शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

‘स्वाभिमानी’च्या माघारीने चर्चेला ऊत

By admin | Updated: July 21, 2014 00:40 IST

‘दत्त-शिरोळ’ची निवडणूक : सा. रे. पाटील यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा

संदीप बावचे - शिरोळश्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्जच दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारखान्याच्या इतिहासात पहिलीच बिनविरोध निवडणूक होणार असून, प्रमुख व पारंपरिक विरोधक खा. राजू शेट्टी यांनी अचानक या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयामुळे सभासद व शेतकरी वर्गातून उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे, तर कारखान्याचे अध्यक्ष आ. डॉ. सा. रे. पाटील यांनी विरोधकांवर मात करत निवडणूक बिनविरोध करून कारखाना हिताबरोबरच त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चाही रंगली आहे.खा. शेट्टी हे मूळचे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे. त्यांचा राजकीय उदय या कारखान्याच्या विरोधातूनच झाला आहे. २००३ साली दत्त कारखान्याच्या ऊस आंदोलनाच्या धुमश्चक्रीतूनच त्यांची तालुका व जिल्ह्याला ओळख झाली. यानंतरच त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. आंदोलनाला बळकटी येण्यासाठी राजकारणही तितकेच महत्त्वाचे, असे शेतकरी, मतदारांना पटवून देऊन त्यांनी जिल्हा परिषद व्हाया विधानसभामार्गे लोकसभेपर्यंत यशस्वी राजकीय मजल मारली.दत्त कारखाना हा त्यांच्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गळीत हंगामापूर्वीचे ऊस आंदोलन असो, कारखान्याची सर्वसाधारण सभा असो की निवडणूक, खा. शेट्टी यांचा विरोध हा ठरलेलाच. कारखान्याच्या निवडणुकीने अप्रत्यक्षपणे सभासदांवर आर्थिक बोजा पडणार, हे निश्चित असले तरी, तसेच निवडणुकीत यश मिळणार नाही, हे माहीत असतानाही समाजासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत विरोधात राहून कारखाना व्यवस्थापनावर वचक ठेवल्याचे खा. शेट्टी यांनी दाखवून दिले आहे.कारखान्याच्या गतनिवडणुकीत शेट्टी यांच्या पॅनेलला यश मिळाले नसले तरी चांगली झुंज देत भविष्यातील निवडणुकीत आशेचा किरण त्यांनी निकालातून स्पष्ट केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेस, साखरसम्राट व संपूर्ण धनशक्ती विरोधात असतानाही शेट्टी विक्रमी मतांनी लोकसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले. यातून त्यांच्यावर शेतकऱ्यांचा विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास अधिक आहे, हे दिसून येते. अशा वातावरणातच ‘दत्त’ची निवडणूक लागल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते, शेतकरी, सभासदांचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे शेट्टी यांच्या पॅनेलला निवडणूक सोपी जाईल, अशी आशा सभासद, शेतकऱ्यांनी बाळगली असतानाच निवडणूक प्रक्रियेतूनच माघार घेतल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. त्यामुळे या माघारीतून कोणते साटेलोटे झाले आहे का? असा संतप्त सवाल ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व मानणाऱ्या सभासदांतून व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे वयाच्या शंभरीच्या दिशेने वाटचाल करतानाही अत्यंत संयमाने आ. पाटील यांनी विरोधकांना बाजूला सारले व निवडणूक खर्चातून कारखान्याला वाचवीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. या वयातही त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चा अधिक रंगली आहे.