शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नियमनमुक्तीमुळे बाजार समितींना बाधा नाही

By admin | Updated: July 11, 2016 01:26 IST

सदाभाऊ खोत : व्यापाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही

सांगली : देशभरात सर्वच क्षेत्रांत खुली बाजारपेठ व्यवस्था स्वीकारली जात असताना, शेतकऱ्यांसाठी अशी व्यवस्था का असू नये, या विचारातूनच नियमनमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने बाजार समित्यांना बाधा पोहोचणार नाही. त्यामुळे बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. अशा आंदोलनाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. खोत पुढे म्हणाले की, देशातील सर्वच उद्योग क्षेत्रांत खुली बाजार व्यवस्था अस्तित्वात येत आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीच्या बेड्यांमध्ये शेतकऱ्यांनाही आपल्या शेतीमालासाठी खुली व्यवस्था असावी, या हेतूने नियमनमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जुनाच असून, २००७ ला यावर चर्चा झाल्यानंतर देशातील २५ राज्यांनी तो स्वीकारला आहे. शेतकऱ्यांना जर जादा नफा मिळणार असेल, तर या धोरणाला कोणीच विरोध करायला नको. यावर विचार करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली होती. यात माझ्यासह बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी, हमाल, मापाडी प्रतिनिधींचा समावेश असल्याने हा निर्णय एकतर्फी घेतलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या आंदोलनावर ते म्हणाले, व्यापारी व शेतकऱ्यांचे संबंध जुने असल्यामुळे बहुतांश माल शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडेच येणार आहे. व्यापाऱ्यांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत व्यापाऱ्यांनी भीती व्यक्त केली असल्याने व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीच स्वागत करतो. दोघांचेही नुकसान होणार नाही याची खात्री असून, व्यापाऱ्यांना बाहेर माल घेता येणार आहे. विक्री न झालेला शेतीमाल बाजार समितीतच येणार असल्याने ही भीती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) चार टक्के ‘एफआरपी’चा प्रश्न सोडवू... राज्यात आजपर्यंत ९६ टक्के ‘एफआरपी’प्रमाणे रक्कम दिली गेली आहे. हे देशात आणि राज्यात सरकार बदलल्याचा चांगला परिणाम आहे. कारखान्यांच्या अडचणींमुळे चार टक्के ‘एफआरपी’ राहिली असली तरी केंद्राकडून येणारे टनाला ४५ रुपयांचे अनुदान आले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविणे आवाक्याबाहेरचे वाटत नसून, सर्वांना विचारात घेऊन या प्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी ‘नाही रे’ वर्गाचाच प्रतिनिधी शेतकरी संघटनेचा महायुतीतील सहभाग हा बळिराजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच झाला आहे. ज्या चळवळीच्या जोरावर हे पद मिळाले, त्याला कधीही विसरणार नसून, सर्वसामान्य मातीतील ‘नाही रे’वर्गाचा प्रतिनिधी म्हणूनच मी काम करत राहणार आहे. माझ्या पदाचा उपयोग या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चार दिवस सुखाचे आणण्यासाठी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.