शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 17:20 IST

राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे उपस्थित होते.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नकोकाँगे्रेस आमदारांची जिल्हाधिकाय्रांकडे मागणी

कोल्हापूर : राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे उपस्थित होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईचे अध्यादेश काढला. तीन महिने होत आले तरी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही. ९ हजार घरे पूर्णत: पडली असून ३१ हजार पेक्षा जास्त घरांची अंशत: नुकसान झाले आहे.

संबंधिताना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच ग्रामिण भागातील कुटूंबांना २४ हजार तर शहरी भागातील कुटूंबियांना ३६ हजार घरभाडे देण्यात येणार होते. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. हीच परिस्थिती व्यापारी वर्गाची आहे. याचबरोबर एकाच घरात दोन कुटूंब असणाय्रा एका कुटूंबालाच अनुदान मिळाले आहे.

तीन महिन्याचे शेतीसाठी लागणारी वीज बील माफ करण्यात येणार होते. याचीही अंमलबजावणी झालेली नाही. पाच हजार रूपये अनुदान मिळाले मात्र. दुसय्रा टप्प्यातील दहा हजार रूपये केव्हा मिळणार आहेत, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.आमदार पी.एन. पाटील यांनी महापूरामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तीन एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्यास शासन केवळ एका एकारची नुकसान भरपाई देत आहे. खराब झालेल्या रस्त्यांचे बांधकाम विभागाने इस्टीमेट केली असून तातडीने रस्ते करण्यात यावेत. अशी मागणी केली.

यावेळी आमदार राजू आवळे यांनी महापूरामुळे शेती, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. नागरीकांचे प्रचंड नुकसान झाले असून प्रत्येकाला शासनाने जाहीर केलेल्या नुसार मदत पोहचली पाहिजे, असे सांगितले. यावेळी भैया माने, शशिकांत खोत आदी उपस्थित होते.

७८ हेक्टर शेतीच्या क्षेत्राचा सर्व्हे झाला आहे. पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी रूपये जमा झाले आहेत. प्रत्येकी पाच हजार रूपये वाटप झाले असून दुसय्रा टप्प्यातील दहा हजार रूपयांचे वाटप सुरू आहे. अपार्टमेंटमधील कुटूंबियांना नुकसान भरपाई दिली जात आहे. महिलांच्या नावे रक्कम जमा होत असून अनेकांची बँक खाती नसल्यामुळे रक्कम मिळू शकलेल्या नाहीत. नदी आणि नाल्या लगत सरंक्षक भिंती उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र निधी दिला जात असून यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करू.जिल्हाधिकारीदौलत देसाई

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसfloodपूरkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी