शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

सरस्वती मार्केट, गांधी कॅम्पमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमधील एका तरुणासह दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी भागातील व्यापार व भाजीपाला विक्री बंद पाडली. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी व्यापारी व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले व परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्‌स लावून बंद करण्याचे आदेश दिले.

शहर व परिसरातील बाजारपेठेतील नागरिकांची वाढती गर्दी कोरोनावाढीला कारणीभूत ठरत आहे. पालिका व पोलीस प्रशासनकडून आवाहन करूनही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे वाढती गर्दी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. सरस्वती मार्केट व गांधी कॅम्पमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे बाजार बंद करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच भागातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे स्थानिक नागरिक अधिकच आक्रमक बनले.

रविवारी सकाळी दहा वाजता भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. तसेच भाजीपाला विक्रेत्यांना तेथून हाकलून लावले. या प्रकारामुळे व्यापारी व नागरिकांत वाद निर्माण झाला. याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष पोवार यांनी धाव घेत नागरिक व व्यापाऱ्यांना शांत केले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत १५ मेपर्यंत भागात सर्व व्यवहार व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सदा मलाबादे यांनी स्पीकरवरून नागरिकांना सूचना करत काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर नगरपालिकेने बॅरिकेट्‌स लावून भाग बंद केला.

फोटो ओळी

०९०५२०२१-आयसीएच-०१

सरस्वती मार्केट, गांधी कॅम्पमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांत वाद झाला. त्यावेळी उपनराध्यक्ष तानाजी पोवार यांनी परिसर १५ मेपर्यंत बॅरिकेट्‌स लावून बंद करण्याचे आदेश दिले.