शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘महासत्ता’ नव्हे ‘बलशाली’ होऊया !

By admin | Updated: December 23, 2016 23:06 IST

प्रताप आसबे : लोकशाही मूल्यांवर राष्ट्राची पुनर्बांधणी करायला हवी

गडहिंग्लज : जागतिकीकरणामुळे देशातील सर्व प्रश्नांचे संदर्भ बदलले आहेत. जनतेतील वाढते नैराश्य आणि बेरोजगारीमुळे लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातील शक्तींनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय व समतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी लोकशाही आणि सामाजिक मूल्यांवरच राष्ट्राची पुनर्बांधणी करायला हवी. किंबहुना देशाला महासत्ता नव्हे, तर बलशाली बनविण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी केले.गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘आजचे वर्तमान : कुठपासून..कुठंपर्यंत..!’ या विषयावर त्यांनी पाचवे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी शिवणे गुरुजी होते. निवृत्ती कदम, धनाजी शेटके यांची प्रमुख उपस्थिती होती.आसबे म्हणाले, १९९० मध्ये भारताने जागतिकीकरण स्वीकारले. त्यामुळे संपत्तीच्या विक्रेंद्रीकरणाऐवजी केंद्रीकरणच अधिक झाले, भ्रष्टाचार बळावला. आंध्रातून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र विदर्भ-मराठवाड्यात आणि राज्यभर पोहोचले आहे. यामुळेच सामाजिक प्रश्नांची भीषणता वाढली आहे.विविधतेतही एकात्मता जोपासणाऱ्या भारताचा इतिहास गौरवशाली आहे. सत्याग्रह आणि अहिंसात्मक चळवळीतून मिळालेल्या भारतीय स्वातंत्र्याचे आजचे जगाला अप्रुप आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर समतेच्या तत्त्वावर आधारित राष्ट्राच्या बांधणीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले, असेही आसबे यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. नगरसेवक राजेश बोरगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाळासाहेब गुरव यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक नितीन देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘गडहिंग्लजकरां’चे अभिनंदन..!१९७४ मध्ये श्रीपतराव शिंदे यांनी बोलविल्यामुळे मी गडहिंग्लजला आलो होतो. यावेळी त्यांच्या कन्येने बोलविले आहे. चार दशके शिंदेंचा गडहिंग्लजवरील ठसा कायम आहे आणि त्याला सामाजिक न्यायाची बूज आहे, याचा मला विशेष आनंद आहे. त्याबद्दल मी गडहिंग्लजकरांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत संपूर्ण राज्यात स्वत:ची वेगळी ओळख जपलेल्या गडहिंग्लजकरांचे आसबे यांनी कौतुक केले.‘अतिरेकी राष्ट्रवाद’ मारकचदोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या केंद्रातील राज्यकर्त्यांकडून अतिरेकी राष्ट्रवादाची भूमिका घेतली जात आहे. संसदेचे महत्त्वदेखील कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या खाण्या-पिण्याच्या परंपरेवरही निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे हिटलरशाहीप्रमाणे हा अतिरेकी राष्ट्रवादही देशाच्या एकतेला व अखंडतेला मारकच आहे, असेही आसबे यांनी नमूद केले.साने गुुुरुजीलोकशिक्षण व्याख्यानमाला