शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Diwali : सीमेवर तैनात जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:11 IST

चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई पाठविण्यात आली. त्यानिमित्त अयोध्या टॉवर्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात न. सी. सी. गु्रप कमांडर कर्नल राजेश शहा बोलत होते.

ठळक मुद्देयुनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना दिवाळी मिठाई रवानाभारतीय जवानांसाठी देशवासीयांचे प्रेम महत्त्वाचे : राजेश शहा

कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना दिवाळीनिमित्त घरची मिठाई मिळाल्यानंतरचा आनंद मोठा असतो; कारण प्रत्येक जवानाला युद्ध जिंकण्यासाठी देशवासियांचे प्रेम महत्त्वाचे असते; त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी दुणावतो, असे प्रतिपादन एन. सी. सी. गु्रप कमांडर कर्नल राजेश शहा यांनी केले. चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई पाठविण्यात आली. त्यानिमित्त अयोध्या टॉवर्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.कर्नल शहा म्हणाले, देशावरच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना दिवाळीची मिठाई खायला मिळणे म्हणजे पुण्याईचे काम आहे, अशा प्रकारच्या देशप्रेमामुळे आमच्या जवानांनी अनेक युद्धे जिंकली आहेत. त्यात १९९९ साली पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धही केवळ देशवासीयांच्या पाठबळ व प्रेमापोटीच जिंकले आहे.जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले, जीव तोडून देशाच्या सीमेवर देशवासीयांचे संरक्षण करणाºया जवानांकरिता हा कार्यक्रम म्हणजे घरच्या फराळाचा आस्वाद महत्त्वाचा आहे. जवान आणि किसान हे दोन्ही प्रामाणिकपणे काम करतात; त्यामुळे देशवासीयांची सर्व कामे सुरळीत सुरू आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आसाम रायफल्सचे जवान निलेश शिंदे व दिलीप पाटील यांनी ही मिठाई स्वीकारली.यानिमित्त कोळवण (ता. भुदरगड) येथील सामाजिक कार्यकर्ते सागर गुरव यांनाही मान्यवरांच्या हस्ते अत्यवस्थ रुग्णाच्या सेवेसाठी बोलेरो जीप प्रदान करण्यात आली. स्वागत कॅप्टन उत्तम पाटील यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्सचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रा. अरुण मराठे, पोलीस अधिकारी सचिन पाटील, रविकुमार चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर