शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांनी रात्रभर भुंकून गावकऱ्यांना दिली महापुराची पूर्वसूचना, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:39 IST

मुक्या प्राण्याला येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते, असे म्हणतात, याची प्रचिती आली ती आंबेवाडी आणि चिखली गावात महापुराचे पाणी शिरले तेव्हा. महापुरापूर्वी भुंकून गावाला संकटाची पूर्वसूचना देणाऱ्या साऱ्याच कुत्र्यांनी १0 दिवसांनी गावात प्रवेश केला. या घटनेची सोशल मीडियासह सर्वत्र चर्चा होत आहे.

ठळक मुद्देकुत्र्यांनी भुंकून दिली होती आंबेवाडीकरांना पूर्वसूचनामहापुरानंतर सारे परतले गावात

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : मुक्या प्राण्याला येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते, असे म्हणतात, याची प्रचिती आली ती आंबेवाडी आणि चिखली गावात महापुराचे पाणी शिरले तेव्हा. महापुरापूर्वी भुंकून गावाला संकटाची पूर्वसूचना देणाऱ्या साऱ्याच कुत्र्यांनी १0 दिवसांनी गावात प्रवेश केला. या घटनेची सोशल मीडियासह सर्वत्र चर्चा होत आहे.कुत्रे हे निसर्गाशी आणि माणसाशी एकरूप झालेला सस्तन प्राणी आहे. कुत्र्याचे ओरडणे अशुभ मानले जाते; परंतु अंधश्रद्धेचा भाग सोडला, तर कुत्रा हा माणसाच्या सर्वांत जवळचा आणि विश्वासू प्राणी आहे. सहावे इंद्रिय असणाऱ्या या कुत्र्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लागली, की ते सावधगिरीचा इशारा देत असतात; त्यामुळे या कुत्र्यांनी रात्रभर भुंकून एकाअर्थी ग्रामस्थांना येणाºया संकटाबद्दल पूर्वसूचनाच दिली होती.

आंबेवाडी या गावातील कुत्र्यांची सारी जमात महापुराआधी रात्रभर भुंकत होती. लोकांनी या कुत्र्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या प्रजननाचा काळ असावा म्हणून ती ओरडत असतील, असा समज लोकांनी करून घेतला; पण महापुरानंतर याचा खुलासा साऱ्यांना झाला. सगळीच कुत्री ओरडून रात्रीच गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेली होती.

ग्रामस्थ जेव्हा सकाळी उठले तेव्हा प्रत्येकाच्या घरात पाणी शिरले होते. महापूर ओसरल्यानंतर पुढच्या १0 दिवसांत ही सारीच्या सारी कुत्री गावात परत आल्यामुळे सारेचजण अचंबित झाले. 

 

पाणी वाढू लागले, तशी गावातील सारी कुत्री कुठेतरी निघून गेली. आदल्या रात्री त्यांनी गाव भुंकून भुंकून गोळा केला होता. आता पाणी कमी झाल्यावर ही सगळी कुत्री परत गावात आसऱ्याला आली आहेत. त्यांच्यासोबत एक मांजरीही घराच्या खापऱ्यावर चढून बसली होती. नंतर ती बंगल्याच्या छतावर गेली होती, तीही परत आली आहे.राकेश काटकर, ग्रामस्थ, आंबेवाडी

नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना प्राणी विशेषत: जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना मिळते; कारण त्यांची घ्राणेंद्रिये अतिशय संवेदनशील आणि तीव्र असतात. भूकंप आणि त्सुनामीवेळीही एकही प्राणी मृत झाल्याची उदाहरणे नाहीत; पंरतु या घटनेला अद्यापतरी वैज्ञानिक आधार मिळालेला नाही. हा संशोधनाचा भाग आहे.- डॉ. मधुकर बाचुळकर,पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर

शेपूट असणाऱ्या सर्वच प्राण्यांमध्ये निसर्गातील घडामोडी लवकर समजतात. सरडे, साप, कीटक अशा जिवांना येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागत असते. कुत्रा हा माणसाच्या आणि निसर्गाच्याही जवळचा आहे. त्यांच्या शरीरातील मूलभूत चक्रांमुळे ही जाणीव त्यांना होत असते. हा निसर्गनियम आहे. त्यामुळेच त्यांनी इशारा दिला असेल. निसर्गाशी माणूसही एकरूप होऊ शकतो. ध्यानधारणेमुळे मनुष्याला याची जाणीव होऊ शकते. आपले सहावे इंद्रिय अशावेळी आपल्याला इशारा देत असते. फक्त आपण ते कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असल्यामुळे समजू शकत नाही.- डॉ. अनिल पाटील,श्वानचिकित्सक, कोल्हापूर.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरdogकुत्रा