शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

आजऱ्यात नळाला चक्क गटारीचे पाणी

By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, गटारी तुंबल्या; तक्रारींकडे दुर्लक्ष

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -निर्मल ग्राम म्हणून शासनाचा पुरस्कार पटकाविलेल्या आजरा शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेतून काही भागात चक्क गटारींचे पाणी येत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने ठिकठिकाणी असे प्रकार वारंवार घडत आहेत.चार वर्षांपूर्वी शहरात घिसाडघाई करून अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटारी बांधण्यात आल्या. गरजेपेक्षा अधिक खोलीच्या या गटारींची सफाई करताना कामगार वर्गावर मर्यादा येत आहेत, तर काही ठिकाणी गटारींमध्ये माती व अन्य साहित्य पडून त्या मुजल्या आहेत. विशेषत: चाफे गल्ली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चावीच्या पाण्यातून गटारींचे पाणी येत आहे. मुळात या भागातील गटारींच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताच पर्याय अवलंबलेला नसल्याने गटारींचे पाणी तुंबून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपमध्ये मिसळत आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांकडून वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली जात असतानाही अद्याप हा प्रकार बंद झालेला नाही.डेंग्यूसारखा आजार शहरात फैलावू नये, यासाठी धूर फवारणी यंत्रासारखा प्रकार ग्रामपंचायतीमार्फत अवलंबला जात असताना दुसरीकडे भरवस्तीत सांडपाण्याचे साचलेले डबके, चावीतून येणारे दूषित पाणी असा विरोधाभास दिसत आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रथम सांडपाणी पुढे नेण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व त्याचबरोबर तातडीने योग्य ते उपाय करून स्वच्छ पाणी पुरविण्याची गरज आहे.सहनशीलतेचा अंत पाहू नये : ग्रामस्थअक्षरश: गटारींमधील पाणी चावीतून येत आहे. पाणी पिण्याकरिता योग्य नाहीच; पण घरखर्चाला वापरतानाही पाण्याला घाण वास येणे, अंगाला खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे असे प्रकार घडत आहेत. विनंत्या करून झाल्या, आता ग्रामपंचायतीने सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे निवेदन राजू लिचम, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, शिवाजी मनगुतकर यांनी दिले आहे.भरवस्तीतील पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु खासगी शेतजमिनीतून पाणी नेण्यास शेतकरी वर्गाचा विरोध असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. जोपर्यंत गटारींच्या पाण्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठ्याची गळती शोधणे अवघड आहे. - मैमुनबी पठाण, सरपंच आजरा.