शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

जिल्ह्यास पावसाने झोडपले

By admin | Updated: July 23, 2014 00:34 IST

शेतकऱ्यांत समाधान : शिराळ्यात मुसळधार; वारणेकाठी सतर्कतेचा इशारा

सांगली : शिराळा, वाळवा, तासगाव, पलूस तालुक्यासह जिल्ह्यास आज (मंगळवारी) मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, जनजीवन मात्र विस्कळीत झाले. शिराळा : शिराळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला असून वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या २२ तासात १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये २०.३३ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. अंत्री बुद्रुक येथील बबन किसन चौगुले यांच्या दुमजली घराची भिंत कोसळल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. दि. २१ च्या रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. आज दिवसभरही लहान-मोठ्या सरी पडत होत्या. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच ओढ्या-नाल्यांतून पाणी वाहू लागले. कोकरूड, आरळा, चरण, वारणावती या परिसरात पावसाचा जोर होता. काही भागात दूरध्वनी सेवा तसेच वीजपुरवठा खंडित झाला होता. कोकरूड येथे चोवीस तासात ६६ मि.मी., तर चांदोली धरण परिसरात १०७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून अतिवृष्टी झाली आहे. चांदोली धरणात २०.३३ टी.एम.सी. पाणीसाठा झाला असून धरण ६० टक्के भरले आहे. धरण परिसरात आजअखेर ९९४ मि.मी. पाऊस पडला आहे.वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. जर असाच पाऊस सुरू राहिला, तर उद्यापर्यंत मांगले-काखे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात शिराळ्यात ३४ मि.मी. (एकूण २९०), शिरसी २९ (१४५), कोकरूड ६६ (३९६), चरण ४० (३९३), मांगले २३ (३०१), सागाव ७ (२७६), चांदोली धरण १०७ मि.मी. (एकूण ९३५) अशी पावसाची नोंद झाली आहे.तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र आज (मंगळवार) सकाळपासून दमदार पाऊस झाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पावसाची उघडझाप सुरू होती. आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यात ओढ्या-नाल्यांवरील सिमेंट, माती नालाबांधात पाणी साठले आहे. काही भागात शिवारात ताली भरल्या.तासगाव शहरात पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले. बसस्थानक परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे पाणी साचून प्रवाशांची दैना उडाली. ठिकठिकाणी गटारी तुंबल्याचेही चित्र आहे. मांजर्डे, आरवडे, बलगवडे, बस्तवडे, सावळज, वायफळे, जरंडी, डोंगरसोनी, कवठेएकंद, मणेराजुरी, उपळावी, येळावी, निमणी, विसापूर, हातनूर, शिरगाव, बोरगाव, कुमठे, आळते आदी परिसरात दमदार पाऊस बसरला. दिवसभर पडणाऱ्या हलक्या, मध्यम सरी सायंकाळपर्यंत पडतच होत्या. मिरज : मिरज शहरासह पूर्व भागात मंगळवारी सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावरील खड्डयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. मिरज शहरासह पूर्वभागात गत दोन आठवड्यांपासून पावसाने जोर धरला आहे. थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने दिवसभर पाऊस सुरू आहे. मंगळवारी मात्र पावसाने आणखी जोर धरला. शहरासह पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. ग्रामीण भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पूर्व भागासह शहरातील रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. खड्डयांमध्ये पाणी साचून रहात आहे. पादचारी व दुचाकीस्वारांना पाणी साचलेल्या खड्डयांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने नागरिकांची दैना उडविली. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान बेडग, आरग, लिंगनूर व परिसरात मुसळधार पाऊस पडला. पलूस : सोमवार रात्रीपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सोमवार रात्रीपासून आणि मंगळवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. घोगाव, कुंडल, पुणदी, नागराळे, दुधोंडी, पलूस, आमणापूर, धनगाव, सावंतपूर, नागठाणे, बांबवडे, मोराळे, आंधळी, वसगडे, अंकलखोप, भिलवडी आदी गावांसह संपूर्ण तालुक्यात पाऊस पडत आहे. मान्सूनच्या पावसाने जून महिन्यात हजेरी न लावल्याने पेरण्या लांबल्या होत्या. आजअखेर पलूस तालुक्यात ७९.८ मि.मी. पाऊस झाला आहे, तर २३९०९ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत २२२५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दोन दिवसात झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही थोडाफार सुटण्यास मदत होणार आहे. कडेगाव : कडेगाव तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस झाला. यावर्षीच्या पावसाळ्यात आज पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. कडेगाव, कडेपूर, वांगी, चिंचणी, शाळगाव, नेवरीसह तालुक्यात सर्वत्र आज पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे आता खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील सर्व गावांमधून या हंगामातील पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार धरली. त्यानंतर मंगळवारी दिवसभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळत राहिल्या. आज सकाळी आठपर्यंत कामेरी मंडलात सर्वाधिक २३, तर इस्लामपूरमध्ये १९ मि. मी. पावसाची नोंद झाली. आजअखेर कासेगाव मंडलात सर्वाधिक एकूण १६० मि. मी. पाऊस झाला. मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस एकसारखा कोसळत होता.वाळवा तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस असा. इस्लामपूर (१२४), ताकारी (६६.५), वाळवा (५०), आष्टा (१४३.५), बहे (५२), तांदूळवाडी (११७), कोरेगाव (१२७), पेठ (७४), कुरळप (६०.८), कासेगाव (१६०) व कामेरी (११८). गेल्यावर्षी २२ जुलैअखेर कामेरीत ३७४ मि. मी.; तर इस्लामपूर मंडलात ३५२.३ मि. मी. पावसाची नोंद झाली होती.(वार्ताहर)