शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

मुरगूडच्या आठवडी बाजाराला शिस्त हवी

By admin | Updated: December 10, 2015 01:04 IST

मंगळवारी तोबा गर्दी : आठवड्यातून दोनवेळा भरवण्याची मागणी

अनिल पाटील-- मुरगूड --सीमाभागातील मोठा बाजार म्हणून ओळख असणाऱ्या मुरगूड शहरातील मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला व्यापाऱ्यासह परिसरातील ग्रामस्थांचीही तोबा गर्दी असते. या गर्दीवर उपाय म्हणून आठवड्यातून दोनवेळा शहरामध्ये बाजार भरवणे हितावह आहे. याबाबत काही नागरिक व व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची मागणीही केली आहे. जर दोनवेळा बाजार भरवला तर अगदी शिस्तबद्ध दुकानांची मांडणी करता येईल. तसेच होणाऱ्या लहान-मोठ्या ट्रॅफिक जाम, आदी समस्याही दूर होतील व पालिकेसही याचा फायदा होईल.मुरगूडची बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. शाहू महाराजांनी मुरगूड येथे श्रीमंत पिराजीराव घाटगे कागलकर यांच्याकडून बाजारपेठ नियोजित बसवून घेत १९२५ ते ३० या काळात शिस्तबद्ध बाजारपेठेची उभारणी केली गेली. या अगोदर गावभागामध्ये मारुती मंदिर ते चावडीपर्यंत बाजार भरत होता. या वेळेचा बाजार हा किरकोळ होता; पण शहरात नवीन बाजारपेठ विकसित झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वांत मोठा जनावरांचा बाजार मुरगूडमध्ये सुरू झाला. त्यानंतर हळूहळू मंगळवारच्या आठवडी बाजाराला तोबा गर्दी उसळू लागली. यावर उपाय म्हणून सध्याचा मुरगूड विद्यालयाच्या दारातच भरणारा कोंबडी बाजार, बकरी बाजार पोलीस ठाण्यासमोरील रिकाम्या जागेत भरवावा, बाजारामधील व्यापाऱ्यांचे नियोजन करून बाजाराची जागा वाढवत पोलीस ठाण्यापर्यंत न्यावी. तसेच मिरची बाजार लोकवस्तीमधून हलवून मरगूबाई पाणंदीमध्ये बसवणे गरजेचे आहे.सर्व बाजारपेठ मुख्य रस्त्यावर आणणे गरजेचे आहे. दोन्ही बाजंूचे जोड रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवल्यास वाहने लावण्यास जागा मिळेल. यामुळे बाजाराची लांबी वाढून ग्राहकांना फिरणे सोयीचे होईल. परिणामी, गैरप्रकाराला आळा बसेल.बाजारामधील गर्दी पाहता दोनवेळा बाजार भरवणे हिताचेच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही फायदा होईल आणि पालिकेचे उत्पन्नही वाढेल. याबाबत शहरातील प्रमुख व्यापारी, अधिकारी आदींबरोबर चर्चा करून आपण निर्णय घेऊ.- प्रवीणसिंह पाटील, सभागृह नेता, मुरगूड नगरपालिका.विस्कळीतपणा : चोरट्यांकडून फायदासध्या पोलीस ठाण्यापासून जुना नाका इथपर्यंत नव्या बाजारपेठेमध्येच मंगळवारचा आठवडी बाजार भरतो. परंतु, या बाजाराचे निरीक्षण केल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी कोणत्या वस्तू कोणत्या क्षेत्रात विकाव्यात, याचे नियोजन जरूरीचे आहे. सध्या बाजारामध्ये विक्रेते किती आहे, याची मोजदाद करून त्यांची बसण्याची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. बाजारामध्ये व्यापारी लोक ऊन, पावसाच्या संरक्षणासाठी पाली मारतात. त्यासाठी वापरलेल्या दोऱ्या, काठ्या अस्ताव्यस्त बांधलेल्या असतात. यास्तव नागरिकांना बाजारात पायी ये-जा करणेसुद्धा जिकिरीचे बनले आहे. या अस्ताव्यस्त पसरलेल्या दोरीमध्ये अडकून लहान-मोठे अपघातही घडले आहेत. नेमक्या याच दाटीवाटीचा फायदा घेत चोरटे मोबाईल, पैसे, दागिने यावर डल्ला मारत आहेत.