शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

गुऱ्हाळघर म्हणजे ‘लग्नाचा खर्च गोंधळावर’, गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:38 IST

कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूत

राजाराम लोंढेकोल्हापूर : गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख आहे. मात्र अस्थिर दर, मजुरांची वानवा आणि इतर जिल्ह्यातील गुळाच्या अतिक्रमणामुळे येथील व्यवसाय अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या पटीत दर मिळत नाही, ‘गुऱ्हाळघर म्हणजे लग्नाचा खर्च गोंधळावर’ असाच प्रकार असल्याने यंदा अनेकांनी गुऱ्हाळघरे बंद ठेवली आहेत.‘कोल्हापुरी गुळाने साता समुद्रापार भुरळ पाडली आहे. येथे मोठ्या प्रमाणात गुळाची निर्मिती व्हायची, मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांत साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि शेतकरी त्याकडे वळला. काही तालुक्यांत गुऱ्हाळघरे तरीही तग धरून होती. मात्र उसाचा दर कायद्याच्या चाकोऱ्यात आला आणि शेतकऱ्यांना कारखान्याकडील पैशाची हमी मिळाली आणि गुऱ्हाळघरांच्या चिमण्या हळूहळू कमी होत गेल्या.गेल्या तीन-चार वर्षांत उसाचा दर सरासरी तीन हजारांपर्यंत राहिला. त्या तुलनेत गुळाला भाव मिळत नसल्याचा परिणाम गूळनिर्मितीवर दिसत आहे. कोल्हापूर बाजार समितीत तुलनात्मक पाहिले तर स्थानिक गुळाची आवक वर्षाला कमी होत चालली आहे. मात्र बाहेरील गुळाची आवक वाढत आहे.

कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूतजिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू आहे. त्यातून उसाची पळवापळवी होते, त्यात यंदा कारखान्यांचा ऊस दर सरासरी तीन हजार प्रतिटन असल्याने शेतकऱ्यांचा गुऱ्हाळघरांकडील ओढा कमी झाला आहे.

उत्पादन खर्च दुप्पट, दर तेवढाचगेल्या चार वर्षांत घाऊक बाजारात गुळाचा दर जवळपास स्थिर राहिला आहे. दर प्रतिक्विंटल ३२०० ते ४४९० रुपयांपर्यंत राहिला आहे. मात्र गुळाचा उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने हा व्यवसाय खऱ्या अर्थाने आतबट्ट्यात आला आहे.

तुलनात्मक कोल्हापूर बाजार समितीतील गुळाचा दर, प्रतिक्विंटलवर्ष     - आवक रवे  - किमान   - कमाल दर२०२०  - १७,२४२   - ३१०९   -  ४४९०२०२१ - १८,४१५   -   ३२०५   - ४३७०२०२२ - २०,२३०   -  २७००    - ४३२०२०२३ - १७,१७०  -  ३५००     - ४१९०

गुळाचा कमाल दर ४ हजारांच्या वर दिसतो, मात्र तो किती शेतकऱ्यांना मिळतो, हेही महत्त्वाचे आहे. सरासरी ३५०० रुपये दर मिळतो, त्यातच गूळ व्यवसायाबाबत शासन उदासीन असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. - शिवाजी पाटील (गूळ उत्पादक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर