शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शाहू समाधिस्थळाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:43 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा देणारे समाधिस्थळ भूमिपूजनानंतर पाच वर्षे उलटली तरीही अपूर्णच आहे. सुमारे १० कोटी रुपये खर्चाचा हा समाधिस्थळाचा आराखडा अवघ्या दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना यंदा तरी हे समाधिस्थळ पूर्ण होणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. महापालिकेच्या ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा देणारे समाधिस्थळ भूमिपूजनानंतर पाच वर्षे उलटली तरीही अपूर्णच आहे. सुमारे १० कोटी रुपये खर्चाचा हा समाधिस्थळाचा आराखडा अवघ्या दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना यंदा तरी हे समाधिस्थळ पूर्ण होणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. महापालिकेच्या नेत्यांकडून व नगरसेवकांकडून पावलोपावली शाहूंच्या विचारांचा गजर होताना दिसतो; मात्र समाधिस्थळाच्या कामाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. सद्य:स्थितीत फक्त चबुतरा पूर्णत्वाच्या दिशेने असून, इतर बाबी अधांतरीच आहेत.१३ सप्टेंबर १९१६ रोजी राजर्षी शाहू महाराजांनीच त्यांचे समाधिस्थळ हे नर्सरी बागेत असावे, असे आदेशात लिहून ठेवले होते. त्यानुसार राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य पुढील पिढीपर्यंत प्रेरणादायी ठरावे यासाठी ‘सी’ वॉर्डातील नर्सरी बागेत हे समाधिस्थळ उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. २९ नोव्हेंबर २०१३ रोजी तत्कालीन महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुमारे १०७६९ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प साकारण्यासाठी पावले उचलली. वास्तुविशारद अभिजित जाधव-कसबेकर यांनी आराखडा तयार केला. मधल्या टप्प्यात चार महापौर होऊनही त्यांनी समाधिस्थळ पूर्णत्वात रस दाखविला नाही. गेल्याच वर्षी हे समाधिस्थळ पूर्ण करण्यासाठी तत्कालीन महापौर हसिना फरास यांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण, त्याच्या कारकिर्दीत चबुतऱ्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले. त्यानंतर मात्र हे काम रखडले ते अद्याप ‘जैसे थे’ स्थितीतच आहे.राजर्षी शाहूंच्या विचारास शोभेल, पावित्र राहील असे समाधिस्थळ असणाºया चबुतºयावर उभारण्यात येणारी ब्रॉँझची मेघडंबरी शंभर वर्षांपूर्वीची असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मेघडंबरी ओतीव पद्धतीने तयार करण्याचे काम बापट कॅम्पमधील शिल्पकार किशोर पुरेकर हे करीत आहेत. भूमिपूजनानंतर सुमारे पाच वर्षांचा कालावधी उलटला तरी फक्त चबुतºयाव्यतिरिक्त काम पुढे सरकत नसल्याचे वास्तव आहे.काम कासवगतीने : तट मारून संरक्षणनर्सरी बागेच्या विस्तीर्ण जागेत राजर्षी शाहू समाधिस्थळासोबत या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचे मंदिर विकसित करण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह विकसित करून तेथे २५० व्यक्ती बसण्याची क्षमता असणारे ऐतिहासिक वाटावे असे डिझाईनचे सभागृह, तेथे राजर्षी शाहू व डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारे संग्रहालय करण्यात येणार आहे; पण अद्याप तरी त्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.शिवाय समाधिस्थळाला संरक्षक भिंत व पादचारी मार्ग, तसेच बगीचा विकसित करणे, विद्युतीकरण व संरक्षक भिंत बांधण्याचे आराखड्यात नमूद आहे; पण यांपैकी काहीही झाले नसून संरक्षण भिंतीऐवजी तार मारून संरक्षणाचा प्रयत्न केला आहे.मेघडंबरीला‘जीएसटी’चा फटकासमाधिस्थळाच्या चबुतºयावर सुमारे अडीच टन ब्रॉँझ धातूने तयार करण्यात येणाºया मेघडंबरीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी सुमारे १७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे; पण ही मेघडंबरी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तिला सुमारे साडेतीन लाख रुपये ‘जीएसटी’चा फटका बसत आहे. या मेघडंबरीवर कलाकुसरीचे काम करण्यात येत आहे.