शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

भाजप-स्वाभिमानीची चर्चा फिसकटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2017 00:55 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजू शेट्टी यांची स्वबळाची भाषा

कोल्हापूर : राज्यामध्ये सत्तेत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुरात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये सकाळी चर्चा झाली होती. मात्र, दिवसभर कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर शेट्टी यांनी स्वबळाचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गेले तीन दिवस मंत्री पाटील आणि शेट्टी यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा होणार असल्याच्या बातम्यांमुळे ‘स्वाभिमानी’च्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार पाटील, शेट्टी आणि विनय कोरे यांच्यामध्ये चर्चा झाली. कोरे यांनी चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले; मात्र शेट्टी यांनी जागांचा मेळ बसत नसल्याने संध्याकाळी आणखी एक बैठक होईल, असे सांगितले होते. मंत्री पाटील यांनीही रात्री उशिरापर्यंत बैठक होऊन निर्णय होईल, असे सांगितले होते. मात्र अशी बैठक झाली नसल्याचे सांगण्यात आले.कोरे, पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी’च्या जिल्हा कार्यालयात प्रामुख्याने शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर सायंकाळी कार्यकर्त्यांचा स्वबळासाठी आग्रह असल्याचे पत्रक स्वाभिमानीने प्रसिद्धीस दिले. हा सर्व घटनाक्रम पाहता शुक्रवारची ही चर्चा फिसकटली असून, ‘स्वाभिमानी’ स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी सकाळी साडेअकराच्या सुमारास मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विनय कोरे आणि राजू शेट्टी यांचे रेसिडेन्सी क्लब येथे आगमन झाले. त्यानंतर सुमारे दीड तास या तिघांमध्ये चर्चा झाली. अगदी तालुकावार, मतदार संघांनुसार चर्चा झाली. बैठकीनंतर कोरे पहिल्यांदा बाहेर पडले. त्यांनी चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राजू शेट्टी याबाबत घोषणा करतील, असेही ते जाताना सांगून गेले. त्यानंतर शेट्टी बाहेर आले. त्यांनी जागांचा मेळ लागणे अवघड असल्याचे सांगत मी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे सांगून ते निघून गेले. संध्याकाळी पुन्हा बसणार आहोत, असे सांगून त्यांनी चर्चेची तयारी दर्शविली होती. त्यानंतर थोड्या वेळाने मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्तेतील नैसर्गिक पक्ष म्हणून शिवसेना सोबत हवी होती. मात्र, त्यांनी मुंबईतूनच स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. मग स्वाभिमानी सोबत असावी यासाठी चर्चा सुरू आहे. संध्याकाळी पुन्हा बसणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, परशुराम तावरे, जगदीश लिंग्रज, महापालिकेतील भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, नाना कदम उपस्थित होते......................आरपीआय आठवले गटाशी चर्चादरम्यान, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि प्रा. शहाजी कांबळे यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. आठवले गटाने सांगरूळ, सरवडे व उचगांव या तीन जिल्हा परिषदेच्या जागा आणि पंचायत समितीच्या १२ जागांची मागणी केली आहे. अखेर संध्याकाळी बैठक झालीच नाहीचर्चेची पहिली फेरी झाली आहे. जुळवाजुळवी सुरू आहे. संध्याकाळी पुन्हा बसणार आहोत असे चंद्रकांतदादा पाटील आणि राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र दुपारनंतर मंत्री पाटील हे तासगावला गेले तर संध्याकाळी मुलाखती आटोपून शेट्टी हे सांगलीमध्ये बैठकीला गेले. त्यामुळे संध्याकाळी होणारी बैठक झालीच नाही आणि स्वाभिमानीकडून स्वबळाची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे पत्रकच काढण्यात आले. अन्य तालुक्यांत युती शक्यस्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या मागे फरफटत गेली नाही, हे स्पष्ट करण्यासाठी शिरोळ, हातकणंगले येथे ‘स्वाभिमानी’ने स्वतंत्र लढायचे आणि अन्य तालुक्यांत भाजपला सहकार्य करायचे, असाही प्रस्ताव अंतिम टप्प्यात पुढे येऊ शकतो. भाजपमध्ये राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतून अनेकांनी प्रवेश केला आहे, तो उमेदवारी मिळविण्यासाठीच केला आहे; परंतु त्यामुळे गेली पंधरा वर्षे ‘स्वाभिमानी’चा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. आम्ही २२ जिल्हा परिषदेच्या आणि ४४ पंचायत समितीच्या जागा मागितल्या आहेत. मात्र मेळ लावणं अवघड आहे. माझ्या एका-एका कार्यकर्त्याला मी निवडून आणणार आहे. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी पक्ष