शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

चर्चेतील मुलाखत.. पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने राजकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना इच्छुकांमधील इर्षा पाहिली तर गावागावात टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. राजकीय इर्षेेत गावगाड्यांचा विकास खुंटतो, याकडे कोणाचेही लक्ष नसते. यासाठी गावचे नेतृत्व करणाऱ्यांबरोबरच निवडणुकीत जनतेने नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत ‘हिवरे बाजार’ पॅटर्न संपूर्ण देशात गाजवला, ते पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी साधलेला संवाद...

निवडणुकीतील दारू, पैशाच्या वापराने गावे मोडणार - पोपटराव पवार

पायाभूत सुविधांबरोबरच मनाचा विकास केला पाहिजे : निर्व्यसनी, प्रामाणिक उमेदवारांना पाठबळ द्या

प्रश्न : गावाचा विकास म्हणजे नेमके काय?

उत्तर : रस्ते, गटारे, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांची पूर्तता करायलाच हवी. त्याचबरोबर आधुनिक शेती करत त्याला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास कुटुंबे समृध्द होतील. पण हा गावाचा सर्वांगिण विकास नव्हे, तर गावातील माणूस बदलला पाहिजे. जसा पैसा हातात येईल, तशा गरजा वाढतील आणि पैशाचा हव्यासही वाढत जाईल. त्यातूनच ताण, नैराश्य येते. त्यामुळे अशी गावे आपल्याला निर्माण करायची नाहीत, तर आनंददायी गावे होण्यासाठी पहिल्यांदा मनाचा विकास महत्वाचा आहे.

प्रश्न : शासनाकडून ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळतो, मग समस्या कायम कशा?

उत्तर : कोणत्याही गावाचा एक -दोन वर्षात विकास होत नाही, त्यासाठी नियोजन हवे, त्यानुसार काम केले पाहिजे. निव्वळ पैशांनी गावे बदलली असती, तर आज महाराष्ट्रातील हजारो गावे मॉडेल बनली असती. विकासकामांची गुणवत्ता महत्वाची आहे, त्याचबरोबर त्यांची देखभाल, दुरूस्ती सातत्याने झाली पाहिजे. लोकशाही आहे, यामध्ये कायमस्वरूपी कोणीही सत्तेवर राहात नाही. एखाद्या गटाने चांगले काम करूनही त्यांचा पराभव झाला तर नवीन येणाऱ्या लोकांनी ती चांगले कामे पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विरोधाला विरोध म्हणून पाहता कामा नये.

प्रश्न : ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आपण काय सांगाल?

उत्तर : ग्रामपंचायतीची निवडणूक ही लोकशाहीतील सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. कारण गावे स्वयंपूर्ण झाली तरच देश समृद्ध होणार आहे. प्रतिष्ठेसाठी अनेकजण निवडणूक लढवताना आपण पाहतो, अशा मंडळींकडून गावाच्या विकासाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे गावाच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय बाळगून ग्रामपंचायतीमध्ये जावे.

प्रश्न : मतदारांनी कोणत्या उमेदवाराला संधी द्यावी?

उत्तर : निर्व्यसनी, प्रामाणिक व गावासाठी वेळ देणाऱ्या नेतृत्वाला मतदारांनी पाठबळ द्यावे. अलिकडे निवडणुकीत तरूणाईचा सहभाग वाढला आहे, ही एका अर्थाने चांगली गोष्ट असली तरी निवडणुकीत दारू, पैशांचा वाढलेला वापर चिंताजनक आहे. दारू, पैसे वाटून आपण गावे उभी न करता ती मोडता आहात. निवडणुकीतून तरूणाई व्यसनाधीन होणार असेल तर गावाचे भविष्य काय? जनतेने समग्र परिवर्तनासाठी कर्तबगार उमेदवाराच्या मागे उभे राहावे.

अनुदानामुळे समाज पंगू

स्थानिक परिस्थिती आणि तेथील गरजा पाहून विकास आराखडा तयार करून त्याला शासकीय योजनांची जोड दिली तर गावे समृध्द होण्यास वेळ लागत नाही. सगळाच विकास शासकीय निधीतून करता येत नाही, अनुदानामुळे समाज पंगू झाला आहे. खरा विकास हा लोकसहभागातूनच होतो. मग ते श्रमदान असेल किंवा लोकवर्गणी असेल, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.