शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नव्या वर्षात करणार ‘करो या मरो’ आंदोलन, लिंगायत समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:28 IST

लिंगायत धर्माला संविधानिक दर्जा मिळावा, यासह विविध मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने दि. ३१ डिसेंबरपूर्वी करावी. अन्यथा नव्या वर्षात ‘करो या मरो’ राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा लिंगायत संघर्ष समितीने पुणे येथे दिला आहे, अशी माहिती समितीच्या कार्याध्यक्ष सरलाताई पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देनव्या वर्षात करणार ‘करो या मरो’ आंदोलन, लिंगायत समाजाचा इशारासरकारला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, लिंगायत संघर्ष समितीची पुणे येथे झाली बैठक

कोल्हापूर : लिंगायत धर्माला संविधानिक दर्जा मिळावा, यासह विविध मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने दि. ३१ डिसेंबरपूर्वी करावी. अन्यथा नव्या वर्षात ‘करो या मरो’ राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा लिंगायत संघर्ष समितीने पुणे येथे दिला आहे, अशी माहिती समितीच्या कार्याध्यक्ष सरलाताई पाटील यांनी दिली.याबाबत कार्याध्यक्ष सरलाताई पाटील यांनी सांगितले की, लिंगायत संघर्ष समितीची पुणे येथे बुधवारी (दि.५) बैठक झाली. त्यामध्ये लिंगायत धर्माला संविधानिक दर्जा मिळावा. अल्पसंख्यांक दर्जा मिळावा. लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना ओबीसीचे आरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी लिंगायत समाजाने दिलेल्या लढ्याचा, केलेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला.

मागण्यांच्या पूर्ततेबाबत तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विद्यमान भाजप-शिवसेना सरकारने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सर्व मागण्यांच्या मान्यतेसाठी आता पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे.त्याचे स्वरूप हे ‘करो या मरो’ स्वरूपाचे असणार आहे. आम्ही राज्य सरकार, शासनाला दि. ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देत आहोत. यावर्षीच मागण्या मान्य व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.

या बैठकीस समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी, समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, अनिल रूद्रके, महासचिव भगवान कोठावळे, कोषाध्यक्ष श्रीकांत तोडकर, युवक आघाडी अध्यक्ष अमित झगडे उपस्थित होते.

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाkolhapurकोल्हापूर