शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

टाकवडेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 1, 2015 23:21 IST

औद्योगिक सुविधांची गरज : पंचगंगा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका; विकासापासून गाव वंचित

गणपती कोळी -- कुरुंदवाड -टाकवडे (ता.शिरोळ) गाव इचलकरंजी शहरालगत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वांत जास्त फटका या गावाला बसत आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. मोठा यंत्रमाग व्यवसाय, अ‍ॅग्रो प्रकल्प यामुळे टाकवडे औद्योगिक गाव बनले असले तरी त्या मानाने औद्योगिक सुविधा नसल्याने विकासापासून हे गाव वंचित राहिले आहे.इचलकरंजी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे दहा हजार लोकवस्ती असलेल्या टाकवडे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. पंचगंगा नदीकाठी गाव असले तरी इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडल्याने दूषित पाण्याचा फटका या गावाला बसत असल्याने महाराष्ट्र शासनाने व इचलकरंजी नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. त्यानुसार पालिकेकडून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर दररोज १७५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा करार असताना हे पाणी देण्याबाबत नियमितता नसल्याने ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच पालिकेने कृष्णा नळ योजनेतून टॅपिंगने अशुद्ध पाणी दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून शुद्ध पाण्याचा पुरवठाच बंद केला आहे. परिणामी अशुद्ध पाण्यात केवळ टीसीएल पावडर टाकून ग्रामपंचायतीकडून नळपाणी पुरवठ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडले असले तरी वाहतुकीच्यादृष्टीने गैरसोयीचे असल्याने गावातील उपकेंद्रात ओपीडी सेवा देण्याचा आदेश २००५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला आरोग्य विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविली आहे. मात्र, रडतखडत ही योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. योजना पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.या योजनेतून अंतर्गत पाईपलाईनसाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने चर काढल्याने गावातील सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतराचा रस्ता उखडल्याने खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यासाठी गावातील नेतेमंडळींनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. एकेकाळी गावाला पाणीपुरवठा करणारे व मध्यवस्तीतील गावतळ्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने तळ्यात हिरवी झुडुपे उगविली असून, पाण्याला हिरवट रंग आला आहे. त्यामुळे या तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व गावचे सौंदर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.गावात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गावच्या उद्योजकांनी अ‍ॅग्रो प्रकल्प गावातच उभा करून गावाचे नाव देशभरात पोहोचविले आहे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या विशेष सोयीअभावी म्हणावा तसा गावचा विकास झाला नाही. २००८मध्ये क्लस्टर योजनेतून सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, आजतागायत या योजनेतील निधीच मिळाला नसल्याने गावच्या विकासाला खीळ बसली आहे. याशिवाय टाकवडे-जय सांगली नाका जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, ग्रामस्थांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने गट-तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.दूषित पाणीपुरवठाइचलकरंजी नगरपालिकेने गावाला शुद्ध पाणीपुरवठा देणे बंधनकारक असतानाही पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील करवीर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मानवेंद्रनाथ निर्मळ यांनी संस्थेच्या माध्यमातून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर शुद्ध पेयजल प्रकल्प उभारून ग्रामस्थांना नवसंजीवनी दिली आहे. या गावाबरोबरच परिसरातील नागरिकही या पाण्याचा वापर करीत असल्याने दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.