शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अफवांवर विश्वास ठेऊ नका, पन्हाळ्याची शासकीय कार्यालये कुठेही जाणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 16:51 IST

Fort Panhala Flood Kolhapur : पन्हाळा शहरात संपुर्ण तालुक्याची सर्व कार्यालये आहेत. रस्ता खचला म्हणुन ही कार्यालये वाघबिळ येथे हलविण्याची मागणी होत असली तरी अशी कार्यालये बाहेर नेता येत नाहीत, त्याला राज्य शासनाची परवानगी लागते अशी माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

ठळक मुद्देअफवांवर विश्वास ठेऊ नका, पन्हाळ्याची शासकीय कार्यालये कुठेही जाणार नाहीततहसीलदार शेंडगे यांची माहीती, पन्हाळ्यावरील रस्त्याचे काम सुरु

नितीन भगवानपन्हाळा : पन्हाळा शहरात संपुर्ण तालुक्याची सर्व कार्यालये आहेत. रस्ता खचला म्हणुन ही कार्यालये वाघबिळ येथे हलविण्याची मागणी होत असली तरी अशी कार्यालये बाहेर नेता येत नाहीत, त्याला राज्य शासनाची परवानगी लागते अशी माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु केल्याने पुढील दोन ते तीन महिन्यात पन्हाळ्यावरील सर्व व्यव्हार सुरु होतील असे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले.२३ जुलै रोजी पन्हाळ्याचा रस्ता खचला. त्यामुळे पन्हाळकर तर अडकलेच परंतु अनेक शासकीय कार्यालये बंद राहिली. त्यामुळे पन्हाळ्याच्या बाहेरून येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येता न आल्याने शासकीय कामकाजहि बंद राहिले.दरम्यान, पन्हाळ्यावर अशा प्रकारचे रस्ता संकट वारंवार घडु लागल्याने आता शासकिय कार्यालये वाघबिळ येथे जाणार, अशी अफवा पसरली आहे. मात्र या बाबत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी या प्रकाराला आपला विरोध दर्शविला.

असा प्रकार जाणीवपूर्वक कोणी करत असतील तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगुन ही कृती हाणुन पाडेन. यापेक्षा पन्हाळ्यावर येण्या- जाण्यासाठी प्रस्तावित उड्डाण पुल लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने पुर्ण होइल यासाठी सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी पाठपुरावा करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.शासकिय कार्यालये इतरत्र हलविण्यास गावकऱ्यांचा विरोध असुन असे कांही होत असल्यास आपण न्यायालयीन दाद मागु असा इशारा माजी नगरसेवक सतीश भोसले यांनी दिला आहे.

खरतर पन्हाळा शहराने इतिहास काळापासुन राजधानीचे वैभव पाहिले आहे. यात भोजराजापासुन छत्रपती ताराराणीपर्यंत या ठिकाणी सर्व कार्यालये होती, ती तशीच पुढे चालु आहेत. रस्त्याचा प्रश्न हा तात्पुरता आहे, यामुळे शासकिय कार्यालये पन्हाळा शहरातुन बाहेर जावीत असे कुणाच्या मनात नसताना ही अफवा उठवण्याचा नतद्रष्ट मंडळींचा कोणता हेतु आहे, हे समजुन येत नाही.

पन्हाळ्यावरील रस्त्याचे काम सुरुदरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात पन्हाळ्यावरील सर्व व्यव्हार सुरु होतील असे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले.

 

टॅग्स :Fortगडfloodपूरkolhapurकोल्हापूर