शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

विद्यार्थ्यांअभावी बिघडलं ‘व्यवस्थापन’शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ९०० जागा रिक्त

By admin | Updated: August 9, 2014 00:30 IST

वाढलेली महाविद्यालये, घसरलेल्या गुणवत्तेचा बसला फटका

कोल्हापूर : वेतनाचे मिळणारे चांगले पॅकेज, मानमरातब, अधिकार मिळावेत आणि नामांकित उद्योग क्षेत्रांत काम करण्याच्या इच्छेतून व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमांकडे गेल्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. ते ‘कॅश’ करण्यासाठी महाविद्यालयांची संख्या वाढली. पण, त्या तुलनेत गुणवत्ता कायम राहिली नसल्याने विद्यार्थ्यांचा कल घटल्याने संबंधित महाविद्यालयांतील या अभ्यासक्रमाचे ‘व्यवस्थापन’ बिघडले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रांमध्ये सुमारे ९०० जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे.एमबीएची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ४४ हजार ५७८ जागांपैकी तब्बल १९ हजार ७१४ जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र, असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ एमबीए, एमएमएस इन्स्टिट्यूटतर्फे रिक्त जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली आहे. यातील सुमारे सहा हजार ५०० विद्यार्र्थी प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सुमारे १३ हजार जागा रिक्त राहणार आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २२ महाविद्यालये आहेत. यात कोल्हापूरमध्ये १०, सांगली ५ आणि सातारा जिल्ह्यात ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांतील प्रथम आणि द्वितीय वर्षांची एकत्रित विद्यार्थी प्रवेश क्षमता सुमारे ४ हजार आहे. त्यापैकी २०१३-१४ मध्ये २ हजार ७३५ विद्यार्थी प्रवेशित झाले असून, २ हजार २६५ जागा रिक्त राहिल्या. यावर्षी विद्यापीठातील एमबीए अधिविभागाच्या ६० जागांमधील अवघे २४ प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित जागांसाठी दोनवेळा ‘सीईटी’घेऊनदेखील त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ९०० जागा रिक्त राहतील, असा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. गुणवत्ता घसरल्याचा हा परिणाम आहे. (प्रतिनिधी)