शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शहरात रस्त्यांची चाळण, मुरमाचे पॅचवर्क गेले वाहून, रस्ते चिखलाने माखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:12 IST

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपावसामुळे शहरात रस्त्यांची चाळण मुरमाचे पॅचवर्क गेले वाहून, रस्ते चिखलाने माखले

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारी, चॅनेल, छोटे, मोठे नाले साफ करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. धोकादायक इमारती उतरवून घेण्यावर जोर दिला; परंतु शहरातील प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यावर डांबरी पॅचवर्क करण्याकडे दुर्लक्ष केले. यंदा एप्रिल व मे महिन्यांत महानगरपालिका प्रशासनाने एकाही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही. शहरात ११८ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार असल्यामुळे पॅचवर्क केलेले रस्ते खराब होतील, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही; परंतु त्याचे परिणाम मात्र आता शहरवासीयांना भोगावे लागत आहेत.आयआरबी कंपनीने केलेले ४९ किलोमीटरचे रस्ते तसेच महानगरपालिका प्रशासनाने केलेले जोडरस्ते वगळता अन्य सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. आईसाहेब महाराज पुतळा ते बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, पाण्याचा खजिना ते संभाजीनगर हा शहरातील प्रमुख रस्ता अतिशय खराब झाला आहे.

शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेश ते रंकाळा चौपाटी हाही रस्ता पूर्ण उखडलेला आहे. गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनधारकांना कसरतच करावी लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेशन रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, लुगडी ओळ, इब्राहिम खाटीक चौक, महाराणा प्रताप चौक, सावित्रीबाई फुले चौक, आदी परिसरातील रस्त्यांची अवस्था तर फारच बिकट झालेली आहे. यापूर्वी इतकी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती.ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली चाळण, अनेक ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. शहराच्या अनेक भागांत त्यामुळे वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली. चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसून आली. या खड्डेमय रस्त्यातून दुचाकीस्वार व तीनचाकी रिक्षाचालक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर