शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची चिंता नको; मेअखेर पुरेसा साठा

By admin | Updated: April 30, 2017 01:02 IST

काटकसरीने वापरणे गरजेचे : चित्री, चिकोत्रा खोऱ्यातच टंचाई शक्य

कोल्हापूर : मेच्या अखेरपर्यंत वळीव पाऊस झाला नाही तरी जिल्ह्यातील शेतीला व पिण्यासाठी लागणारा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी बुधवारी दिली. पाणी उपलब्ध असले तरी लोकांनी त्याचा काटकसरीने वापर करावा व यापुढील काळात शेतीसाठी ठिबक सिंचनला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवारणाची बैठक झाली. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावांची नावे जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर टंचाईची तीव्रता नक्की किती आहे, यासंबंधीची माहिती ‘लोकमत’ने घेतली.कोल्हापूर हा ‘पाणीदार जिल्हा’ असल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीही फारशी कधी टंचाई भासत नाही. आता जी ७३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत, त्यास प्रशासनाचा गलथानपणा आणि काही ठिकाणी गावांचेही दोष कारणीभूत आहेत. गतवर्षी पर्जन्यमान चांगले झाले आहे. सगळे पाटबंधारे प्रकल्प भरले होते. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या तरी पाण्यासाठी चिंता करण्याचे कारण नाही. शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध आहे. साधारणत: मे अखेरपर्यंत पाऊस झाला नाही तरी काळजी करण्याचे काम नाही; परंतु मान्सून लांबलाच तर मात्र अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे साधारणत: मे मध्ये एक-दोन चांगले वळीव होतात तसे झालेच तर पिकांची एका पाण्याची तहान भागू शकते. जिल्हा परिषद प्रतिवर्षी टंचाईचा आराखडा तयार करते, परंतु तो अंमलात कमी व कागदावरच जास्त राहतो. हा आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर होऊन मंजुरीची प्रक्रिया होईपर्यंत एखादा पाऊस होतो व टंचाईची तीव्रता कमी झाली की, त्या आराखड्याचे पुढे काय झाले हे पुढील वर्षाचा मे उजाडेपर्यंत कोण पाहत नाही. (प्रतिनिधी)१चित्री, चिकोत्राचे नियोजनचित्री प्रकल्पामध्ये ००.४०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. एका उन्हाळी आवर्तनासाठी ००.२५० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. उर्वरित साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागातून सांगण्यात आले. हिरण्यकेशी नदीवर २८ एप्रिल ते १७ मेपर्यंत व २५ मेपासून अंशत: उपसा बंदी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ३१ व आजरा तालुक्यांतील २३ गावांचा समावेश होतो.२ चिकोत्रा प्रकल्पामध्ये ००.२५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठी उपलब्ध आहे. उन्हाळी आवर्तनासाठी ००.१०० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता असून उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पावर २९ एप्रिल ते १४ मे व २६ मे ते १० जूनपर्यंत उपसाबंदी प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये कागल तालुक्यातील १९, आजऱ्यातील ३ व भुदरगडमधील ५ गावांचा समावेश आहे.पाणी वापरते कोण..?ग्राहकलोकसंख्यावार्षिक वापरउर्वरितसाठी आवश्यकमहापालिका५ लाख ४९ हजार१.७७६००.४०४नगरपालिका३ लाख ११ हजार०.०३४००.००८नगरपरिषद१ लाख १ हजार०.७६००.०१७ग्रामपंचायती२५ लाख ६५ हजार१.५१८००.३४५इतर घरगुती९०००.००६००.००१एमआयडीसी१० हजार ५०००.३६९०.०८४साखर कारखाने१५ हजार०.४०५०.०९२इतर उद्योग३ हजार०.१८३०.०४२एकूण४.३६८०.९९३वीज जोडण्या‘महावितरण’कडे ३० मार्च २०१६ अखेर ८१७९ व गतवर्षात ५६७२ असे १३८५१ वीज जोडणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६७५२ पंपांना वीज जोडणी दिली असून ७०९९ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. मार्च २०१८ अखेर १० हजार ९९ जोडण्या देण्यात येणार आहेत.