शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चंद्रकांत पाटील यांच्या अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्यांची चर्चा- स्वत:च्याच जिल्ह्यात युतीला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:19 IST

राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही.

ठळक मुद्देभाजपने दोन्ही जागा गमावल्या

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्ये, परिणामी चवताळून उठलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस, कोल्हापूर जिल्ह्यातच शिवसेनेला दणका देण्यासाठी ‘जनसुराज्य’चा वापर या सगळ्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच युतीला जोरदार झटका बसला असून, भाजपनेही आपल्या दोन्ही जागा गमावल्या आहेत.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना ‘लक्ष्य’ करून आपली जाहीर मते मांडली आहेत. त्यामुळेच ‘आधी लोकांतून निवडून या’ हे पवारांचे आव्हान स्वीकारण्यासाठी पाटील कोथरूडमधून उभे राहिले. परिणामी त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.

राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही. उलट त्यांच्या या वक्तव्यांमुळे शरद पवार यांना सहानुभूती मिळत गेल्याचे चित्र आले.

कोल्हापूर जिल्ह्यात विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’च्या खांद्यावर बंदूक ठेवून तीन मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्यासाठी भाजपने बळ दिल्याची उघड चर्चा आहे. शाहूवाडी मतदारसंघामध्ये जनसुराज्यचे डॉ. विनय कोरे स्वत: निवडून आले. चंदगडमध्ये भाजपकडे उमेदवारी मागणारे शिवाजी पाटील, अशोक चराटी, रमेश रेडेकर रिंगणात राहिले. परिणामी मतविभागणी झाली आणि येथे राष्ट्रवादीचे राजेश पाटील विजयी झाले. राष्ट्रवादीच्या तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई यांना वेळीच भाजपमध्ये घेऊन जोडणी घातली असती तर कदाचित येथे वेगळा निकाल लागला असता.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेक्ष क्षीरसागर यांच्याविरोधात सुरुवातीला कोणी उभारायला तयार नव्हते. मात्र घरात पत्नी भाजपची नगरसेविका आणि भाऊ भाजपचा नगरसेवक असलेल्या उद्योजक चंद्रकांत जाधव पंधरवड्यात कॉँग्रेसची उमेदवारी घेतात काय आणि निवडून येतात काय ? जाधव यांना सार्वत्रिक पाठबळ मिळाल्याचे हे द्योतक आहे.

तर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक ज्या मतांच्या फरकाने पराभूत झाले ते पाहता, या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिलेला इशारा फारसा गांभीर्याने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, एकीकडे पाटील कोथरूडमधून लढत असताना त्यांच्याविरोधात सुरुवातीला वातावरण तयार केले गेल्याने त्यांना तेथून हलता येईना. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात जिथे-तिथे ज्यांनी-त्यांनी सोयीच्या भूमिका घेतल्या आणि भाजप-शिवसेना युती व्हावी म्हणून आग्रही असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात युतीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.भाजपची सत्त्वपरीक्षापक्ष वाढविण्यासाठी घेतलेले नेते पक्ष सोडून गेले. दोन आमदारही पराभूत झाले. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही कोल्हापूर जिल्ह्यात युतीची वाईट हालत झाली. शिवसेनेची किमान प्रत्येक तालुक्यात ताकद तरी आहे. नवे घेतलेले बरोबर राहिले नाहीत आणि जुने भाजप कार्यकर्ते नाराज अशा परिस्थितीत आता भाजपला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे आणि अर्थात ही सर्व जबाबदारी पुन्हा चंद्र्रकांत पाटील यांच्यावरच पडणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक