शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊन झाल्याने रेशनवरील धान्य विक्री ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:09 IST

महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत आहे. गरीब आणि विशेषत: दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन विक्रीच ठप्प झाली आहे.

- प्रवीण देसाईकोल्हापूर  - महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत आहे. गरीब आणि विशेषत: दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन विक्रीच ठप्प झाली आहे. सर्व्हर डाऊनमुळे इ-पॉस मशीन्स बंद झाल्याने ही परिस्थिती ओढविली आहे. राज्यभरात १ कोटी ५४ लाख ९७ हजार ६११ रेशनकार्डधारक असून, त्यांना गेल्या तीन दिवसांपासून रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळालेली नाही.इ-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर ग्राहकांना रेशनवर धान्य मिळाल्याने गैरप्रकारांना थोडा आळा बसला आहे. सरकारच्या या निर्णयाचे रेशन दुकानदार व त्यांच्या संघटनांनीही स्वागत केले आहे; परंतु या मशीनमधील तांत्रिक दोष काढण्यात पूर्णत: यश न आल्याने सर्व्हर डाऊन झाल्यावर ही मशीन बंद पडण्याचे प्रकार अधूनमधून सर्रास घडत आहेत. यावेळी सलग तीन दिवस हा तांत्रिक बिघाड कायम राहिला असून त्याला कोणी वालीच नसल्यासारखी परिस्थिती आहे.राज्य सरकारने व्हिजन टेक, लिंकवेल व ओअ‍ॅसिस या तीन कंपन्यांकडून इ-पॉस मशीन भाड्याने घेऊन ती दुकानदारांना दिली आहेत. यासाठी जिल्हा किंवा तालुकास्तरावर तंत्रज्ञाची नियुक्ती करणे आवश्यक आहे; परंतु ती केलेली नाही.तसेच तांत्रिक माहिती देण्याकरिता प्रशासकीय अधिकारीही नेमलेला नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांतर्फे थेट राज्याच्या पुरवठा विभागाच्या सचिवांशीच संपर्क साधावा लागतो. त्यांच्याकडूनही नीट खुलासा झाला नसल्याचे सांगण्यात आले.सर्व्हर डाऊनमुळे राज्यभरातील इ-पॉस मशीन बंद असून, रेशनवरील धान्य विक्री पूर्णपणे बंद आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप न करता बघ्याची भूमिका घेत आहे. हा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.-चंद्रकांत यादव, राज्य प्रवक्ते, रेशन बचाव समिती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र