शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

टाकवडेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 1, 2015 23:21 IST

औद्योगिक सुविधांची गरज : पंचगंगा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका; विकासापासून गाव वंचित

गणपती कोळी -- कुरुंदवाड -टाकवडे (ता.शिरोळ) गाव इचलकरंजी शहरालगत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वांत जास्त फटका या गावाला बसत आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. मोठा यंत्रमाग व्यवसाय, अ‍ॅग्रो प्रकल्प यामुळे टाकवडे औद्योगिक गाव बनले असले तरी त्या मानाने औद्योगिक सुविधा नसल्याने विकासापासून हे गाव वंचित राहिले आहे.इचलकरंजी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे दहा हजार लोकवस्ती असलेल्या टाकवडे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. पंचगंगा नदीकाठी गाव असले तरी इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडल्याने दूषित पाण्याचा फटका या गावाला बसत असल्याने महाराष्ट्र शासनाने व इचलकरंजी नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. त्यानुसार पालिकेकडून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर दररोज १७५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा करार असताना हे पाणी देण्याबाबत नियमितता नसल्याने ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच पालिकेने कृष्णा नळ योजनेतून टॅपिंगने अशुद्ध पाणी दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून शुद्ध पाण्याचा पुरवठाच बंद केला आहे. परिणामी अशुद्ध पाण्यात केवळ टीसीएल पावडर टाकून ग्रामपंचायतीकडून नळपाणी पुरवठ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडले असले तरी वाहतुकीच्यादृष्टीने गैरसोयीचे असल्याने गावातील उपकेंद्रात ओपीडी सेवा देण्याचा आदेश २००५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला आरोग्य विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविली आहे. मात्र, रडतखडत ही योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. योजना पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.या योजनेतून अंतर्गत पाईपलाईनसाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने चर काढल्याने गावातील सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतराचा रस्ता उखडल्याने खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यासाठी गावातील नेतेमंडळींनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. एकेकाळी गावाला पाणीपुरवठा करणारे व मध्यवस्तीतील गावतळ्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने तळ्यात हिरवी झुडुपे उगविली असून, पाण्याला हिरवट रंग आला आहे. त्यामुळे या तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व गावचे सौंदर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.गावात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गावच्या उद्योजकांनी अ‍ॅग्रो प्रकल्प गावातच उभा करून गावाचे नाव देशभरात पोहोचविले आहे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या विशेष सोयीअभावी म्हणावा तसा गावचा विकास झाला नाही. २००८मध्ये क्लस्टर योजनेतून सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, आजतागायत या योजनेतील निधीच मिळाला नसल्याने गावच्या विकासाला खीळ बसली आहे. याशिवाय टाकवडे-जय सांगली नाका जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, ग्रामस्थांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने गट-तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.दूषित पाणीपुरवठाइचलकरंजी नगरपालिकेने गावाला शुद्ध पाणीपुरवठा देणे बंधनकारक असतानाही पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील करवीर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मानवेंद्रनाथ निर्मळ यांनी संस्थेच्या माध्यमातून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर शुद्ध पेयजल प्रकल्प उभारून ग्रामस्थांना नवसंजीवनी दिली आहे. या गावाबरोबरच परिसरातील नागरिकही या पाण्याचा वापर करीत असल्याने दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.