शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

(वापरू नये....) पर्सन ऑफ डे : तानाजी पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:18 AM

विकासाची दृष्टी असणारे गडमुडशिंगीचे युवा नेतृत्व पाणी, गटर्स, रस्ते म्हणजे विकास, असे काहीसे आपल्याकडे सूत्र बनले आहे. मात्र, त्या ...

विकासाची दृष्टी असणारे गडमुडशिंगीचे युवा नेतृत्व

पाणी, गटर्स, रस्ते म्हणजे विकास, असे काहीसे आपल्याकडे सूत्र बनले आहे. मात्र, त्या पलीकडेही गावात विकास करता येतो, हे गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी कृष्णात पाटील यांनी दाखवून दिले. वीस हजार लोकसंख्येच्या गावाला विकासाचे मॉडेल बनवणे तसे अवघड असते. मात्र, त्यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि त्यात ते यशस्वी ठरले.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराच्या जवळचे व लोकसंख्येने मोठे गाव म्हणजे गडमुडशिंगी, लहान गावाचा विकास झपाट्याने करता येतो. मात्र, मोठ्या गावांच्या समस्या, अडचणी वेगळ्या असतात. गडमुडशिंगीच्या जनतेने दहा वर्षांपूर्वी तानाजी पाटील यांच्यासारख्या युवा नेतृत्वावर विश्वास टाकला आणि जनतेच्या विश्वासाला पात्र राहून व ग्रामदैवत बिरोबा देवाच्या साक्षीने त्यांनी विकासाचे शिवधनुष्य उचलले. गावाला सक्षम व विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व मिळाल्यानंतर विकासाचा आलेख कसा चढता राहतो, हे तानाजी पाटील यांनी दाखवून दिले आहे. गावकऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी, प्रशस्त रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, गटर्स, स्वच्छता या दैनंदिन गरजांची पूर्तता त्यांनी प्राधान्याने तर केलीच. त्याशिवायही काहीतरी वेगळे करता येईल का, याचा शोध त्यांनी कायम ठेवला. ग्रामपंचायतीचे प्रशासन सक्षम व गतिमान करत कामात सुसूत्रीपणा आणला. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत असतानाच त्यांना त्यानुसार औजारे उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ‘कृषी औजार बँक’ काढली. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. कचरा उठावासाठी घंटागाडी, खेळाचे सुसज्ज टर्फ मैदान, सोलर, हायमास्ट दिवे, अंबाबाई मंदिर बांधकाम व सुशोभीकरण आदी कामे प्रभावीपणे केली.

मागील पाच वर्षांत खऱ्या अर्थाने गडमुडशिंगी विकासाच्या शिखरावर पोहोचली. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने तानाजी पाटील यांनी माजी आमदार अमल महाडिक व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून गावासाठी निधी खेचून आणला. विकासनिधीबरोबरच ग्रामस्थांना व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या. प्रत्येक योजना आपल्या गावात कशी आणता येईल, यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा गडमुडशिंगीच्या जनतेने त्यांना सत्ता दिली. सत्ता ही सामान्य माणसाच्या कल्याणासाठी असते, हे त्यांनी कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतीच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचा सामान्य माणसावर विश्वास होता. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी तगडे आव्हान उभे केले होते. पाच वर्षांत उभा केलेला विकासाचा डोंगर, सामान्य, गोरगरीब माणसाचे पाठबळ आणि स्वर्गीय शिवाजीराव पाटील (दादा) यांच्या विचारांची भक्कम साथ यावर हे आव्हान त्याच ताकदीने परतावून लावत त्यांनी सत्ता ताब्यात ठेवली.

विकासाच्या नवीन पॅटर्नचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी सत्तेची सूत्रे हातात घेतली. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विकासकामांवर काहीशा मर्यादा आल्या आहेत. तरीही ते थांबले नाहीत, विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असतानाच, गडमुडशिंगी येथे काेरोना सेंटर सुरू करून गोरगरिबांना आधार देण्याचे काम केले. अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाने गडमुडशिंगीचा विकासपुरुष म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची दखल राज्यपातळीवर घेतली. महाराष्ट्र राज्य उपसरपंच परिषदेचे उपाध्यक्षपद त्यांच्यावर सोपवून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोहोचपावती दिली.

संघर्षातून तावून- सुलाखून निघालेले नेतृत्व

गडमुडशिंगीच्या राजकारणात पाय रोवून उभे राहणे तसे अवघड काम होते. मात्र, स्वर्गीय शिवाजीराव कृष्णात पाटील (दादा) यांच्या विचारांचा वारसा घेऊन तानाजी पाटील यांनी राजकारणात पाऊल ठेवले. स्वच्छ चारित्र्य, सामान्य माणसाबद्दलची कणव त्यांच्याकडे असल्याने त्यांनी राजकारणावर लवकर पकड निर्माण केली. संघर्ष हा त्यांच्या जीवनात कायम राहिला, जिल्हा परिषद निवडणुकीत अपयशही आले. मात्र, ते खचले नाहीत. सामान्य माणूस त्यांच्यासोबत राहिल्याने त्यांनी राजकारणावरील पकड अधिकच घट्ट केली.

पंचगंगेतून थेट पाइपद्वारे पाणी

गावाचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने गावविहिरीतून पाणी अपुरे पडत होते. यासाठी त्यांनी थेट पंचगंगा नदीवरून पाइपलाइन आणून गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ए.टी.एम. बसवून आधुनिक पाऊल टाकले.

स्पर्धा परीक्षेतही झेंडा

ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी प्रथमच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. गावातील चार मुलांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत चांगले यश संपादन करून ते शासकीय सेवेत दाखल झाले. गडमुडशिंगी गावचे नाव उज्ज्वल केले. याकामी तानाजी पाटील यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.