शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संस्थाचालक , प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:13 IST

कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, ...

ठळक मुद्देउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत । संस्थाचालक, प्राचार्यांसमवेत घेतली बैठक

कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, प्राध्यापकांच्या विविध प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे धोरण अवलंबिण्यात येईल. त्यासाठी जनता दरबार भरविला जाईल, त्यामुळे तुमचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल, असे प्रतिपादन राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवारी संस्थाचालक, प्राचार्य संघटनांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थाचालकांकडून महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले.

सामंत म्हणाले, प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. माझ्या खात्याचे प्रश्न हे ‘टेबल टू टेबल’ सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संस्था चालवताना काय अडचणी येतात याची मला माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक गाडा पुढे नेण्याबरोबरच संस्थाचालक आणि प्राचार्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे. त्यासाठी तत्काळ बैठक घेऊन मार्गी लावू.

या बैठकीत भैय्या माने यांनी संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची भूमिका मांडली तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती, सीएचबी प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ बैठक घेण्याची मागणी केली.

प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील म्हणाले, संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर निर्णय होत नसल्याने शैक्षणिक कामकाज करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी पाच वर्षांनी बदलतात. त्यामुळे प्राचार्यही बदलले पाहिजेत. जे चांगले काम करतात त्यांना ठेवा. जे चांगले काम करत नाही त्यांना बदला.नंदकुमार निकम म्हणाले, संस्थाचालक आणि प्राचार्यांचे प्रश्न फार वेगळे नाहीत. काही प्राचार्यांची पेन्शन प्रलंबित आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर चर्चा करून त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी. संयुक्त मिटिंग घेऊन आमची वस्तुस्थिती समजून घ्या.

सुभाष सूर्यवंशी म्हणाले, कायम विनाअनुदानित संस्थेची परिस्थिती खूप बिकट आहे. राज्यात किती महाविद्यालये विनाअनुदानित आहेत त्यांची माहिती शासनाकडून मिळत नाही. किसनराव कुºहाडे यांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह संस्थाचालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकच हशा...शासनाच्या शिक्षण विभागाच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, एका मंदिराच्या आवारात चप्पल बाहेर काढून मंदिरात प्रवेश करण्याचा सूचना फलक लावला होता.एक मनुष्य घरातून चप्पल न घालता दर्शनासाठी आला. त्याला सुरक्षा रक्षकांनी अडविले आणि विचारले, ‘चप्पल कुठे आहे’. तो म्हणाला, ‘माझे चप्पल घरी आहे’ तेव्हा तो सुरक्षा रक्षक म्हणाला, ‘चप्पल घालून या, मगच दर्शन जा,’ असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतkolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ