या प्रमाणात गुळाची निर्मिती व्हायची, मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांत साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि शेतकरी त्याकडे वळला. काही तालुक्यांत गुऱ्हाळघरे तरीही तग धरून होती. मात्र उसाचा दर कायद्याच्या चाकोऱ्यात आला आणि शेतकऱ्यांना कारखान्याकडील पैशाची हमी मिळाली आणि गुऱ्हाळघरांच्या चिमण्या हळूहळू कमी होत गेल्या.गेल्या तीन-चार वर्षांत उसाचा दर सरासरी तीन हजारांपर्यंत राहिला. त्या तुलनेत गुळाला भाव मिळत नसल्याचा परिणाम गूळनिर्मितीवर दिसत आहे. कोल्हापूर बाजार समितीत तुलनात्मक पाहिले तर स्थानिक गुळाची आवक वर्षाला कमी होत चालली आहे. मात्र बाहेरील गुळाची आवक वाढत आहे.

कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूतजिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू आहे. त्यातून उसाची पळवापळवी होते, त्यात यंदा कारखान्यांचा ऊस दर सरासरी तीन हजार प्रतिटन असल्याने शेतकऱ्यांचा गुऱ्हाळघरांकडील ओढा कमी झाला आहे.

उत्पादन खर्च दुप्पट, दर तेवढाचगेल्या चार वर्षांत घाऊक बाजारात गुळाचा दर जवळपास स्थिर राहिला आहे. दर प्रतिक्विंटल ३२०० ते ४४९० रुपयांपर्यंत राहिला आहे. मात्र गुळाचा उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने हा व्यवसाय खऱ्या अर्थाने आतबट्ट्यात आला आहे.

तुलनात्मक कोल्हापूर बाजार समितीतील गुळाचा दर, प्रतिक्विंटलवर्ष     - आवक रवे  - किमान   - कमाल दर२०२०  - १७,२४२   - ३१०९   -  ४४९०२०२१ - १८,४१५   -   ३२०५   - ४३७०२०२२ - २०,२३०   -  २७००    - ४३२०२०२३ - १७,१७०  -  ३५००     - ४१९०

गुळाचा कमाल दर ४ हजारांच्या वर दिसतो, मात्र तो किती शेतकऱ्यांना मिळतो, हेही महत्त्वाचे आहे. सरासरी ३५०० रुपये दर मिळतो, त्यातच गूळ व्यवसायाबाबत शासन उदासीन असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. - शिवाजी पाटील (गूळ उत्पादक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर