शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष जगविण्याचे काम करा

By admin | Updated: July 2, 2016 00:58 IST

चंद्रकांतदादा पाटील : शिवाजी विद्यापीठात सहा हजार वृक्षांचे रोपण

कोल्हापूर : वृक्षारोपण जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते जगविणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण लावलेले वृक्ष जगविण्याचे काम करा. निसर्ग संवर्धनासाठी अधिक वृक्ष लावा आणि ते जगवा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्ष लागवड आणि कृषी सप्ताहाचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, पालक सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, वनविभागाचे मुख्य संरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, कृषि अधीक्षक बसवराज मास्तोळी प्रमुख उपस्थित होते. वनविभाग, शिवाजी विद्यापीठ, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यात ५० कोटी वृक्ष लावण्याची गरज आहे. त्याअंतर्गत यंदा २ कोटी वृक्ष लावण्याचे सरकारचे ध्येय असले तरी, प्रत्यक्षात ४ कोटी वृक्षांची लागवड होईल. वृक्षारोपणाचा हा उपक्रम लोकचळवळ व्हावी. खासदार महाडिक म्हणाले, दुष्काळ व वातावरणातील बदलांमुळे वृक्षांचे महत्त्व आपल्या समजले आहे. त्यामुळे वृक्षारोपणाच्या चळवळीत प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देऊन वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून जिल्ह्णात वीस हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत.यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या चळवळीअंतर्गत विद्यापीठ एकूण १५ हजार झाडे लावणार आहे. प्रत्येक कुटुंबाने किमान तीन वृक्षांचे रोपण करून जगविण्याचे काम करावे. जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, या वृक्षलागवड चळवळीअंतर्गत जिल्ह्णात ८ लाख वृक्षांची लागवड करून १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. लागवड केलेल्या वृक्षांची ‘नरेगा’अंतर्गत संवर्धन तसेच रोपलावणीतून ऊस उत्पादन कार्यक्रम केला जाईल. वनसंरक्षक एम. के. राव म्हणाले, वनविभागाचा हा महोत्सव लोकचळवळ बनविली जाईल. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने त्यांचे रोपण, संवर्धनासाठी योगदान द्यावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री पाटील व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप, अधिक पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक टी. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तुम्हाला एकच का?कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसादिनी सुरू केलेल्या कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाची माहिती दिली. याअंतर्गत रस्ता दुभाजकांमधील झाडांची निगा राखण्यासाठी ३० माळी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अशा स्वरूपातील काम प्रत्येकाने केले पाहिजे. खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे जे आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत, त्यांनी आवाहन केले की, लोक त्यांना मोठ्या प्रमाणावर देणगी देतात, त्यांनी असा निर्णय घेतला पाहिजे की, मी शंभर माळ्यांची नियुक्ती करीन. माझी आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी एक माळी नियुकत करीन, असा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे पाहत त्यांनी हसत-हसत उल्लेख केला. त्यावर खासदार महाडिक यांनी ‘तुम्हाला एकच का?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावर ‘गिरणी कामगाराचा मुलगा मी,’ असे मंत्री पाटील यांनी उत्तर दिले. त्याला खासदार महाडिक यांनी ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असे प्रत्युत्तर देताच उपस्थितांमध्ये एकच हास्य पसरले.