शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कीटकनाशकांमुळे कॅन्सरचा अप्प्रचार खोडून काढा -शेतकरी व ग्राहक परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:24 IST

भाजीपाल्यामुळेच कॅन्सर होतो, हा निव्वळ गैरसमज आहे. कीटकनाशकांबाबत अद्याप कोणतेही शास्त्रीय कारण पुढे आलेले नाही. त्यामुळे कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हा

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी एकजूट हवीजयसिंगपूर येथे शेतकरी परिषदेत आवाहन

जयसिंगपूर : भाजीपाल्यामुळेच कॅन्सर होतो, हा निव्वळ गैरसमज आहे. कीटकनाशकांबाबत अद्याप कोणतेही शास्त्रीय कारण पुढे आलेले नाही. त्यामुळे कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हा समज चुकीचा आहे. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी शेतकºयांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन जयसिंगपूर येथे झालेल्या शेतकरी व ग्राहक परिषदेत करण्यात आले.

येथील सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात गुरुवारी शिरोळ तालुक्यातील शेतकरी कॅन्सरदाता की अन्नदाता शेतकरी व ग्राहक परिषद पार पडली. कीटकनाशकांमुळे कॅन्सर होत आहे. याबाबत शेतकºयांची नाहक बदनामी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित नरदे, संजय कोले, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी चित्रफितीद्वारे कॅन्सर व कीटकनाशकांबाबत माहिती देण्यात आली.

मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत लाड म्हणाले, दोन हजार वर्षांपूर्वी कीटकनाशके नव्हती, त्यावेळी कॅन्सर होता. माणसाच्या शरीरात होणारे बदल, राहणीमान, दारू, गुटखा, तंबाखू, फास्टफुडचे सेवन, स्थुलता ही प्रमुख कॅन्सरची कारणे आहेत. माणसाचे आयुष्यमान वाढत चालले असले तरी ते कॅन्सरसाठी धोकादायक बनले आहे. महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण दिसून येते. मासिक पाळीतील अनियमितता ही प्रमुख कारणे आहेत. कॅन्सरवर औषधे घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. पंचगगा नदी प्रदूषणाचाही शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पिकांना दिले जाणारे पाणी, पिण्याचे पाणी याची तपासणी केली पाहिजे. वातावरणात खूप मोठा बदल झाला आहे.

उत्पन्नवाढीसाठी कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, चांगल्या कंपन्यांकडूनच औषधे घेणे गरजेची आहेत. सफरचंद, टोमॅटोमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण आढळून आल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला ही मिठाच्या पाण्यात धुऊनच आहारात घेणे गरजेचे आहे. नव्या पिढीमध्ये स्थुलतेचे प्रमाण वाढले आहे. केवळ कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हे म्हणणे चुकीचे असून त्याबाबत संशोधन सुरू आहे. त्याला अद्याप कोणतेही शास्त्रीय कारण नाही. श्रेणिक नरदे यांनी आभार मानले.चुकीचा संदर्भअजित नरदे म्हणाले, आॅस्ट्रेलियामध्ये ८० टक्के कॅन्सरचे प्रमाण आहे. एकूण ३६ देशांचा अभ्यास केल्यास त्यात भारताचा क्रमांक लागत नाही. कीटकनाशकांमुळे कॅन्सर हा संदर्भ चुकीचा आहे. अमेरिकेतील रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हे चुकीचे आहे. शिरोळ तालुक्यात केवळ अफवा पसरविली जात आहे. समाजात केवळ भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. हा अपप्रचार खोडून काढण्याची गरज बनली आहे. त्यासाठी शेतकºयांची एकजूट महत्त्वाची आहे. तरच तालुकाभयमुक्त होणार आहे. यावेळी सिद्धाप्पा दानवाडे (दत्तवाड) या शेतकºयाचा सत्कार करण्यात आला.जयसिंगपूर येथे शेतकरी व ग्राहक परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत लाड. शेजारी सिद्धाप्पा दानवाडे, संजय कोले, अजित नरदे, श्रेणिक नरदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcancerकर्करोग