शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

विद्यार्थ्यांअभावी बिघडलं ‘व्यवस्थापन’शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ९०० जागा रिक्त

By admin | Updated: August 9, 2014 00:30 IST

वाढलेली महाविद्यालये, घसरलेल्या गुणवत्तेचा बसला फटका

कोल्हापूर : वेतनाचे मिळणारे चांगले पॅकेज, मानमरातब, अधिकार मिळावेत आणि नामांकित उद्योग क्षेत्रांत काम करण्याच्या इच्छेतून व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमांकडे गेल्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. ते ‘कॅश’ करण्यासाठी महाविद्यालयांची संख्या वाढली. पण, त्या तुलनेत गुणवत्ता कायम राहिली नसल्याने विद्यार्थ्यांचा कल घटल्याने संबंधित महाविद्यालयांतील या अभ्यासक्रमाचे ‘व्यवस्थापन’ बिघडले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रांमध्ये सुमारे ९०० जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे.एमबीएची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ४४ हजार ५७८ जागांपैकी तब्बल १९ हजार ७१४ जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र, असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ एमबीए, एमएमएस इन्स्टिट्यूटतर्फे रिक्त जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली आहे. यातील सुमारे सहा हजार ५०० विद्यार्र्थी प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सुमारे १३ हजार जागा रिक्त राहणार आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २२ महाविद्यालये आहेत. यात कोल्हापूरमध्ये १०, सांगली ५ आणि सातारा जिल्ह्यात ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांतील प्रथम आणि द्वितीय वर्षांची एकत्रित विद्यार्थी प्रवेश क्षमता सुमारे ४ हजार आहे. त्यापैकी २०१३-१४ मध्ये २ हजार ७३५ विद्यार्थी प्रवेशित झाले असून, २ हजार २६५ जागा रिक्त राहिल्या. यावर्षी विद्यापीठातील एमबीए अधिविभागाच्या ६० जागांमधील अवघे २४ प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित जागांसाठी दोनवेळा ‘सीईटी’घेऊनदेखील त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ९०० जागा रिक्त राहतील, असा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. गुणवत्ता घसरल्याचा हा परिणाम आहे. (प्रतिनिधी)