शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावात जाचक पाणीपट्टीबाबत असंतोष

By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST

ग्रामपंचायतीने पाणीपट्टी कमी करावी : पाणी वाटप नियोजनाच्या अभावाने नाराजी

घन:शाम कुंभार - यड्राव -येथील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाणीवाटपाचे नियोजन कोलमडले असतानाच पाणीपट्टी आकारणीच्या जाचक दरामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे नव्या योजनेच्या प्रारंभीच ग्रामपंचायतीस ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तर यातील योग्य नियोजन केल्यास ग्रामस्थांना पुरेसा व योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येऊ शकेल. जाचक पाणीपट्टी कमी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.यड्राव गावासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना पूर्ण झाली आहे. परंतु योग्य नियोजनाच्या अभावामुळेच पाणीवाटप व्यवस्थेतील उपाययोजना सुलभ होत नाहीत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. बऱ्याच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही भागात सदोष पाईपलाईन असल्याने तेथे पुरेसे पाणी जात नाही. तर विरोधी सदस्यांच्या भागामध्ये ग्रामपंचायतीकडून नव्या पाईपलाईन टाकूनही त्या जुन्या व्हॉल्वला जोडल्या नाहीत, तसेच पार्वती हौसिंग सोसायटीमध्ये पोट पाईपलाईन टाकण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जुनी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.डिसेंबर २०१४ व जानेवारी २०१५ या महिन्याचे ग्रामपंचायतीकडून प्रतिमहिना १८५ रूपये पाणीपट्टी आकारणीची बिले ग्रामस्थांना वाटप झाली आहेत. योजना सुरू झाल्यापासून नियमित पाणीपुरवठा नाही. तसेच पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने पाणी मिळत नसल्याने या दराबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. नळ पाणीपुरवठा केलेल्या हातकणंगले तालुका, शिरोळ तालुक्यातील गावामध्ये इतकी पाणीपट्टी नसल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.गावातील दोन्ही जलकुंभ भरण्यासाठी १० तासांचा कालावधी लागतो. परंतु १६ तास पाणी उपसा करावा लागत असल्याने उर्वरित सहा तासांचे पाणी कोठे जाते, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. या पाण्याचा नाहक भुर्दंड ग्रामस्थांवर बसू नये व पाणीपट्टीची आकारणी माफक दरात करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.बऱ्याच भागात ठराविक वेळेपेक्षा जास्त पाणी सोडणे, काही भागात कमी पाणी सोडणे यावर बंधन घालणे आवश्यक आहे. सदोष पाईपलाईन त्वरीत बदलाव्यात म्हणजे योग्य दाबाने पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी सोडण्याचा कालावधी सगळीकडे एकच असावा. एक दिवसआड पाणी ठराविक कालावधीतच सोडल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन होऊ शकते. ग्रामस्थांनाही पुरेसे पाणी मिळू शकते. यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा दर कमी करून इतर उपाययोजनाचे नियोजन करणे हितावह ठरणार आहे.मीटरसक्ती ग्रामस्थांचा विरोध अन् ग्रामपंचायतीची भूमिकानवीन पाणी योजनेसाठी ग्रा.पं.ने नळ कनेक्शनसाठी नळास मीटरसक्ती केली होती. त्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने मीटरसक्ती मागे घेतली. आता पाणीपट्टी जाचक ठेवण्यात आली आहे. त्यासाठीही ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. यामुळे ग्रा.पं.ला योग्य भूमिका घ्यावी लागणार आहे. ग्रामस्थांचा विरोध अन् ग्रा.पं.च्या बदलत्या भूमिकेची चर्चा आहे.पाणीपट्टी दर कमी होऊ शकतोसध्या पंधराशे ग्रामस्थांनी नळ जोडणी करून घेतली आहे. त्यांना पाणीपट्टीची बिले लागू केली आहेत. योजनेचा पाणीउपसा व ग्रामस्थांना वाटप याच्या खर्चाचा समतोल साधण्यासाठी योजनेमध्ये नळजोडणी जास्तीतजास्त ग्रामस्थांनी करून घेतली, तर पाणीपट्टीचा दर कमी होऊ शकतो, असे यड्रावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग यांनी स्पष्ट केले.