शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात दुष्काळाचे सावट; अधिकाऱ्यांना मात्र ना खंत, ना खेद

By admin | Updated: October 18, 2015 23:41 IST

आजरा तालुका : पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याची टंचाई आतापासूनच

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा  गेल्या ५० वर्षांत प्रथमच आजरा तालुकावासीयांना दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागणार असून, अधिकारी वर्गाकडे पाणीप्रश्नाची माहिती नाही , तसेच तालुक्यातील गावनिहाय पाणीस्थितीही माहिती नाही, अशी परिस्थिती असल्याने अधिकाऱ्यांना दुष्काळाबाबत ना खंत, ना खेद, अशीच परिस्थिती दिसत आहे.दुष्काळसदृश्य परिस्थिती, वन्यप्राण्यांचा त्रास यामुळे आजरा तालुक्यातील शेतकरी त्रासून गेला आहे. मुळातच सरासरी पावसापेक्षा पन्नास टक्केही पाऊस न झाल्याने भूजल पातळी खालावत चालल्याने मार्चनंतर उद्भवणारी पाणीटंचाई डिसेंबर, जानेवारी महिन्यांतच जाणवणार हे स्पष्ट आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना व शेतीला लागणाऱ्या पाण्याची टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे.तालुक्यात पाणी साठवण्याच्या नावावर झालेली अशासकीय कामे तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे. मग ती पाझर तलावांची असोत, बंधाऱ्याच्या डागडुजीची असोत, अथवा माती आणि सिमेंट बंधाऱ्यांची असोत. हे सर्व केले कशासाठी आणि नेमके पाणी साठणार किती हे सांगण्याच्या आधीच यावर्षी ते स्पष्टपणे दिसणार आहे.अनेक पाझर तलाव भ्रष्टाचारमुक्त म्हणून नावालाच राहिले आहेत. माती आणि सिमेंटच्या बंधाऱ्याबाबत न बोललेले बरे. ठिकठिकाणच्या बंधारे दुरुस्तीच्या नावावर करोडो रुपये गेले कुठे? या प्रश्नाचे उत्तरही तालुकावासीयांना यावर्षी मिळणार आहे. ते अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी देण्याची गरजच भासणार नाही.पाणी उपसाबंदीची तलवार शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे. चिकोत्रा प्रकल्प कार्यक्षेत्रात येणारा ऊस पाणीटंचाईमुळे लवकर उचल करण्यासंदर्भात साखर कारखान्यांना शासकीय पातळीवरून सूचना करण्यात आल्या आहेत, परंतु पाण्याअभावी यावर्षी ऊस क्षेत्रात घट होणार असल्याचे चित्रही पुढे येत आहे. सद्य:स्थितीला तातडीने पाण्याचा साठा करणे आवश्यक आहे; पण कोल्हापूर पद्धतीच्या अनेक बंधाऱ्यांना बरगेच नाहीत अशी परिस्थिती आहे.पाणी, वीज, कृषी आणि आरोग्य या प्रमुख विभागांवर या परिस्थितीशी सामना करण्यासाठी नियोजनात पुढाकार घेण्याची गरज आहे, परंतु जलसंधारणसह बहुतांशी विभाग बेफिकीरपणे वागत असल्याने व अशीच परिस्थिती राहिल्यास पाणीस्थिती गंभीर होणार हे निश्चित.दुष्काळ जाहीर नाही, निधीही नाही..महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला असला तरी कोल्हापूर जिल्ह्याचा त्यात समावेश नाही. त्यामुळे कोणताही निधी जाहीर नाही. पाणीटंचाईचे यापूर्वी पाठविलेले प्रस्तावही मंजूर नाहीत. त्यामुळे केवळ नुकसानीचे पंचनामे करणे व उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे एवढेच काम होऊ शकते.