शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

वस्त्रनगरीतील दिवाळीवर मंदीचे सावट

By admin | Updated: October 25, 2016 01:15 IST

उलाढालीवर परिणाम : वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना फटका; कामगारांच्या बोनस रकमेमध्ये घट

इचलकरंजी : वर्षभर वस्त्रोद्योगात असलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम यंदाच्या दीपावली सणावर झाल्याचे दिसून येत आहे. वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना मंदीचा फटका बसला असला, तरी साध्या यंत्रमाग कारखान्यांना त्याची तीव्रता अधिक जाणवते आहे. या कारखान्यात उत्पादित होणाऱ्या कापडाला मागणी नसल्यामुळे भाव मिळत नाही. परिणामी, नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे साध्या यंत्रमागावर कार्यरत असलेल्या कामगारांच्या दिवाळी बोनसमध्ये कमालीची घट झाली आहे. कामगारांच्या हातात बोनसची साधारणत: ५० ते ६० टक्के इतकीच रक्कम पडणार असल्यामुळे दिवाळी सणाच्या उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. शहर व परिसरात सुमारे सव्वा लाख यंत्रमाग, दहा हजार शटललेस व पाच हजार अंशत: स्वयंचलित माग आहेत. यापैकी यंत्रमाग कापडाला फारशी मागणी नसल्यामुळे गेले वर्षभर आर्थिक मंदीमध्ये हा उद्योग भरडला आहे. महाराष्ट्राबरोबर अन्य काही राज्यांत गेली दोन-तीन वर्षे असलेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि अन्य उद्योगांमध्ये काहीसे मंदीचे वातावरण असल्यामुळे कापडाला गिऱ्हाईक नाही आणि त्याचा परिणाम वस्त्रोद्योगावर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये असलेली कामगार मजुरी, विजेचे चढे दर आणि आर्थिक भांडवलाची टंचाई यामुळे या उद्योगात अडचणी निर्माण झाल्या आहेत.अशा पार्श्वभूमीवर चीनमधून ‘चिंधी’ अशा स्वरुपात स्वस्तातील कापड मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. त्याचे अतिक्रमण आपल्या देशातील यंत्रमाग कापडावर झाले आहे. म्हणून चीनमधून आयात होणाऱ्या कापडावर करामध्ये मोठी वाढ करावी किंवा बंदी घालावी, अशी मागणी यंत्रमाग उद्योगातील प्रातिनिधिक संघटनांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात यंत्रमागासाठी लागणाऱ्या विजेच्या दरामध्ये सवलत मिळावी आणि यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जांवरील व्याज दरात पाच टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. मात्र, या मागण्या दोन्ही सरकारकडे प्रलंबित आहेत. या सर्वांचा परिणाम यंत्रमाग उद्योगावर झाला असून, हा उद्योग मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे.शहर व परिसरात असलेले यंत्रमाग कारखाने, शटललेस आणि अंशत: स्वयंचलित मागांच्या कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्रकारच्या कामगारांची संख्या सुमारे ७५ हजार आहे. त्यामध्ये यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाला, वहिफणीवाला, दिवाणजी, मेंडिंग कामगार अशा विविध प्रकारच्या कामगारांचा समावेश आहे. या कामगार वर्गाला साधारणपणे दोन महिन्यांचा पगार दिवाळी सणासाठी बोनस म्हणून दिला जात होता. त्याची सरासरी रक्कम प्रति कामगार वीस हजार होत होती. या सर्वांना दिवाळीसाठी १५० कोटी रुपयांची रक्कम बोनस म्हणून मिळत असे. मात्र, गेले वर्षभर असलेल्या आर्थिक मंदीमुळे कापडाचे उत्पादन कमी झाले. पर्यायाने कामगारांच्या वेतनामध्ये सुद्धा घट झाली. आणि मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या यंत्रमागधारकांनी कामगारांना काही ना काही मिळावे, यासाठी साधारणपणे एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याची तरतूद केली आहे. साधारणत: ही रक्कम ७५ ते ८० कोटी रुपये होते. बोनसमध्ये घट झाल्यामुळे साहजिकच बाजारामध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. (प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने ओसदीपावली सणासाठी प्राधान्यक्रमाने फराळाचे पदार्थ घरी करावे लागतात, यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून किराणा भुसारी मालाच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. तर त्या पाठोपाठ तयार कपडे घेण्याबरोबर दीपावली सणासाठी लागणारे अन्य साहित्य तेही गरजेनुसार खरेदी केले जात आहेत. अशा स्थितीत दूरदर्शन संच, मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने व हॉटेल ओस पडली आहेत.कापड उत्पादनात घटदीपावली सणानंतर साधारणत: आठवडाभराने यंत्रमाग कारखाने सुरू होत असत. मात्र, पुढे कापडाला गिऱ्हाईक नसल्यामुळे कारखाने लवकर सुरू होण्याबाबत शंका व्यक्त होत आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला मतदान असल्यामुळे त्याचा परिणाम कारखाने चालू करण्यावर होणार आहे.