शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

टाकवडेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 1, 2015 23:21 IST

औद्योगिक सुविधांची गरज : पंचगंगा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका; विकासापासून गाव वंचित

गणपती कोळी -- कुरुंदवाड -टाकवडे (ता.शिरोळ) गाव इचलकरंजी शहरालगत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वांत जास्त फटका या गावाला बसत आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. मोठा यंत्रमाग व्यवसाय, अ‍ॅग्रो प्रकल्प यामुळे टाकवडे औद्योगिक गाव बनले असले तरी त्या मानाने औद्योगिक सुविधा नसल्याने विकासापासून हे गाव वंचित राहिले आहे.इचलकरंजी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे दहा हजार लोकवस्ती असलेल्या टाकवडे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. पंचगंगा नदीकाठी गाव असले तरी इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडल्याने दूषित पाण्याचा फटका या गावाला बसत असल्याने महाराष्ट्र शासनाने व इचलकरंजी नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. त्यानुसार पालिकेकडून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर दररोज १७५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा करार असताना हे पाणी देण्याबाबत नियमितता नसल्याने ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच पालिकेने कृष्णा नळ योजनेतून टॅपिंगने अशुद्ध पाणी दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून शुद्ध पाण्याचा पुरवठाच बंद केला आहे. परिणामी अशुद्ध पाण्यात केवळ टीसीएल पावडर टाकून ग्रामपंचायतीकडून नळपाणी पुरवठ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडले असले तरी वाहतुकीच्यादृष्टीने गैरसोयीचे असल्याने गावातील उपकेंद्रात ओपीडी सेवा देण्याचा आदेश २००५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला आरोग्य विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविली आहे. मात्र, रडतखडत ही योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. योजना पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.या योजनेतून अंतर्गत पाईपलाईनसाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने चर काढल्याने गावातील सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतराचा रस्ता उखडल्याने खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यासाठी गावातील नेतेमंडळींनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. एकेकाळी गावाला पाणीपुरवठा करणारे व मध्यवस्तीतील गावतळ्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने तळ्यात हिरवी झुडुपे उगविली असून, पाण्याला हिरवट रंग आला आहे. त्यामुळे या तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व गावचे सौंदर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.गावात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गावच्या उद्योजकांनी अ‍ॅग्रो प्रकल्प गावातच उभा करून गावाचे नाव देशभरात पोहोचविले आहे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या विशेष सोयीअभावी म्हणावा तसा गावचा विकास झाला नाही. २००८मध्ये क्लस्टर योजनेतून सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, आजतागायत या योजनेतील निधीच मिळाला नसल्याने गावच्या विकासाला खीळ बसली आहे. याशिवाय टाकवडे-जय सांगली नाका जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, ग्रामस्थांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने गट-तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.दूषित पाणीपुरवठाइचलकरंजी नगरपालिकेने गावाला शुद्ध पाणीपुरवठा देणे बंधनकारक असतानाही पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील करवीर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मानवेंद्रनाथ निर्मळ यांनी संस्थेच्या माध्यमातून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर शुद्ध पेयजल प्रकल्प उभारून ग्रामस्थांना नवसंजीवनी दिली आहे. या गावाबरोबरच परिसरातील नागरिकही या पाण्याचा वापर करीत असल्याने दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.