शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संस्थाचालक , प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:13 IST

कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, ...

ठळक मुद्देउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत । संस्थाचालक, प्राचार्यांसमवेत घेतली बैठक

कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, प्राध्यापकांच्या विविध प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे धोरण अवलंबिण्यात येईल. त्यासाठी जनता दरबार भरविला जाईल, त्यामुळे तुमचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल, असे प्रतिपादन राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवारी संस्थाचालक, प्राचार्य संघटनांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थाचालकांकडून महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले.

सामंत म्हणाले, प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. माझ्या खात्याचे प्रश्न हे ‘टेबल टू टेबल’ सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संस्था चालवताना काय अडचणी येतात याची मला माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक गाडा पुढे नेण्याबरोबरच संस्थाचालक आणि प्राचार्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे. त्यासाठी तत्काळ बैठक घेऊन मार्गी लावू.

या बैठकीत भैय्या माने यांनी संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची भूमिका मांडली तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती, सीएचबी प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ बैठक घेण्याची मागणी केली.

प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील म्हणाले, संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर निर्णय होत नसल्याने शैक्षणिक कामकाज करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी पाच वर्षांनी बदलतात. त्यामुळे प्राचार्यही बदलले पाहिजेत. जे चांगले काम करतात त्यांना ठेवा. जे चांगले काम करत नाही त्यांना बदला.नंदकुमार निकम म्हणाले, संस्थाचालक आणि प्राचार्यांचे प्रश्न फार वेगळे नाहीत. काही प्राचार्यांची पेन्शन प्रलंबित आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर चर्चा करून त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी. संयुक्त मिटिंग घेऊन आमची वस्तुस्थिती समजून घ्या.

सुभाष सूर्यवंशी म्हणाले, कायम विनाअनुदानित संस्थेची परिस्थिती खूप बिकट आहे. राज्यात किती महाविद्यालये विनाअनुदानित आहेत त्यांची माहिती शासनाकडून मिळत नाही. किसनराव कुºहाडे यांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह संस्थाचालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकच हशा...शासनाच्या शिक्षण विभागाच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, एका मंदिराच्या आवारात चप्पल बाहेर काढून मंदिरात प्रवेश करण्याचा सूचना फलक लावला होता.एक मनुष्य घरातून चप्पल न घालता दर्शनासाठी आला. त्याला सुरक्षा रक्षकांनी अडविले आणि विचारले, ‘चप्पल कुठे आहे’. तो म्हणाला, ‘माझे चप्पल घरी आहे’ तेव्हा तो सुरक्षा रक्षक म्हणाला, ‘चप्पल घालून या, मगच दर्शन जा,’ असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतkolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ