शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कुटुंबाप्रमाणे उमेदवारांचे काम करा

By admin | Updated: February 1, 2017 23:07 IST

नारायण राणे : वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा; इच्छुक उमेदवारांचा घेतला आढावा

वेंगुर्ले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. काँग्रेस पक्ष हे आपले एक कुटुंब आहे. या कुटुंबातील इच्छुक सर्वच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, पण तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी नाराज न होता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करावा. तुमच्या प्रामाणिकपणाची व निष्ठेची पक्ष नक्कीच दखल घेईल, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान केले. वेंगुर्ले येथे हॉटेल कोकण किनारामध्ये तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नारायण राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, विभागीय अध्यक्ष विलास ठाकूर, राजबा सावंत, देऊ साळगावकर, मनवेल फर्नांडिस, प्रकाश राणे, माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, नीलेश सामंत, दादा कुबल, समीर नाईक, जयप्रकाश चमणकर, वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, वसंत तांडेल, जगन्नाथ डोंगरे, चित्रा कनयाळकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रीतेश राऊळ, बाळू परब, नगरसेवक विधाता सावंत, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, पूनम जाधव आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान प्रथम राणे यांनी प्रत्येक विभागीय अध्यक्षांकडून त्या त्या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची माहिती जाणून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करावी की नाही याबाबतही काहींनी आपली मते मांडली. तर तालुकाध्यक्ष दळवी यांनी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण जे उमेदवार द्याल, त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार वसंत तांडेल यांनी मानले. (प्रतिनिधी)सरकारची फसवेगिरी लोकांना सांगाम्हणूनच या निवडणुकीच्या प्रचाराला जाताना सरकारची फसवेगिरी लोकांना सांगा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अंतिम उमेदवार निवडीची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशांनाच काँग्रेस पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. मात्र, ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. तुमचाही विचार भविष्यात पक्ष नक्की करेल, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्याचा विकास थांबला आहेसर्वांची मते जाणून घेतल्यानंतर व इच्छुक उमेदवारांबाबत माहिती घेतल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने आजही काँग्रेसकडे आहेत. या जिल्ह्यातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रचाराला जाताना मोदी लाटेची हवा येऊन केंद्र्रात व राज्यात सत्तेत आलेल्या सेना-भाजपच्या सरकारमुळे जनतेचे कसे नुकसान होत आहे, हे त्यांना पटवून सांगा. नोटाबंदीच्या नावाखाली झालेल्या कारवाईत सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागला. आजही स्वत:चे बँकेतील पैसे काढण्यासाठी या सरकारने मर्यादा ठेवल्या आहेत. अशी कारवाई करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. या नोटाबंदीमुळे बाजारपेठा मंदीच्या छायेत आहेत. व्यापार, उद्योग थांबले आहेत. सरकारची ही चुकीची धोरणे लोकांना जाऊन सांगा. सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे, पण या जिल्ह्याचा विकास थांबला आहे.