शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

जिल्ह्यातील २४९ ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्ती

By admin | Updated: July 25, 2016 23:11 IST

३० हजार १४९ लोकवस्ती : ५३ कोटी ४८ लाखांचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार, मंजुरीसाठी शासनाला सादर

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, यांचा तांडा वस्तीमध्ये समावेश करीत वसंतराव नाईक तांडावस्ती बृहत् आराखडा तयार केला आहे. या सर्व्हेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४९ ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्त्या आढळल्या आहेत. ३० हजार १४९ एवढी लोकवस्ती आहे. या सर्व तांडा वस्त्यांच्या मूलभूत विकासासाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ५३ कोटी ४८ लाख १५ हजार ५०० रूपयांचा निधी लागणार आहे.हा आराखडा मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील धनगर, नाथ गोसावी, भोई, कातकरी, बेलदार या विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचा तांडा वस्तीसाठी सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेअंती वसंतराव नाईक तांडा वस्ती या नावाने २०१५-१६ ते २०२०-२१ या पाच वर्षासाठी विकासाचा बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व्हे करण्यात आलेल्या वस्त्यांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण, नवीन पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर, दिवाबत्ती सुविधा, स्मशानशेड, वाडीअंतर्गत रस्ते, विंधनविहीर खोदणे, संरक्षक भिंत आदी प्राथमिक व मुलभूत सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. गेले वर्षभर सर्व्हे व आराखड्याचे काम सुरू होते. मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पुणे येथील विमुक्त जाती, भटक्या जमाती संचालक यांना हा आराखडा मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. वैभववाडीला सर्वाधिक १८ कोटी ९३ लाखांची गरजपुढील पाच वर्षांसाठी करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार ५३ कोटी ४८ लाख १५ हजार ५०० रूपये निधीची गरज आहे. यात सर्वाधिक निधी वैभववाडी तालुक्याला १८ कोटी ९३ लाख ३० हजार रूपयांची गरज आहे. मालवण २ कोटी २५ लाख ५० हजार रूपये, वेंगुर्ले १ कोेटी ६१ लाख रूपये, सावंतवाडी ६ कोटी ९३ लाख ७३ हजार रूपये, देवगड ६ कोटी ७० लाख ६२ हजार रूपये, कुडाळ १० कोटी ५९ लाख रूपये, कणकवली ४ कोटी १२ लाख रूपये, दोडामार्ग २ कोेटी ३३ लाख रूपये या प्रमाणे तालुकानिहाय तांडा वस्त्यांना विकासासाठी निधीची गरज आहे. आतापर्यंत १२ कोटी १४ लाखांचा निधी खर्चया २४९ तांडा वस्त्यांमध्ये विविध योजनांतर्गत आतापर्यंत १२ कोटी १४ लाख ३६ हजार ६३९ रूपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. यात मालवण ६७ कोटी ३८ हजार १३२ रूपये, वैभववाडी ५५ लाख ८० हजार रूपये, वेंगुर्ले २५ लाख ७४ हजार, सावंतवाडी ९ कोटी ४० लाख ३७ हजार ५७५ रूपये, देवगड ४६ लाख ४७ हजार ६२१ रूपये, कुुडाळ २९ लाख ५९ हजार ३११ रूपये, कणकवली ४९ लाख रूपये असा प्रत्येक तालुक्यात खर्च करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)कुडाळमध्ये सर्वाधिक तांडावस्तीजिल्ह्यात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५० ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्ती आहे. देवगड ४२ ग्रामपंचायती, सावंतवाडी ३६, कणकवली ३४, मालवण ३०, वैभववाडी २७, दोडामार्ग २२ व वेंगुर्ले ८ या प्रमाणे तालुकानिहाय ग्रामपंचायतमध्ये तांडा वस्ती आढळली आहे. तसेच मालवण ३७०७, वैभववाडी २७०८, वेंगुर्ले २४३, सावंतवाडी ६५५०, देवगड ६११२, कुडाळ ५५१०, कणकवली ३५३५, दोडामार्ग १७८४ एवढी प्रत्येक तालुक्यात तांडावस्ती आहे.