शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

यड्रावात जाचक पाणीपट्टीबाबत असंतोष

By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST

ग्रामपंचायतीने पाणीपट्टी कमी करावी : पाणी वाटप नियोजनाच्या अभावाने नाराजी

घन:शाम कुंभार - यड्राव -येथील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाणीवाटपाचे नियोजन कोलमडले असतानाच पाणीपट्टी आकारणीच्या जाचक दरामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे नव्या योजनेच्या प्रारंभीच ग्रामपंचायतीस ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तर यातील योग्य नियोजन केल्यास ग्रामस्थांना पुरेसा व योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येऊ शकेल. जाचक पाणीपट्टी कमी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.यड्राव गावासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना पूर्ण झाली आहे. परंतु योग्य नियोजनाच्या अभावामुळेच पाणीवाटप व्यवस्थेतील उपाययोजना सुलभ होत नाहीत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. बऱ्याच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही भागात सदोष पाईपलाईन असल्याने तेथे पुरेसे पाणी जात नाही. तर विरोधी सदस्यांच्या भागामध्ये ग्रामपंचायतीकडून नव्या पाईपलाईन टाकूनही त्या जुन्या व्हॉल्वला जोडल्या नाहीत, तसेच पार्वती हौसिंग सोसायटीमध्ये पोट पाईपलाईन टाकण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जुनी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.डिसेंबर २०१४ व जानेवारी २०१५ या महिन्याचे ग्रामपंचायतीकडून प्रतिमहिना १८५ रूपये पाणीपट्टी आकारणीची बिले ग्रामस्थांना वाटप झाली आहेत. योजना सुरू झाल्यापासून नियमित पाणीपुरवठा नाही. तसेच पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने पाणी मिळत नसल्याने या दराबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. नळ पाणीपुरवठा केलेल्या हातकणंगले तालुका, शिरोळ तालुक्यातील गावामध्ये इतकी पाणीपट्टी नसल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.गावातील दोन्ही जलकुंभ भरण्यासाठी १० तासांचा कालावधी लागतो. परंतु १६ तास पाणी उपसा करावा लागत असल्याने उर्वरित सहा तासांचे पाणी कोठे जाते, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. या पाण्याचा नाहक भुर्दंड ग्रामस्थांवर बसू नये व पाणीपट्टीची आकारणी माफक दरात करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.बऱ्याच भागात ठराविक वेळेपेक्षा जास्त पाणी सोडणे, काही भागात कमी पाणी सोडणे यावर बंधन घालणे आवश्यक आहे. सदोष पाईपलाईन त्वरीत बदलाव्यात म्हणजे योग्य दाबाने पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी सोडण्याचा कालावधी सगळीकडे एकच असावा. एक दिवसआड पाणी ठराविक कालावधीतच सोडल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन होऊ शकते. ग्रामस्थांनाही पुरेसे पाणी मिळू शकते. यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा दर कमी करून इतर उपाययोजनाचे नियोजन करणे हितावह ठरणार आहे.मीटरसक्ती ग्रामस्थांचा विरोध अन् ग्रामपंचायतीची भूमिकानवीन पाणी योजनेसाठी ग्रा.पं.ने नळ कनेक्शनसाठी नळास मीटरसक्ती केली होती. त्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने मीटरसक्ती मागे घेतली. आता पाणीपट्टी जाचक ठेवण्यात आली आहे. त्यासाठीही ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. यामुळे ग्रा.पं.ला योग्य भूमिका घ्यावी लागणार आहे. ग्रामस्थांचा विरोध अन् ग्रा.पं.च्या बदलत्या भूमिकेची चर्चा आहे.पाणीपट्टी दर कमी होऊ शकतोसध्या पंधराशे ग्रामस्थांनी नळ जोडणी करून घेतली आहे. त्यांना पाणीपट्टीची बिले लागू केली आहेत. योजनेचा पाणीउपसा व ग्रामस्थांना वाटप याच्या खर्चाचा समतोल साधण्यासाठी योजनेमध्ये नळजोडणी जास्तीतजास्त ग्रामस्थांनी करून घेतली, तर पाणीपट्टीचा दर कमी होऊ शकतो, असे यड्रावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग यांनी स्पष्ट केले.