शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
2
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
3
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
4
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
5
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
6
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
7
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
8
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
9
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
10
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
11
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
12
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
13
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
14
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
15
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
16
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
17
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
18
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
19
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाप्रमाणे उमेदवारांचे काम करा

By admin | Updated: February 1, 2017 23:07 IST

नारायण राणे : वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा; इच्छुक उमेदवारांचा घेतला आढावा

वेंगुर्ले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. काँग्रेस पक्ष हे आपले एक कुटुंब आहे. या कुटुंबातील इच्छुक सर्वच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, पण तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी नाराज न होता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करावा. तुमच्या प्रामाणिकपणाची व निष्ठेची पक्ष नक्कीच दखल घेईल, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान केले. वेंगुर्ले येथे हॉटेल कोकण किनारामध्ये तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नारायण राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, विभागीय अध्यक्ष विलास ठाकूर, राजबा सावंत, देऊ साळगावकर, मनवेल फर्नांडिस, प्रकाश राणे, माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, नीलेश सामंत, दादा कुबल, समीर नाईक, जयप्रकाश चमणकर, वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, वसंत तांडेल, जगन्नाथ डोंगरे, चित्रा कनयाळकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रीतेश राऊळ, बाळू परब, नगरसेवक विधाता सावंत, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, पूनम जाधव आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान प्रथम राणे यांनी प्रत्येक विभागीय अध्यक्षांकडून त्या त्या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची माहिती जाणून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करावी की नाही याबाबतही काहींनी आपली मते मांडली. तर तालुकाध्यक्ष दळवी यांनी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण जे उमेदवार द्याल, त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार वसंत तांडेल यांनी मानले. (प्रतिनिधी)सरकारची फसवेगिरी लोकांना सांगाम्हणूनच या निवडणुकीच्या प्रचाराला जाताना सरकारची फसवेगिरी लोकांना सांगा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अंतिम उमेदवार निवडीची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशांनाच काँग्रेस पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. मात्र, ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. तुमचाही विचार भविष्यात पक्ष नक्की करेल, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्याचा विकास थांबला आहेसर्वांची मते जाणून घेतल्यानंतर व इच्छुक उमेदवारांबाबत माहिती घेतल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने आजही काँग्रेसकडे आहेत. या जिल्ह्यातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रचाराला जाताना मोदी लाटेची हवा येऊन केंद्र्रात व राज्यात सत्तेत आलेल्या सेना-भाजपच्या सरकारमुळे जनतेचे कसे नुकसान होत आहे, हे त्यांना पटवून सांगा. नोटाबंदीच्या नावाखाली झालेल्या कारवाईत सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागला. आजही स्वत:चे बँकेतील पैसे काढण्यासाठी या सरकारने मर्यादा ठेवल्या आहेत. अशी कारवाई करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. या नोटाबंदीमुळे बाजारपेठा मंदीच्या छायेत आहेत. व्यापार, उद्योग थांबले आहेत. सरकारची ही चुकीची धोरणे लोकांना जाऊन सांगा. सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे, पण या जिल्ह्याचा विकास थांबला आहे.