शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पावसामुळे शहरात रस्त्यांची चाळण, मुरमाचे पॅचवर्क गेले वाहून, रस्ते चिखलाने माखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:12 IST

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपावसामुळे शहरात रस्त्यांची चाळण मुरमाचे पॅचवर्क गेले वाहून, रस्ते चिखलाने माखले

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारी, चॅनेल, छोटे, मोठे नाले साफ करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. धोकादायक इमारती उतरवून घेण्यावर जोर दिला; परंतु शहरातील प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यावर डांबरी पॅचवर्क करण्याकडे दुर्लक्ष केले. यंदा एप्रिल व मे महिन्यांत महानगरपालिका प्रशासनाने एकाही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही. शहरात ११८ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार असल्यामुळे पॅचवर्क केलेले रस्ते खराब होतील, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही; परंतु त्याचे परिणाम मात्र आता शहरवासीयांना भोगावे लागत आहेत.आयआरबी कंपनीने केलेले ४९ किलोमीटरचे रस्ते तसेच महानगरपालिका प्रशासनाने केलेले जोडरस्ते वगळता अन्य सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. आईसाहेब महाराज पुतळा ते बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, पाण्याचा खजिना ते संभाजीनगर हा शहरातील प्रमुख रस्ता अतिशय खराब झाला आहे.

शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेश ते रंकाळा चौपाटी हाही रस्ता पूर्ण उखडलेला आहे. गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनधारकांना कसरतच करावी लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेशन रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, लुगडी ओळ, इब्राहिम खाटीक चौक, महाराणा प्रताप चौक, सावित्रीबाई फुले चौक, आदी परिसरातील रस्त्यांची अवस्था तर फारच बिकट झालेली आहे. यापूर्वी इतकी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती.ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली चाळण, अनेक ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. शहराच्या अनेक भागांत त्यामुळे वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली. चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसून आली. या खड्डेमय रस्त्यातून दुचाकीस्वार व तीनचाकी रिक्षाचालक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर