शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:46 IST

यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी.

ठळक मुद्देशिवसेनेची करवीर तहसील कार्यालयावर निदर्शने

कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातून बाहेर पडण्यापूर्वीच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.

मागण्यांचे निवेदन तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टीने महापूर येऊन शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यामध्ये सुमारे ७५ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकरी बाहेर पडतो न पडतो तोच आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकºयांना पुन्हा झोडपून काढले. महापूर व अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेली खरीप पिके जागेवर कुजली. यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी.

आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, विराज पाटील, हर्षल सुर्वे, बाजीराव पाटील, राजू यादव, अवधूत साळोखे, शशी बिडकर, मनजित माने, रणजित आयरेकर, धनाजी यादव, विनोद खोत, नरेश तुळशीकर, सुनील पोवार, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, सरदार तिप्पे, अभिजित बुकशेट, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना