शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

पावसामुळे शहरात रस्त्यांची चाळण, मुरमाचे पॅचवर्क गेले वाहून, रस्ते चिखलाने माखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:12 IST

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपावसामुळे शहरात रस्त्यांची चाळण मुरमाचे पॅचवर्क गेले वाहून, रस्ते चिखलाने माखले

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारी, चॅनेल, छोटे, मोठे नाले साफ करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. धोकादायक इमारती उतरवून घेण्यावर जोर दिला; परंतु शहरातील प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यावर डांबरी पॅचवर्क करण्याकडे दुर्लक्ष केले. यंदा एप्रिल व मे महिन्यांत महानगरपालिका प्रशासनाने एकाही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही. शहरात ११८ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात येणार असल्यामुळे पॅचवर्क केलेले रस्ते खराब होतील, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर डांबरी पॅचवर्क केले नाही; परंतु त्याचे परिणाम मात्र आता शहरवासीयांना भोगावे लागत आहेत.आयआरबी कंपनीने केलेले ४९ किलोमीटरचे रस्ते तसेच महानगरपालिका प्रशासनाने केलेले जोडरस्ते वगळता अन्य सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. आईसाहेब महाराज पुतळा ते बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, पाण्याचा खजिना ते संभाजीनगर हा शहरातील प्रमुख रस्ता अतिशय खराब झाला आहे.

शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेश ते रंकाळा चौपाटी हाही रस्ता पूर्ण उखडलेला आहे. गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनधारकांना कसरतच करावी लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, स्टेशन रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, लुगडी ओळ, इब्राहिम खाटीक चौक, महाराणा प्रताप चौक, सावित्रीबाई फुले चौक, आदी परिसरातील रस्त्यांची अवस्था तर फारच बिकट झालेली आहे. यापूर्वी इतकी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती.ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली चाळण, अनेक ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. शहराच्या अनेक भागांत त्यामुळे वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली. चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसून आली. या खड्डेमय रस्त्यातून दुचाकीस्वार व तीनचाकी रिक्षाचालक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर