शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांअभावी बिघडलं ‘व्यवस्थापन’शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ९०० जागा रिक्त

By admin | Updated: August 9, 2014 00:30 IST

वाढलेली महाविद्यालये, घसरलेल्या गुणवत्तेचा बसला फटका

कोल्हापूर : वेतनाचे मिळणारे चांगले पॅकेज, मानमरातब, अधिकार मिळावेत आणि नामांकित उद्योग क्षेत्रांत काम करण्याच्या इच्छेतून व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमांकडे गेल्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. ते ‘कॅश’ करण्यासाठी महाविद्यालयांची संख्या वाढली. पण, त्या तुलनेत गुणवत्ता कायम राहिली नसल्याने विद्यार्थ्यांचा कल घटल्याने संबंधित महाविद्यालयांतील या अभ्यासक्रमाचे ‘व्यवस्थापन’ बिघडले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रांमध्ये सुमारे ९०० जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे.एमबीएची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ४४ हजार ५७८ जागांपैकी तब्बल १९ हजार ७१४ जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र, असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ एमबीए, एमएमएस इन्स्टिट्यूटतर्फे रिक्त जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली आहे. यातील सुमारे सहा हजार ५०० विद्यार्र्थी प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सुमारे १३ हजार जागा रिक्त राहणार आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २२ महाविद्यालये आहेत. यात कोल्हापूरमध्ये १०, सांगली ५ आणि सातारा जिल्ह्यात ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांतील प्रथम आणि द्वितीय वर्षांची एकत्रित विद्यार्थी प्रवेश क्षमता सुमारे ४ हजार आहे. त्यापैकी २०१३-१४ मध्ये २ हजार ७३५ विद्यार्थी प्रवेशित झाले असून, २ हजार २६५ जागा रिक्त राहिल्या. यावर्षी विद्यापीठातील एमबीए अधिविभागाच्या ६० जागांमधील अवघे २४ प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित जागांसाठी दोनवेळा ‘सीईटी’घेऊनदेखील त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ९०० जागा रिक्त राहतील, असा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. गुणवत्ता घसरल्याचा हा परिणाम आहे. (प्रतिनिधी)