शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉल्बी’ राजारामपुरीत रोखा; ‘महाद्वार’चाही मार्ग मोकळा होईल

By admin | Updated: August 26, 2016 01:12 IST

पोलिसांना आव्हान : निष्पक्षपणे कारवाईची गरज

सचिन पाटील -- कोल्हापूर --गणेशोत्सवाचे वेध लागले की,पोलिस प्रशासन, सामाजिक संघटनांची ‘डॉल्बीमुक्ती’साठी धावपळ सुरू होते. नेटाने ते डॉल्बीमुक्तीसाठी बैठका घेतात. प्रसंगी कारवाईही करतात. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून विसर्जन मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा ठोका वाजतोच आणि या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव घोषणेचा फज्जा उडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे खरंच यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करावयाचा असेल तर पोलिसांनी सर्वच मंडळांना एकाच तराजूत तोलून, राजकीय दबाव झुगारुन जागेवरच कारवाई करण्याची गरज आहे आणि याची सुरुवात प्रथम राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीपासूनच झाली पाहिजे. कोल्हापूरला पारंपरिक गणेशोत्सव मिरवणुकीची मोठी परंपरा आहे. ती आजही काही मंडळांनी जपली आहे. मात्र, बदलत्या काळात डॉल्बी व मिरवणूक असे नवे समीकरण काही मंडळांनी स्वीकारले. जल्लोष साजरा करण्याच्या नावाखाली काळजाचा ठोका चुकविणारा आवाज, डोळे दीपवणारा झगमगाट, बेधुंद होऊन बीभत्सपणे नाचणारी तरुणाई असा नवा तर्क तरुणाईने करून घेतला. याचे सामाजिक व शारीरिक विपरीत परिणाम दिसू लागल्यावर डॉल्बी बंदीसाठी मोहीम तीव्र झाली. यात चांगले यशही पोलिस व सामाजिक संघटनांना आले. मात्र, कारवाईतील दुटप्पीपणा व कायद्यातील पळवाटा यामुळे ही मोहीम अद्यापही पूर्णपणे यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे यावर्षी खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्ती करावयाची असेल तर तरुण मंडळांत प्रबोधनाची चळवळ तीव्र करण्याबरोबरच कारवाईचा हंटरही चालविणे आवश्यक आहे. जर हे झाले तरच खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीचा पहिला ठोका वाजेल.गणरायाची आगमन मिरवणूक राजारामपुरीत व विसर्जन मिरवणूक महाद्वारला हे दृश्य सध्या गणेशोत्सवात पहावयास मिळते. राजारामपुरीत दरवर्षी गणरायाचे आगमन धडाक्यात केले जाते. त्यामुळे मुख्य मार्गावर दणदणाट ऐकविण्यासाठी व झगमगाट दाखविण्यासाठी तरुण मंडळांत स्पर्धा लागलेली असते. या स्पर्धेत डॉल्बीमुक्तीचे तुणतुणे अक्षरश: फिके ठरल्याचा गेल्या दोन-तीन वर्षांतील अनुभव आहे. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत डॉल्बीमुक्ती फाट्यावर बसवली जाते. त्यामुळे या ठिकाणी डॉल्बी वाजला तर त्याचे पडसाद पेठेतील इतर मंडळांत उमटतात. तेथे वाजतो तर विसर्जन मिरवणुकीत का नाही? या प्रश्नापुढे डॉल्बीमुक्तीचे तीन तेरा होतात. त्यामुळे पहिले मोठे आव्हान राजारामपुरीत डॉल्बीला रोखणे हे असणार आहे. तेथे ब्रेक लागला तर ‘डॉल्बी’चा दणका विसर्जन मिरवणुकीत नक्कीच फुसका ठरेल, हे उघड गुपित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉल्बीमुक्तीला बळ मिळेल.दोन बेसची पळवाटंमोठ्या डॉल्बीऐवजी दोन बेस व दोन टॉप लावण्याची परवानगी म्हणजे डॉल्बीमुक्तीतील एक मोठी पळवाट आहे. कारण आज बाजारात ‘जेबीएल’सारख्या अत्याधुनिक साऊंड यंत्रणा आल्या आहेत. या केवळ दोन बेस दोन टॉपमधून मिरवणूक हादरवून टाकू शकतात. त्यांची आवाजाची मर्यादा १०० डेसिबलपेक्षा कितीतरी अधिक आहे. गुन्ह्याचीही भीती नाहीमिरवणुकीत एखाद्या मंडळाने डॉल्बी लावला तर आवाजाची तीव्रता तपासून पोलिसांकडून नंतर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, अनेक कार्यकर्ते असे गुन्हे अंगावर घ्यायला तयार असतात. काही मंडळांनी तसे कार्यकर्ते तयारच ठेवलेले असतात. मग केस पडली तर पडू दे, नंतर बघू, पण आता हलवून सोडू, अशीच मानसिकता त्यांची असते.