शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST

गारपीट : सर्वत्र वळवाच्या सरी; जानराववाडीत वीज पडून शेतकरी ठार

सांगली : सांगली-मिरज शहरांसह संपूर्ण जिल्ह्याला शनिवारी वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मिरज तालुक्यातील जानराववाडीत वीज पडून एक ठार झाला. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. दिवसभर उकाडा वाढला असताना सायंकाळी वळीव पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्हाभरात दुपारनंतर प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला होता. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मिरज : मिरज व परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जानराववाडीत शेतात काम करणाऱ्या विलास सीताराम नाईक (वय ५०) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. खटावमध्ये पल्लाप्पा शिंगाडे यांच्या गोठ्यावर वीज पडून गाय आणि चार शेळ्यांचा मृत्यू झाला. गावातील परसू पाटील यांच्या घरातील पत्र्याचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेले. वादळी वाऱ्याने तालुक्यातील अनेक गावांत घरांचे, छपरांचे नुकसान झाले. मिरजेत पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. जोरदार वाऱ्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. इस्लामपूर : इस्लामपूर शहर व परिसरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पाच वाजता दहा मिनिटांसाठी व त्यानंतर सातच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस छोट्या गारांसह पडला. वाऱ्याचा जोर असल्याने पावसाची गती मध्यम राहिली. सुरुवातीला छोट्या आकाराच्या गारा पडल्या. सायंकाळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस अर्धा-पाऊण तास एकसारखा पडत होता. कासेगाव, वाटेगाव परिसरात तासभर सरी कोसळल्या. आष्टा व परिसरात सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. मागील चार दिवसांपासून दिवसभर उन्हाचा जोरदार तडाखा व सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. पावसाळी वातावरणासह विजेचा खेळखंडोबाही चालू आहे. जत : शहर आणि परिसरात सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पंधरा मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, डाळिंब, द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उन्हाळी कापूस, भुईमूग ऊस या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. मागील चार-पाच दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती, तर दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी हवेत ढग जमा होत होते; परंतु पाऊस पडत नव्हता. शनिवारी सायंकाळी पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले असले तरी, खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी शेतीची मशागत करता येणार आहे. तालुक्याच्या दक्षिण-उत्तर भागात हा पाऊस झाला असून पूर्व -पश्चिम भागात पाऊस झाला नाही. तासगाव : तासगाव शहरासह परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. शहरासह येळावी, कवठेएकंद, कुमठे, मणेराजुरी, बोरगाव, विसापूर, हातनूर परिसरात जोरदार पाऊस झाला. सावळज परिसरात वादळी वाऱ्याचा जोर होता. मात्र, तुरळक प्रमाणात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे रस्त्यावर मोडून पडली. त्यामुळे काही वेळासाठी जनजीवन विस्कळीत झाले. विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होऊन पाऊस पडला. पारे, बामणी, चिंचणी, कुर्ली, कार्वे, बलवडी (खा.) परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. आळसंद, वाझर, कमळापूर, भाळवणी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लेंगरे, माहुली व विटा परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वादळी वारे असल्याने आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पलूस : पलूस तालुक्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाली. वादळी वाऱ्याने पलूस-तासगाव रस्त्यावर झाले पडली. शिराळा तालुक्यात पुनवत परिसरात गडगडाटासह पाऊस कडेगाव तालुक्यातील कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे, चिंचणी, नेवरी, आसद येथे गारा पडल्या. आसदमध्ये झाडे पडली, विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या. तालुक्यातील बहुसंख्य गावांतील वीजपुरवठा खंडित झाला.