शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 17:20 IST

राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे उपस्थित होते.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नकोकाँगे्रेस आमदारांची जिल्हाधिकाय्रांकडे मागणी

कोल्हापूर : राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे उपस्थित होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईचे अध्यादेश काढला. तीन महिने होत आले तरी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही. ९ हजार घरे पूर्णत: पडली असून ३१ हजार पेक्षा जास्त घरांची अंशत: नुकसान झाले आहे.

संबंधिताना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच ग्रामिण भागातील कुटूंबांना २४ हजार तर शहरी भागातील कुटूंबियांना ३६ हजार घरभाडे देण्यात येणार होते. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. हीच परिस्थिती व्यापारी वर्गाची आहे. याचबरोबर एकाच घरात दोन कुटूंब असणाय्रा एका कुटूंबालाच अनुदान मिळाले आहे.

तीन महिन्याचे शेतीसाठी लागणारी वीज बील माफ करण्यात येणार होते. याचीही अंमलबजावणी झालेली नाही. पाच हजार रूपये अनुदान मिळाले मात्र. दुसय्रा टप्प्यातील दहा हजार रूपये केव्हा मिळणार आहेत, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.आमदार पी.एन. पाटील यांनी महापूरामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तीन एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्यास शासन केवळ एका एकारची नुकसान भरपाई देत आहे. खराब झालेल्या रस्त्यांचे बांधकाम विभागाने इस्टीमेट केली असून तातडीने रस्ते करण्यात यावेत. अशी मागणी केली.

यावेळी आमदार राजू आवळे यांनी महापूरामुळे शेती, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. नागरीकांचे प्रचंड नुकसान झाले असून प्रत्येकाला शासनाने जाहीर केलेल्या नुसार मदत पोहचली पाहिजे, असे सांगितले. यावेळी भैया माने, शशिकांत खोत आदी उपस्थित होते.

७८ हेक्टर शेतीच्या क्षेत्राचा सर्व्हे झाला आहे. पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी रूपये जमा झाले आहेत. प्रत्येकी पाच हजार रूपये वाटप झाले असून दुसय्रा टप्प्यातील दहा हजार रूपयांचे वाटप सुरू आहे. अपार्टमेंटमधील कुटूंबियांना नुकसान भरपाई दिली जात आहे. महिलांच्या नावे रक्कम जमा होत असून अनेकांची बँक खाती नसल्यामुळे रक्कम मिळू शकलेल्या नाहीत. नदी आणि नाल्या लगत सरंक्षक भिंती उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र निधी दिला जात असून यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करू.जिल्हाधिकारीदौलत देसाई

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसfloodपूरkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी