शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा

By admin | Updated: December 9, 2014 23:55 IST

सौंदर्य काळवंडले : तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज, पुन्हा जलपर्णीचा धोका

कोल्हापूर : शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाल्यातून मोठ्या प्रमाणात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याचा जीव पुन्हा एकदा गुदमरू लागला आहे. पाण्यावर हिवरट काळसर रंगाचा तवंग साचू लागल्याने रंकाळ्यातील जीवसृष्टीलाच धोका निर्माण होऊन तलावाला अवकळा आली आहे. याकडे गांभीर्याने पाहत वेळीच उपाययोजना न केल्यास पुन्हा रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरणही अशक्य असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.रंकाळ्यात मिसळणाऱ्या ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रीत सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा मनपाचा दावा आहे. मात्र, सव्वा चार कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाईन पूर्ण क्षमतेने सुरूच झाली नाही. पाईपमधील अडकलेल्या खरमातीमुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी पुन्हा मिसळत आहे. सांडपाणी व हवेतील उष्णतेमुळे रंकाळ्याला पुन्हा जलपर्णीचा धोक उद्भवणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला; पण गेली पाच वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईनचे काम रखडल्याने रंकाळ्याचे दुखणे वाढतच गेले. अद्याप सरनाईक कॉलनी नाल्यातील एक ते दीड एमएलडी सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे. त्यामुळे सांडपाण्यापासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. दूषित पाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तेलकट तवंग साचू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेल्या रंकाळा मरणासन्न झाला आहे.(प्रतिनिधी)महानगरपालिकेचे जुजबी प्रयत्न...रंकाळ्यात मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. महापालिकेने योजलेल्या या तकलादू प्रयत्नांमुळेच पाण्यावर तेलकट तवंग गोळा होऊ लागला आहे. पाण्याची दुर्गंधी सुटून जलपर्णीचा धोका वाढणार आहे. तसेच संरक्षक भिंत तीन ठिकाणी पडली आहे. पैसे व तंत्रज्ञानांचा अभाव अशा कारणांमुळे हे काम ही गेली दीड वर्षे रखडले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळ्यास बसत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.रंकाळ्यात साचलेला कचरा, प्रदूषणामुळे जीवसृष्टीची झालेली हानीकोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळ्याला अवकळा आली आहे. प्रदूषण, स्वच्छता, मजबुतीकरण, नैसर्गिक सौंदर्य, आदी सर्वच आघाडीवर प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष होत आहे. परिणामी वैभवशाली रंकाळ्याच्या दुखण्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. असीम सौंदर्याचं प्रतीक असलेला संध्यामठ अखेरची घटका मोजत आहे. थेट मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी निळे-काळे झाले आहे. धुणी-भांड्यासह म्हशी धुण्यामुळे प्रदूषणात वाढच होत आहे. मंगळवारी दुपारी रंकाळ्याची सद्य:स्थिती दर्शविणारी ही काही छायाचित्रे.