शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

नोटीसचे गुºहाळ नको, थेट आयुक्तांवर फौजदारी करा : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांना खडेबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:36 IST

गेल्या तीन वर्षांपासून परिसरात कचºयाचा धूर आरोग्याला घातक ठरत असताना एकदाही येथून बाहेर पडणाºया वायूची तपासणी का केली नाही, असा सवाल करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना खडेबोल सुनावले.

ठळक मुद्दे कॉमन मॅन संघटना : झूम प्रकल्प धूर प्रकरण

कोल्हापूर : लाईन बाजार येथील झूम प्रकल्पातील कचºयातील धुरामुळे १0 हजार नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे; त्यामुळे नुसत्या नोटीसचे गुºहाळ नको, महापालिकेच्या आयुक्तांवर तत्काळ फौजदारी करा, अशी मागणी मंगळवारी कॉमन मॅन संघटनेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली.

गेल्या तीन वर्षांपासून परिसरात कचºयाचा धूर आरोग्याला घातक ठरत असताना एकदाही येथून बाहेर पडणाºया वायूची तपासणी का केली नाही, असा सवाल करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना खडेबोल सुनावले.

कॉमन मॅन संघटनेचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘झूम येथील धुरातून शरीरास हानीकारक विषारी वायू बाहेर पडत आहे. लाईन बाजार परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती आहे. या दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने झूम परिसरातील वायूची तपासणी का केली नाही. याचबरोबर या परिसरात कोणता वायू बाहेर पडतो, त्याचे प्रमाण किती आहे, या वायूपासून कोणता त्रास होऊ शकतो, या माहितीचा फलक परिसरात का लावण्यात आला नाही. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे गायकवाड, महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे यांना खडेबोल सुनावले.

  • नोटीस काढून कोणाला फसविता

वर्षभरात येथील प्रदूषण कमी होण्यासाठी काय उपाययोजना केल्या, असा सवाल अ‍ॅड. इंदुलकर यांनी केला. यावर प्रशांत गायकवाड यांनी झूम परिसरात पाहणी केली असून, सोमवारी महापालिकेला नोटीस बजावल्याचे सांगताच अ‍ॅड. इंदुलकर भडकले. ते म्हणाले, केवळ नोटीस काढून कोणाला फसविता. येथील समस्यांवर नोटीस हे उत्तर नाही; त्यामुळे नोटीसचे गुºहाळ थांबवा, थेट आयुक्तांवर गुन्हा दाखल करा.

  • तर झूम परिसरात कार्यालय

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासन सुस्त आहे. केवळ नोटीस काढण्याचे काम करत आहे; त्यामुळे तत्काळ कारवाई केली नाही, तर झूम येथील कच-याच्या ढिगामध्येच कार्यालय सुरू करण्यास भाग पाडू, असा इशाराही देण्यात आला. तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहा म्हणजे नागरिकांना काय त्रास होतो, ते समजेल. ‘एसी’मध्ये बसून नागरिकांच्या व्यथा समजणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण