शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
5
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
6
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
8
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
9
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
10
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
11
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
12
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
13
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
14
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
15
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
16
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
17
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
18
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
19
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
20
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...

बारा वर्षे संघर्ष : जिल्हा बॅँकेच्या ६५ अनुकंपा मुलांना अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 09:43 IST

जिल्हा बॅँकेच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत संधी दिली जाते. मात्र २००७ पासून अनुकंपाची भरती प्रक्रिया थांबली होती. त्यात ‘एनपीए’ वाढल्याने बॅँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशासक मंडळ आले. बॅँकेची गाडी रुळांवर येण्यास २०१४ उजाडले.

ठळक मुद्देयुनियन - बॅँक प्रशासन समझोता : लिपिकांना आठ हजार, तर शिपायांना सहा हजार पगार

राजाराम लोंढे, 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ६५ अनुकंपाखालील मुलांना तब्बल १२ वर्षांनंतर न्याय मिळाला. एकूण ७९ कर्मचारी मृत झाले असले तरी त्यांतील ६५ जणच पात्र ठरले आहेत. बॅँक प्रशासन व कर्मचारी युनियनमध्ये समझोता झाला असून, लिपिकांना आठ हजार, तर शिपायांना सहा हजार रुपये पगार देण्यावर एकमत झाले असून, त्यांना उद्या, शनिवारपासून कामावर घेण्याचे प्रयत्न आहेत.

जिल्हा बॅँकेच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत संधी दिली जाते. मात्र २००७ पासून अनुकंपाची भरती प्रक्रिया थांबली होती. त्यात ‘एनपीए’ वाढल्याने बॅँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशासक मंडळ आले. बॅँकेची गाडी रुळांवर येण्यास २०१४ उजाडले. संचालक मंडळ २०१५ साली जरी कार्यरत झाले असले तरी संचित तोटा कमी झाल्याशिवाय कोणताच निर्णय घेता येत नव्हता. प्रशासक व त्यानंतर संचालक मंडळाच्या काळात कर्मचारी युनियनने या वारसांना कामावर घ्यावे, यासाठी निकराचे प्रयत्न केले. घरातील कर्ती व्यक्ती अचानक गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले होते. त्या वेदनेतून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी बॅँकेच्या दारात साखळी उपोषण सुरू केले. मात्र बॅँकेची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत बॅँकेलाही काही करता येत नव्हते. या कर्मचाºयांबरोबरच २००७ पासून रोजंदारीवर काम करणाºया १०० वारसांचा प्रश्नही गंभीर होता. मध्यंतरी या १०० कर्मचाºयांना कायम केल्यानंतर अनुकंपाच्या वारसांनाही सेवेत घेऊ, असे आश्वासन बॅँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी युनियनला दिले होते.

त्यानुसार सोमवारी (दि. २७) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अनुकंपाचा विषय आयत्या वेळच्या विषयात घेतला होता. त्यावर युनियनसोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ संचालक पी. जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीबरोबर युनियन प्रतिनिधींची चर्चा होऊन या वारसांना कामावर घेण्यात येणार असून, जे पदवीधर आहेत, त्यांना लिपिक म्हणून, तर जे पदवीधर नाहीत, त्यांची शिपाई म्हणून नेमणूक केली जाईल. तब्बल १२ वर्षे या कर्मचाºयांनी संघर्ष केल्यानंतर अखेर न्याय मिळाल्याने इतर कर्मचाºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तिस-या वर्षी प्रोबेशनल आॅर्डरया कर्मचाºयांना दोन वर्षे आठ व सहा हजार रुपये पगारावर काम करावे लागणार आहे. बॅँकेवर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी तिसºया वर्षी त्यांना प्रोबेशनल आॅर्डर देण्यात येणार आहे. --------------------------------

  • १४ जण अपात्र का ठरले?

-सेवेत असताना आत्महत्या केली.-गैरव्यवहार केला म्हणून बडतर्फ केले आणि मृत्यू झालेल्यांना.-बॅँकेविरोधात न्यायालयात गेलेल्यांना आणि मृत्यू झालेल्यांना.-मृत कर्मचा-यांच्या वारसाचे वय अठरा वर्षे पूर्ण नाही. 

टॅग्स :jobनोकरीbankबँकkolhapurकोल्हापूर