शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्किट बेंचबाबत आज नवी दिल्लीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 15:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी खंडपीठ कृती समितीचे व्यापक शिष्टमंडळ नवी दिल्लीस रवाना झाले.

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी खंडपीठ कृती समितीचे व्यापक शिष्टमंडळ नवी दिल्लीस रवाना झाले. हे शिष्टमंडळ आज, बुधवारी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. प्रदीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा, यासाठी शिष्टमंडळ आग्रही भूमिका घेणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, यासाठी गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. जिल्हा बार असोसिएशन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी कायदामंत्री रिजिजू यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मंत्री राणे यांच्या पुढाकाराने केंद्रीय कायदा मंत्र्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आज, बुधवारी बैठक होत असल्याचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, सिंधुदुर्ग येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ व कौन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले.

या बैठकीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात ॲड. विवेक घाटगे, ॲड. संग्राम देसाई, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे, सेक्रेटरी विजयकुमार ताटे-देशमुख, वसंतराव भोसले (सातारा), संतोष शहा यांचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHigh Courtउच्च न्यायालय