शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

टाकवडेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 1, 2015 23:21 IST

औद्योगिक सुविधांची गरज : पंचगंगा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका; विकासापासून गाव वंचित

गणपती कोळी -- कुरुंदवाड -टाकवडे (ता.शिरोळ) गाव इचलकरंजी शहरालगत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वांत जास्त फटका या गावाला बसत आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. मोठा यंत्रमाग व्यवसाय, अ‍ॅग्रो प्रकल्प यामुळे टाकवडे औद्योगिक गाव बनले असले तरी त्या मानाने औद्योगिक सुविधा नसल्याने विकासापासून हे गाव वंचित राहिले आहे.इचलकरंजी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे दहा हजार लोकवस्ती असलेल्या टाकवडे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. पंचगंगा नदीकाठी गाव असले तरी इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडल्याने दूषित पाण्याचा फटका या गावाला बसत असल्याने महाराष्ट्र शासनाने व इचलकरंजी नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. त्यानुसार पालिकेकडून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर दररोज १७५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा करार असताना हे पाणी देण्याबाबत नियमितता नसल्याने ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच पालिकेने कृष्णा नळ योजनेतून टॅपिंगने अशुद्ध पाणी दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून शुद्ध पाण्याचा पुरवठाच बंद केला आहे. परिणामी अशुद्ध पाण्यात केवळ टीसीएल पावडर टाकून ग्रामपंचायतीकडून नळपाणी पुरवठ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडले असले तरी वाहतुकीच्यादृष्टीने गैरसोयीचे असल्याने गावातील उपकेंद्रात ओपीडी सेवा देण्याचा आदेश २००५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला आरोग्य विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविली आहे. मात्र, रडतखडत ही योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. योजना पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.या योजनेतून अंतर्गत पाईपलाईनसाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने चर काढल्याने गावातील सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतराचा रस्ता उखडल्याने खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यासाठी गावातील नेतेमंडळींनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. एकेकाळी गावाला पाणीपुरवठा करणारे व मध्यवस्तीतील गावतळ्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने तळ्यात हिरवी झुडुपे उगविली असून, पाण्याला हिरवट रंग आला आहे. त्यामुळे या तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व गावचे सौंदर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.गावात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गावच्या उद्योजकांनी अ‍ॅग्रो प्रकल्प गावातच उभा करून गावाचे नाव देशभरात पोहोचविले आहे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या विशेष सोयीअभावी म्हणावा तसा गावचा विकास झाला नाही. २००८मध्ये क्लस्टर योजनेतून सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, आजतागायत या योजनेतील निधीच मिळाला नसल्याने गावच्या विकासाला खीळ बसली आहे. याशिवाय टाकवडे-जय सांगली नाका जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, ग्रामस्थांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने गट-तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.दूषित पाणीपुरवठाइचलकरंजी नगरपालिकेने गावाला शुद्ध पाणीपुरवठा देणे बंधनकारक असतानाही पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील करवीर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मानवेंद्रनाथ निर्मळ यांनी संस्थेच्या माध्यमातून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर शुद्ध पेयजल प्रकल्प उभारून ग्रामस्थांना नवसंजीवनी दिली आहे. या गावाबरोबरच परिसरातील नागरिकही या पाण्याचा वापर करीत असल्याने दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.