शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

‘महासत्ता’ नव्हे ‘बलशाली’ होऊया !

By admin | Updated: December 23, 2016 23:06 IST

प्रताप आसबे : लोकशाही मूल्यांवर राष्ट्राची पुनर्बांधणी करायला हवी

गडहिंग्लज : जागतिकीकरणामुळे देशातील सर्व प्रश्नांचे संदर्भ बदलले आहेत. जनतेतील वाढते नैराश्य आणि बेरोजगारीमुळे लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातील शक्तींनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय व समतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी लोकशाही आणि सामाजिक मूल्यांवरच राष्ट्राची पुनर्बांधणी करायला हवी. किंबहुना देशाला महासत्ता नव्हे, तर बलशाली बनविण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी केले.गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘आजचे वर्तमान : कुठपासून..कुठंपर्यंत..!’ या विषयावर त्यांनी पाचवे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी शिवणे गुरुजी होते. निवृत्ती कदम, धनाजी शेटके यांची प्रमुख उपस्थिती होती.आसबे म्हणाले, १९९० मध्ये भारताने जागतिकीकरण स्वीकारले. त्यामुळे संपत्तीच्या विक्रेंद्रीकरणाऐवजी केंद्रीकरणच अधिक झाले, भ्रष्टाचार बळावला. आंध्रातून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र विदर्भ-मराठवाड्यात आणि राज्यभर पोहोचले आहे. यामुळेच सामाजिक प्रश्नांची भीषणता वाढली आहे.विविधतेतही एकात्मता जोपासणाऱ्या भारताचा इतिहास गौरवशाली आहे. सत्याग्रह आणि अहिंसात्मक चळवळीतून मिळालेल्या भारतीय स्वातंत्र्याचे आजचे जगाला अप्रुप आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर समतेच्या तत्त्वावर आधारित राष्ट्राच्या बांधणीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले, असेही आसबे यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. नगरसेवक राजेश बोरगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाळासाहेब गुरव यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक नितीन देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘गडहिंग्लजकरां’चे अभिनंदन..!१९७४ मध्ये श्रीपतराव शिंदे यांनी बोलविल्यामुळे मी गडहिंग्लजला आलो होतो. यावेळी त्यांच्या कन्येने बोलविले आहे. चार दशके शिंदेंचा गडहिंग्लजवरील ठसा कायम आहे आणि त्याला सामाजिक न्यायाची बूज आहे, याचा मला विशेष आनंद आहे. त्याबद्दल मी गडहिंग्लजकरांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत संपूर्ण राज्यात स्वत:ची वेगळी ओळख जपलेल्या गडहिंग्लजकरांचे आसबे यांनी कौतुक केले.‘अतिरेकी राष्ट्रवाद’ मारकचदोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या केंद्रातील राज्यकर्त्यांकडून अतिरेकी राष्ट्रवादाची भूमिका घेतली जात आहे. संसदेचे महत्त्वदेखील कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या खाण्या-पिण्याच्या परंपरेवरही निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे हिटलरशाहीप्रमाणे हा अतिरेकी राष्ट्रवादही देशाच्या एकतेला व अखंडतेला मारकच आहे, असेही आसबे यांनी नमूद केले.साने गुुुरुजीलोकशिक्षण व्याख्यानमाला