शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

माझ्या पार्थिवाला हातही लावू नका, जवानाचा राजकारण्यांना संदेश

By admin | Updated: March 13, 2017 21:16 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानाने राजकारणी आणि भ्रष्ट शासकीय अधिका-यांना आपल्यापासून दूर राहण्याचा फलक गावात उभारला

संदिप आडनाईक / ऑनलाइन लोकमत
चंदगड, दि. 13 -  कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानाने राजकारणी आणि भ्रष्ट शासकीय अधिका-यांना आपल्यापासून दूर राहण्याचा फलक गावात उभारला आहे, तसेच यासंदर्भात एक व्हिडिओही प्रसिध्द केला आहे. भारतीय सैन्यातील तेजबहाद्दूर सिंह याच्या पाठोपाठ आता या जवानानेही सरकारविरोधात उघड भूमिका घेतली आहे.
 जर मी देशाचं रक्षण करत असताना शहीद झालो, तर नितीमत्ता, भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाºयांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये, ही माझी अंतिम इच्छा आहे, असे या जवानाने म्हटलेले आहे.
चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे या गावचे जवान लान्स नायक रणजीत गावडे यांनी गावात हा भव्य फलक लावलेला आहे. दिवसेंदिवस भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द वापरले जा असल्याने गावडे यांनी हा फलक लावलेला आहे. त्यांनी उभारलेल्या या फलकात म्हटले आहे, की मी सैनिकी सेवा बजावत असताना मला वीरमरण आल्यास नितीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाºयांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये. ही माझी शेवटची इच्छा असेल, सन्मानाने जगण्यासाठी आणि या भुंकणाºया कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळ्यांनो संघटित व्हा, स्वाभिमानी सैनिक, लान्स हवालदार रणजित गावडे, म्हाळुंगे ता. चंदगड असा मजकूर या फलकावर लिहिलेला आहे. 
फलकावरील मजकूर...
त्यावेळीपण मीच होतो, आतापण मीच आहे, 
कधी सर्वांर्धाने, तर कधी स्वार्थाने लढलो आम्ही, 
लढत आहोत, आणि लढतच राहू, 
यातना कर्णाच्या सोसत राहू.
तोरणाचे तोरण, रायरेश्वरीची शपथ आम्हीच घेउ, 
वार झेलू छातीवरती 
कधी तानाजी बनून तर कधी बाजी 
देश रक्षणार्थ उचलल विडा, त्यासाठी सांडवू रक्ताचा सडा
दाही दिशा गरजल्या होत्या अश्वटापू
जय भवानी, जय शिवाजी आम्ही गरजतच राहू
तुफान, सुसाट उडवून दिली आम्ही शाही, 
कापून आणला शिरपेच, जलप्रतिबिंब नजरेस घेवू काफिराच्या,
तरीपण शल्यविशल्य जडतच राहिल,
पाणीपतची हार आम्हाला घोंगावतच राहिल
कोरड्या आमच्या जखमांना लालमाती हुंगतच राहिल.
राजे, या राजी उरलेत आता चोर
देश विका, धर्म विका, विका म्हणतात गोत,
आदिलाशही, मोगलशाही संपली आता राजेशाही
येथे आता जन्माला येतात रोजच नवे पुढारी,
मग कोणी आम्हाला बलात्कारी म्हणतोच, 
तर कोणी आमची अब्रू वेशीला टांगतोच
कोणी सांगतोय आम्ही मरण्यासाठीच असतोय,
तर कोणी आमची अक्कल काढतोय,
मग का लढावे, प्रश्न पडतो, प्रश्न घेवूनच आम्ही जगतोय,
पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय, त्यावेळीपण मीच होता, आतापण मीच आहे
कधी सर्वांर्थाने तर कधी स्वार्थाने लढलो आम्ही, 
लढत आहोत आणि लढतच राहू,
असेल शेवटी काहीतरी, लढणारा तो मीच सैनिक आहे राजे