शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

कुटुंबाप्रमाणे उमेदवारांचे काम करा

By admin | Updated: February 1, 2017 23:07 IST

नारायण राणे : वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा; इच्छुक उमेदवारांचा घेतला आढावा

वेंगुर्ले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. काँग्रेस पक्ष हे आपले एक कुटुंब आहे. या कुटुंबातील इच्छुक सर्वच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, पण तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी नाराज न होता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करावा. तुमच्या प्रामाणिकपणाची व निष्ठेची पक्ष नक्कीच दखल घेईल, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान केले. वेंगुर्ले येथे हॉटेल कोकण किनारामध्ये तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नारायण राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, विभागीय अध्यक्ष विलास ठाकूर, राजबा सावंत, देऊ साळगावकर, मनवेल फर्नांडिस, प्रकाश राणे, माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, नीलेश सामंत, दादा कुबल, समीर नाईक, जयप्रकाश चमणकर, वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, वसंत तांडेल, जगन्नाथ डोंगरे, चित्रा कनयाळकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रीतेश राऊळ, बाळू परब, नगरसेवक विधाता सावंत, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, पूनम जाधव आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान प्रथम राणे यांनी प्रत्येक विभागीय अध्यक्षांकडून त्या त्या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची माहिती जाणून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करावी की नाही याबाबतही काहींनी आपली मते मांडली. तर तालुकाध्यक्ष दळवी यांनी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण जे उमेदवार द्याल, त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार वसंत तांडेल यांनी मानले. (प्रतिनिधी)सरकारची फसवेगिरी लोकांना सांगाम्हणूनच या निवडणुकीच्या प्रचाराला जाताना सरकारची फसवेगिरी लोकांना सांगा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अंतिम उमेदवार निवडीची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशांनाच काँग्रेस पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. मात्र, ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. तुमचाही विचार भविष्यात पक्ष नक्की करेल, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्याचा विकास थांबला आहेसर्वांची मते जाणून घेतल्यानंतर व इच्छुक उमेदवारांबाबत माहिती घेतल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने आजही काँग्रेसकडे आहेत. या जिल्ह्यातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रचाराला जाताना मोदी लाटेची हवा येऊन केंद्र्रात व राज्यात सत्तेत आलेल्या सेना-भाजपच्या सरकारमुळे जनतेचे कसे नुकसान होत आहे, हे त्यांना पटवून सांगा. नोटाबंदीच्या नावाखाली झालेल्या कारवाईत सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागला. आजही स्वत:चे बँकेतील पैसे काढण्यासाठी या सरकारने मर्यादा ठेवल्या आहेत. अशी कारवाई करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. या नोटाबंदीमुळे बाजारपेठा मंदीच्या छायेत आहेत. व्यापार, उद्योग थांबले आहेत. सरकारची ही चुकीची धोरणे लोकांना जाऊन सांगा. सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे, पण या जिल्ह्याचा विकास थांबला आहे.