शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आजऱ्यात नळाला चक्क गटारीचे पाणी

By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, गटारी तुंबल्या; तक्रारींकडे दुर्लक्ष

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -निर्मल ग्राम म्हणून शासनाचा पुरस्कार पटकाविलेल्या आजरा शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेतून काही भागात चक्क गटारींचे पाणी येत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने ठिकठिकाणी असे प्रकार वारंवार घडत आहेत.चार वर्षांपूर्वी शहरात घिसाडघाई करून अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटारी बांधण्यात आल्या. गरजेपेक्षा अधिक खोलीच्या या गटारींची सफाई करताना कामगार वर्गावर मर्यादा येत आहेत, तर काही ठिकाणी गटारींमध्ये माती व अन्य साहित्य पडून त्या मुजल्या आहेत. विशेषत: चाफे गल्ली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चावीच्या पाण्यातून गटारींचे पाणी येत आहे. मुळात या भागातील गटारींच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताच पर्याय अवलंबलेला नसल्याने गटारींचे पाणी तुंबून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपमध्ये मिसळत आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांकडून वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली जात असतानाही अद्याप हा प्रकार बंद झालेला नाही.डेंग्यूसारखा आजार शहरात फैलावू नये, यासाठी धूर फवारणी यंत्रासारखा प्रकार ग्रामपंचायतीमार्फत अवलंबला जात असताना दुसरीकडे भरवस्तीत सांडपाण्याचे साचलेले डबके, चावीतून येणारे दूषित पाणी असा विरोधाभास दिसत आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रथम सांडपाणी पुढे नेण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व त्याचबरोबर तातडीने योग्य ते उपाय करून स्वच्छ पाणी पुरविण्याची गरज आहे.सहनशीलतेचा अंत पाहू नये : ग्रामस्थअक्षरश: गटारींमधील पाणी चावीतून येत आहे. पाणी पिण्याकरिता योग्य नाहीच; पण घरखर्चाला वापरतानाही पाण्याला घाण वास येणे, अंगाला खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे असे प्रकार घडत आहेत. विनंत्या करून झाल्या, आता ग्रामपंचायतीने सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे निवेदन राजू लिचम, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, शिवाजी मनगुतकर यांनी दिले आहे.भरवस्तीतील पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु खासगी शेतजमिनीतून पाणी नेण्यास शेतकरी वर्गाचा विरोध असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. जोपर्यंत गटारींच्या पाण्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठ्याची गळती शोधणे अवघड आहे. - मैमुनबी पठाण, सरपंच आजरा.