शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

चंद्रकांत पाटील यांच्या अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्यांची चर्चा- स्वत:च्याच जिल्ह्यात युतीला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:19 IST

राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही.

ठळक मुद्देभाजपने दोन्ही जागा गमावल्या

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्ये, परिणामी चवताळून उठलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस, कोल्हापूर जिल्ह्यातच शिवसेनेला दणका देण्यासाठी ‘जनसुराज्य’चा वापर या सगळ्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच युतीला जोरदार झटका बसला असून, भाजपनेही आपल्या दोन्ही जागा गमावल्या आहेत.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना ‘लक्ष्य’ करून आपली जाहीर मते मांडली आहेत. त्यामुळेच ‘आधी लोकांतून निवडून या’ हे पवारांचे आव्हान स्वीकारण्यासाठी पाटील कोथरूडमधून उभे राहिले. परिणामी त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.

राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही. उलट त्यांच्या या वक्तव्यांमुळे शरद पवार यांना सहानुभूती मिळत गेल्याचे चित्र आले.

कोल्हापूर जिल्ह्यात विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’च्या खांद्यावर बंदूक ठेवून तीन मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्यासाठी भाजपने बळ दिल्याची उघड चर्चा आहे. शाहूवाडी मतदारसंघामध्ये जनसुराज्यचे डॉ. विनय कोरे स्वत: निवडून आले. चंदगडमध्ये भाजपकडे उमेदवारी मागणारे शिवाजी पाटील, अशोक चराटी, रमेश रेडेकर रिंगणात राहिले. परिणामी मतविभागणी झाली आणि येथे राष्ट्रवादीचे राजेश पाटील विजयी झाले. राष्ट्रवादीच्या तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई यांना वेळीच भाजपमध्ये घेऊन जोडणी घातली असती तर कदाचित येथे वेगळा निकाल लागला असता.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेक्ष क्षीरसागर यांच्याविरोधात सुरुवातीला कोणी उभारायला तयार नव्हते. मात्र घरात पत्नी भाजपची नगरसेविका आणि भाऊ भाजपचा नगरसेवक असलेल्या उद्योजक चंद्रकांत जाधव पंधरवड्यात कॉँग्रेसची उमेदवारी घेतात काय आणि निवडून येतात काय ? जाधव यांना सार्वत्रिक पाठबळ मिळाल्याचे हे द्योतक आहे.

तर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक ज्या मतांच्या फरकाने पराभूत झाले ते पाहता, या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिलेला इशारा फारसा गांभीर्याने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, एकीकडे पाटील कोथरूडमधून लढत असताना त्यांच्याविरोधात सुरुवातीला वातावरण तयार केले गेल्याने त्यांना तेथून हलता येईना. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात जिथे-तिथे ज्यांनी-त्यांनी सोयीच्या भूमिका घेतल्या आणि भाजप-शिवसेना युती व्हावी म्हणून आग्रही असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात युतीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.भाजपची सत्त्वपरीक्षापक्ष वाढविण्यासाठी घेतलेले नेते पक्ष सोडून गेले. दोन आमदारही पराभूत झाले. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही कोल्हापूर जिल्ह्यात युतीची वाईट हालत झाली. शिवसेनेची किमान प्रत्येक तालुक्यात ताकद तरी आहे. नवे घेतलेले बरोबर राहिले नाहीत आणि जुने भाजप कार्यकर्ते नाराज अशा परिस्थितीत आता भाजपला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे आणि अर्थात ही सर्व जबाबदारी पुन्हा चंद्र्रकांत पाटील यांच्यावरच पडणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक