शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

सातारा बसस्थानकात संतप्त प्रवाशांकडून तोडफोड

By admin | Updated: September 17, 2015 23:44 IST

परस्परविरोधी तक्रारी : सहायक वाहतूक निरीक्षकांनी फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप

सातारा : मुंबई-आजरा प्रवासात इंजिनातील बिघाडामुळे एक ना दोन, तब्बल चार गाड्या बदलाव्या लागल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षाची तोडफोड केली. प्रवास सुरू असताना सहायक वाहतूक निरीक्षकांना अनेकदा फोन करूनही त्यांनी तो घेतला नाही आणि नंतर स्वत: फोन करून शिवीगाळ केली, असा आरोप प्रवाशांनी केला. यासंदर्भात प्रवाशांनी, तर तोडफोडप्रकरणी एस.टी. प्रशासनाने चार प्रवाशांविरुद्ध तक्रार दाखल केली.प्रवासी, एस.टी.चे अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर ही घटना घडली. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या काचा प्रवाशांनी फोडल्या. आतील संगणक, दोन माईक आणि फोनचेही नुकसान केले. यावेळी झालेला आरडाओरडा आणि गोंधळामुळे बसस्थानकावरील इतर प्रवाशांबरोबरच एस.टी.चे कर्मचारीही प्रचंड घाबरले. सुमारे तासभर तणावपूर्ण वातावरण होते. त्यानंतर एस.टी. प्रशासनाने शिवाजी यशवंत बोरवडकर (वय ३५, रा. माद्याळ, ता. कागल, जि. कोल्हापूर), संदीप मारुती बिवळेकर (३५, रा. झुलपेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर), संजय नारायण देवलकर (४२, रा. चाफवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर), आणि श्रीपती महादेव राजगोळे (५२, रा. न्यू पनवेल, जि. रायगड) या चार प्रवाशांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना समज दिली. ‘यापुढे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल,’ अशी नोटीस चौघांना बजावल्यानंतर दुपारी एक वाजून एक मिनिटांनी प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू झाला.दरम्यान, एकापाठोपाठ एक अशा चार बस नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांपैकी श्रीपती महादेव राजगोळे यांनी सहायक वाहतूक निरीक्षक जी. बी. किरते यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. तथापि, तब्बल ३० वेळा फोन करूनही त्यांनी तो उचलला नाही, असे राजगोळे यांनी सांगितले. नंतर किरते यांनीच राजगोळे यांना उलटा फोन केला. तेव्हा झालेल्या बाचाबाचीत किरते यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप राजगोळे यांनी केला आहे. राजगोळे हे मुंबईत ‘बीईएसटी’मध्ये चालक म्हणून काम करतात. किरते यांच्याविरुद्ध त्यांनी शहर पोलीस ठाण्यात शिवीगाळीची तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी) आजरा-मुंबई...मुंबई-आजराआजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.आजरा-मुंबई...मुंबई-आजराआजरा-मुंबई बस मंगळवारी रात्री जेवणासाठी नागठाण्याजवळील ढाब्यावर थांबली असता, सशस्त्र दरोडेखोरांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्याला धाक दाखवून सुमारे ३४ लाख रुपयांची लूट केली होती. दुसऱ्याच दिवशी नेमक्या मुंबई-आजरा बसलाच ‘ठेचेवर ठेच’ लागली आणि त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई-आजरा मार्गावरील धावत्या बसवर हे सलग दुसरे ‘विघ्न’ नेमके विघ्नहर्त्याच्या आगमनावेळीच आले.