शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
3
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
4
"हा माझा पती... नाही तो माझा पती"; लाथाबुक्क्या हाणल्या, बाटल्या फेकून मारल्या, पोलीस स्टेशनसमोर महिलांमध्ये जुंपली! 
5
बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
6
"ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही..," 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा
7
चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा
8
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
9
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
10
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...
11
किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू?
12
Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही
13
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
15
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
16
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
17
Palghar Crime: घरी कुणी नसताना भेटायला गेला अन् होणाऱ्या पत्नीचीच केली हत्या; पालघरमधील घटना
18
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
19
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
20
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर

शेतकऱ्यांचा संयम सुटू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST

जयसिंगपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही. ...

जयसिंगपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

गाजीपूर बॉर्डर दिल्ली येथील किसान आंदोलनात राजू शेट्टी यांनी भेट देऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना मान्य नसलेले जे कायदे आहेत, ते मागे घ्यावेत. हमीभाव कायदेशीर करावा, हाच यावरचा पर्याय आहे. शेतकरी ज्या हमीभावाच्या कायद्याची मागणी करीत आहे तो कायदा न आणता ज्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होईल तो कायदा केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे असल्याचे सांगत आहे. जर हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असते तर देशात सुरू असलेल्या या आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसते, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यावेळी मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्यासह अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

चौकट - केंद्राने मोठेपणा दाखवावा : राजू शेट्टी

पंजाब, उत्तर प्रदेश व उत्तराखंड राज्यांचे हे आंदोलन नसून संपूर्ण देश काश्मीरपासून ते कन्याकुमारीतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाला आहे. आता हे आंदोलन संपूर्ण देशभर जोर धरू लागले आहे. केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा, असेही राजू शेट्टी म्हणाले.

फोटो - १२१२२०२०-जेएवाय-०४

फोटो ओळ - दिल्ली येथील गाजीपूर बॉर्डरजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सहभाग घेतला.