शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

आजऱ्यात दुष्काळाचे सावट; अधिकाऱ्यांना मात्र ना खंत, ना खेद

By admin | Updated: October 18, 2015 23:41 IST

आजरा तालुका : पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याची टंचाई आतापासूनच

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा  गेल्या ५० वर्षांत प्रथमच आजरा तालुकावासीयांना दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागणार असून, अधिकारी वर्गाकडे पाणीप्रश्नाची माहिती नाही , तसेच तालुक्यातील गावनिहाय पाणीस्थितीही माहिती नाही, अशी परिस्थिती असल्याने अधिकाऱ्यांना दुष्काळाबाबत ना खंत, ना खेद, अशीच परिस्थिती दिसत आहे.दुष्काळसदृश्य परिस्थिती, वन्यप्राण्यांचा त्रास यामुळे आजरा तालुक्यातील शेतकरी त्रासून गेला आहे. मुळातच सरासरी पावसापेक्षा पन्नास टक्केही पाऊस न झाल्याने भूजल पातळी खालावत चालल्याने मार्चनंतर उद्भवणारी पाणीटंचाई डिसेंबर, जानेवारी महिन्यांतच जाणवणार हे स्पष्ट आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना व शेतीला लागणाऱ्या पाण्याची टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे.तालुक्यात पाणी साठवण्याच्या नावावर झालेली अशासकीय कामे तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे. मग ती पाझर तलावांची असोत, बंधाऱ्याच्या डागडुजीची असोत, अथवा माती आणि सिमेंट बंधाऱ्यांची असोत. हे सर्व केले कशासाठी आणि नेमके पाणी साठणार किती हे सांगण्याच्या आधीच यावर्षी ते स्पष्टपणे दिसणार आहे.अनेक पाझर तलाव भ्रष्टाचारमुक्त म्हणून नावालाच राहिले आहेत. माती आणि सिमेंटच्या बंधाऱ्याबाबत न बोललेले बरे. ठिकठिकाणच्या बंधारे दुरुस्तीच्या नावावर करोडो रुपये गेले कुठे? या प्रश्नाचे उत्तरही तालुकावासीयांना यावर्षी मिळणार आहे. ते अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी देण्याची गरजच भासणार नाही.पाणी उपसाबंदीची तलवार शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे. चिकोत्रा प्रकल्प कार्यक्षेत्रात येणारा ऊस पाणीटंचाईमुळे लवकर उचल करण्यासंदर्भात साखर कारखान्यांना शासकीय पातळीवरून सूचना करण्यात आल्या आहेत, परंतु पाण्याअभावी यावर्षी ऊस क्षेत्रात घट होणार असल्याचे चित्रही पुढे येत आहे. सद्य:स्थितीला तातडीने पाण्याचा साठा करणे आवश्यक आहे; पण कोल्हापूर पद्धतीच्या अनेक बंधाऱ्यांना बरगेच नाहीत अशी परिस्थिती आहे.पाणी, वीज, कृषी आणि आरोग्य या प्रमुख विभागांवर या परिस्थितीशी सामना करण्यासाठी नियोजनात पुढाकार घेण्याची गरज आहे, परंतु जलसंधारणसह बहुतांशी विभाग बेफिकीरपणे वागत असल्याने व अशीच परिस्थिती राहिल्यास पाणीस्थिती गंभीर होणार हे निश्चित.दुष्काळ जाहीर नाही, निधीही नाही..महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला असला तरी कोल्हापूर जिल्ह्याचा त्यात समावेश नाही. त्यामुळे कोणताही निधी जाहीर नाही. पाणीटंचाईचे यापूर्वी पाठविलेले प्रस्तावही मंजूर नाहीत. त्यामुळे केवळ नुकसानीचे पंचनामे करणे व उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे एवढेच काम होऊ शकते.