शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

पाण्याची चिंता नको; मेअखेर पुरेसा साठा

By admin | Updated: April 30, 2017 01:02 IST

काटकसरीने वापरणे गरजेचे : चित्री, चिकोत्रा खोऱ्यातच टंचाई शक्य

कोल्हापूर : मेच्या अखेरपर्यंत वळीव पाऊस झाला नाही तरी जिल्ह्यातील शेतीला व पिण्यासाठी लागणारा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी बुधवारी दिली. पाणी उपलब्ध असले तरी लोकांनी त्याचा काटकसरीने वापर करावा व यापुढील काळात शेतीसाठी ठिबक सिंचनला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवारणाची बैठक झाली. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावांची नावे जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर टंचाईची तीव्रता नक्की किती आहे, यासंबंधीची माहिती ‘लोकमत’ने घेतली.कोल्हापूर हा ‘पाणीदार जिल्हा’ असल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीही फारशी कधी टंचाई भासत नाही. आता जी ७३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत, त्यास प्रशासनाचा गलथानपणा आणि काही ठिकाणी गावांचेही दोष कारणीभूत आहेत. गतवर्षी पर्जन्यमान चांगले झाले आहे. सगळे पाटबंधारे प्रकल्प भरले होते. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या तरी पाण्यासाठी चिंता करण्याचे कारण नाही. शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध आहे. साधारणत: मे अखेरपर्यंत पाऊस झाला नाही तरी काळजी करण्याचे काम नाही; परंतु मान्सून लांबलाच तर मात्र अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे साधारणत: मे मध्ये एक-दोन चांगले वळीव होतात तसे झालेच तर पिकांची एका पाण्याची तहान भागू शकते. जिल्हा परिषद प्रतिवर्षी टंचाईचा आराखडा तयार करते, परंतु तो अंमलात कमी व कागदावरच जास्त राहतो. हा आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर होऊन मंजुरीची प्रक्रिया होईपर्यंत एखादा पाऊस होतो व टंचाईची तीव्रता कमी झाली की, त्या आराखड्याचे पुढे काय झाले हे पुढील वर्षाचा मे उजाडेपर्यंत कोण पाहत नाही. (प्रतिनिधी)१चित्री, चिकोत्राचे नियोजनचित्री प्रकल्पामध्ये ००.४०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. एका उन्हाळी आवर्तनासाठी ००.२५० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. उर्वरित साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागातून सांगण्यात आले. हिरण्यकेशी नदीवर २८ एप्रिल ते १७ मेपर्यंत व २५ मेपासून अंशत: उपसा बंदी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ३१ व आजरा तालुक्यांतील २३ गावांचा समावेश होतो.२ चिकोत्रा प्रकल्पामध्ये ००.२५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठी उपलब्ध आहे. उन्हाळी आवर्तनासाठी ००.१०० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता असून उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पावर २९ एप्रिल ते १४ मे व २६ मे ते १० जूनपर्यंत उपसाबंदी प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये कागल तालुक्यातील १९, आजऱ्यातील ३ व भुदरगडमधील ५ गावांचा समावेश आहे.पाणी वापरते कोण..?ग्राहकलोकसंख्यावार्षिक वापरउर्वरितसाठी आवश्यकमहापालिका५ लाख ४९ हजार१.७७६००.४०४नगरपालिका३ लाख ११ हजार०.०३४००.००८नगरपरिषद१ लाख १ हजार०.७६००.०१७ग्रामपंचायती२५ लाख ६५ हजार१.५१८००.३४५इतर घरगुती९०००.००६००.००१एमआयडीसी१० हजार ५०००.३६९०.०८४साखर कारखाने१५ हजार०.४०५०.०९२इतर उद्योग३ हजार०.१८३०.०४२एकूण४.३६८०.९९३वीज जोडण्या‘महावितरण’कडे ३० मार्च २०१६ अखेर ८१७९ व गतवर्षात ५६७२ असे १३८५१ वीज जोडणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६७५२ पंपांना वीज जोडणी दिली असून ७०९९ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. मार्च २०१८ अखेर १० हजार ९९ जोडण्या देण्यात येणार आहेत.