शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

केंद्रीय मंत्र्यांच्या तारखेअभावीतीन कोटींची दिव्यांगांची साधने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:38 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांची दिव्यांगांची साधने जूनमध्येच आली असून, केवळ केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची तारीख मिळत नसल्याने या साधनांचे वितरण थांबले आहे. एकीकडे दिव्यांगांना या साधनांची गरज असताना मंत्र्यांना वेळ नसेल तर जिल्हा परिषदेच्या पातळीवर तातडीने ही साधने वितरित करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांच्या तारखेअभावीतीन कोटींची दिव्यांगांची साधने पडूनलाभार्थाी प्रतीक्षेत, राजकीय पाठपुराव्याची गरज

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांची दिव्यांगांची साधने जूनमध्येच आली असून, केवळ केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची तारीख मिळत नसल्याने या साधनांचे वितरण थांबले आहे. एकीकडे दिव्यांगांना या साधनांची गरज असताना मंत्र्यांना वेळ नसेल तर जिल्हा परिषदेच्या पातळीवर तातडीने ही साधने वितरित करण्याची गरज आहे.गेल्या वर्षी शाहूजयंतीचे औचित्य साधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला आॅनलाईन नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या दिव्यांगांना साधनांची गरज आहे, अशांसाठी बाराही तालुक्यांत तपासणी शिबिरे घेण्यात आली.

यानंतर संबंधितांना आवश्यक असणाऱ्या साधनांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५६९५ दिव्यांगांना नऊ कोटी १३ लाख रुपयांचे साहित्य तयार करण्यासाठी अ‍ॅल्मको कंपनीशी पत्रव्यवहारही झाला. यानंतर संबंधितांची मापे घेऊन ही साधने तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले.दरम्यान, ६ जुलै रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या दृष्टीने प्राथमिक तयारीही सुरू झाली; परंतु नंतर हा कार्यक्रम रद्द झाला. परंतु मंत्र्यांचा कार्यक्रम ठरल्याने तातडीने कंपनीने ३० टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे तीन कोटी रुपयांची साधने कोल्हापूरला पाठवून दिली.ही साधने सुरुवातीला राजाराम तलावाजवळील महसूल विभागाच्या गोदामांमध्ये उतरण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन्स आल्याने येथील साधने जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पाठवून देण्यात आली.

यानंतर महापूर आणि विधानसभा निवडणुका लागल्याने हा विषयच पुढे आला नाही; परंतु एक तर केंद्रीय मंत्र्यांनी तातडीने तारीख देऊन हा कार्यक्रम घेण्याची गरज होती किंवा ते न येता या साधनांचे वितरण दिव्यांगाना होण्याची गरज होती. किमान आता तरी याबाबत त्वरित निर्णय होण्याची गरज आहे.राजकीय इच्छाशक्तीचा अभावएकीकडे गावात शासनाच्या योजनेतून ५० हजार रुपयांचे साहित्य देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाते. कार्यक्रम घेतले जातात; परंतु येथे नऊ कोटींपैकी तीन कोटींचे साहित्य येऊन पाच महिने होत आले तरी ते दिव्यांगांना वाटले गेलेले नाही. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी किंवा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रबळ राजकीय इच्छाशक्ती न दाखविल्याने याबाबत तातडीने निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येते.

या साधनांच्या वितरणाचे महत्त्व उच्चपदस्थांनी वेळीच राज्यातील मंत्र्यांच्या माध्यमातून सांगितले असते तर कदाचित याआधीच हे वितरण झाले असते, असे भाजपच्याच एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यामुळेच आम्ही बाद झालोय, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.या साहित्याचे होणार वितरणव्हीलचेअर (लहान, मोठी), ट्रायसिकल (लहान, मोठी), कुबड्या, एल्बो क्रचेस, रोलेटर (लहान, मोठे), कॅलिपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एम. आर. किट, स्मार्ट केन, डायसी प्लेअर, कुष्ठरोग किट. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर