शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
Rishabh Pant Injury Update : पंत विकेटमागे दिसणार नाही; पण गरज पडल्यास तो बॅटिंग करेल! BCCI नं दिली माहिती
3
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
4
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
5
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
6
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
7
राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय! प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
8
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
9
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
11
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
12
Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
13
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
14
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
16
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा
18
"हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने..."; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
19
गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द
20
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी

‘डॉल्बी’ राजारामपुरीत रोखा; ‘महाद्वार’चाही मार्ग मोकळा होईल

By admin | Updated: August 26, 2016 01:12 IST

पोलिसांना आव्हान : निष्पक्षपणे कारवाईची गरज

सचिन पाटील -- कोल्हापूर --गणेशोत्सवाचे वेध लागले की,पोलिस प्रशासन, सामाजिक संघटनांची ‘डॉल्बीमुक्ती’साठी धावपळ सुरू होते. नेटाने ते डॉल्बीमुक्तीसाठी बैठका घेतात. प्रसंगी कारवाईही करतात. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून विसर्जन मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा ठोका वाजतोच आणि या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव घोषणेचा फज्जा उडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे खरंच यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करावयाचा असेल तर पोलिसांनी सर्वच मंडळांना एकाच तराजूत तोलून, राजकीय दबाव झुगारुन जागेवरच कारवाई करण्याची गरज आहे आणि याची सुरुवात प्रथम राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीपासूनच झाली पाहिजे. कोल्हापूरला पारंपरिक गणेशोत्सव मिरवणुकीची मोठी परंपरा आहे. ती आजही काही मंडळांनी जपली आहे. मात्र, बदलत्या काळात डॉल्बी व मिरवणूक असे नवे समीकरण काही मंडळांनी स्वीकारले. जल्लोष साजरा करण्याच्या नावाखाली काळजाचा ठोका चुकविणारा आवाज, डोळे दीपवणारा झगमगाट, बेधुंद होऊन बीभत्सपणे नाचणारी तरुणाई असा नवा तर्क तरुणाईने करून घेतला. याचे सामाजिक व शारीरिक विपरीत परिणाम दिसू लागल्यावर डॉल्बी बंदीसाठी मोहीम तीव्र झाली. यात चांगले यशही पोलिस व सामाजिक संघटनांना आले. मात्र, कारवाईतील दुटप्पीपणा व कायद्यातील पळवाटा यामुळे ही मोहीम अद्यापही पूर्णपणे यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे यावर्षी खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्ती करावयाची असेल तर तरुण मंडळांत प्रबोधनाची चळवळ तीव्र करण्याबरोबरच कारवाईचा हंटरही चालविणे आवश्यक आहे. जर हे झाले तरच खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीचा पहिला ठोका वाजेल.गणरायाची आगमन मिरवणूक राजारामपुरीत व विसर्जन मिरवणूक महाद्वारला हे दृश्य सध्या गणेशोत्सवात पहावयास मिळते. राजारामपुरीत दरवर्षी गणरायाचे आगमन धडाक्यात केले जाते. त्यामुळे मुख्य मार्गावर दणदणाट ऐकविण्यासाठी व झगमगाट दाखविण्यासाठी तरुण मंडळांत स्पर्धा लागलेली असते. या स्पर्धेत डॉल्बीमुक्तीचे तुणतुणे अक्षरश: फिके ठरल्याचा गेल्या दोन-तीन वर्षांतील अनुभव आहे. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत डॉल्बीमुक्ती फाट्यावर बसवली जाते. त्यामुळे या ठिकाणी डॉल्बी वाजला तर त्याचे पडसाद पेठेतील इतर मंडळांत उमटतात. तेथे वाजतो तर विसर्जन मिरवणुकीत का नाही? या प्रश्नापुढे डॉल्बीमुक्तीचे तीन तेरा होतात. त्यामुळे पहिले मोठे आव्हान राजारामपुरीत डॉल्बीला रोखणे हे असणार आहे. तेथे ब्रेक लागला तर ‘डॉल्बी’चा दणका विसर्जन मिरवणुकीत नक्कीच फुसका ठरेल, हे उघड गुपित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीला बळ मिळेल.दोन बेसची पळवाटंमोठ्या डॉल्बीऐवजी दोन बेस व दोन टॉप लावण्याची परवानगी म्हणजे डॉल्बीमुक्तीतील एक मोठी पळवाट आहे. कारण आज बाजारात ‘जेबीएल’सारख्या अत्याधुनिक साऊंड यंत्रणा आल्या आहेत. या केवळ दोन बेस दोन टॉपमधून मिरवणूक हादरवून टाकू शकतात. त्यांची आवाजाची मर्यादा १०० डेसिबलपेक्षा कितीतरी अधिक आहे. गुन्ह्याचीही भीती नाहीमिरवणुकीत एखाद्या मंडळाने डॉल्बी लावला तर आवाजाची तीव्रता तपासून पोलिसांकडून नंतर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, अनेक कार्यकर्ते असे गुन्हे अंगावर घ्यायला तयार असतात. काही मंडळांनी तसे कार्यकर्ते तयारच ठेवलेले असतात. मग केस पडली तर पडू दे, नंतर बघू, पण आता हलवून सोडू, अशीच मानसिकता त्यांची असते.