शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

‘स्वाभिमानी’च्या माघारीने चर्चेला ऊत

By admin | Updated: July 21, 2014 00:40 IST

‘दत्त-शिरोळ’ची निवडणूक : सा. रे. पाटील यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा

संदीप बावचे - शिरोळश्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्जच दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारखान्याच्या इतिहासात पहिलीच बिनविरोध निवडणूक होणार असून, प्रमुख व पारंपरिक विरोधक खा. राजू शेट्टी यांनी अचानक या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयामुळे सभासद व शेतकरी वर्गातून उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे, तर कारखान्याचे अध्यक्ष आ. डॉ. सा. रे. पाटील यांनी विरोधकांवर मात करत निवडणूक बिनविरोध करून कारखाना हिताबरोबरच त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चाही रंगली आहे.खा. शेट्टी हे मूळचे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे. त्यांचा राजकीय उदय या कारखान्याच्या विरोधातूनच झाला आहे. २००३ साली दत्त कारखान्याच्या ऊस आंदोलनाच्या धुमश्चक्रीतूनच त्यांची तालुका व जिल्ह्याला ओळख झाली. यानंतरच त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. आंदोलनाला बळकटी येण्यासाठी राजकारणही तितकेच महत्त्वाचे, असे शेतकरी, मतदारांना पटवून देऊन त्यांनी जिल्हा परिषद व्हाया विधानसभामार्गे लोकसभेपर्यंत यशस्वी राजकीय मजल मारली.दत्त कारखाना हा त्यांच्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गळीत हंगामापूर्वीचे ऊस आंदोलन असो, कारखान्याची सर्वसाधारण सभा असो की निवडणूक, खा. शेट्टी यांचा विरोध हा ठरलेलाच. कारखान्याच्या निवडणुकीने अप्रत्यक्षपणे सभासदांवर आर्थिक बोजा पडणार, हे निश्चित असले तरी, तसेच निवडणुकीत यश मिळणार नाही, हे माहीत असतानाही समाजासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत विरोधात राहून कारखाना व्यवस्थापनावर वचक ठेवल्याचे खा. शेट्टी यांनी दाखवून दिले आहे.कारखान्याच्या गतनिवडणुकीत शेट्टी यांच्या पॅनेलला यश मिळाले नसले तरी चांगली झुंज देत भविष्यातील निवडणुकीत आशेचा किरण त्यांनी निकालातून स्पष्ट केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेस, साखरसम्राट व संपूर्ण धनशक्ती विरोधात असतानाही शेट्टी विक्रमी मतांनी लोकसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले. यातून त्यांच्यावर शेतकऱ्यांचा विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास अधिक आहे, हे दिसून येते. अशा वातावरणातच ‘दत्त’ची निवडणूक लागल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते, शेतकरी, सभासदांचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे शेट्टी यांच्या पॅनेलला निवडणूक सोपी जाईल, अशी आशा सभासद, शेतकऱ्यांनी बाळगली असतानाच निवडणूक प्रक्रियेतूनच माघार घेतल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. त्यामुळे या माघारीतून कोणते साटेलोटे झाले आहे का? असा संतप्त सवाल ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व मानणाऱ्या सभासदांतून व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे वयाच्या शंभरीच्या दिशेने वाटचाल करतानाही अत्यंत संयमाने आ. पाटील यांनी विरोधकांना बाजूला सारले व निवडणूक खर्चातून कारखान्याला वाचवीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. या वयातही त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चा अधिक रंगली आहे.