शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

सरस्वती मार्केट, गांधी कॅम्पमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमधील एका तरुणासह दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी भागातील व्यापार व भाजीपाला विक्री बंद पाडली. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी व्यापारी व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले व परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्‌स लावून बंद करण्याचे आदेश दिले.

शहर व परिसरातील बाजारपेठेतील नागरिकांची वाढती गर्दी कोरोनावाढीला कारणीभूत ठरत आहे. पालिका व पोलीस प्रशासनकडून आवाहन करूनही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे वाढती गर्दी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे बाजार बंद करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच भागातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे स्थानिक नागरिक अधिकच आक्रमक बनले.

रविवारी सकाळी दहा वाजता भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. तसेच भाजीपाला विक्रेत्यांना तेथून हाकलून लावले. या प्रकारामुळे व्यापारी व नागरिकांत वाद निर्माण झाला. याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष पोवार यांनी धाव घेत नागरिक व व्यापाऱ्यांना शांत केले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत १५ मेपर्यंत भागात सर्व व्यवहार व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सदा मलाबादे यांनी स्पीकरवरून नागरिकांना सूचना करत काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर नगरपालिकेने बॅरिकेट्‌स लावून भाग बंद केला.

फोटो ओळी

०९०५२०२१-आयसीएच-०१

सरस्वती मार्केट, गांधी कॅम्पमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांत वाद झाला. त्यावेळी उपनराध्यक्ष तानाजी पोवार यांनी परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्‌स लावून बंद करण्याचे आदेश दिले.