शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

थेट पाईपलाईनप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 00:37 IST

सतेज पाटील : देखरेख, पाठपुराव्यासाठी जादा अधिकारी नेमणार; केंद्राने वाटा वाढविल्याने पालिकेवर अतिरिक्त भार

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मनमोहनसिंग सरकारने मंजूर केली. त्यावेळी योजनेच्या एकूण खर्चापैकी १0 टक्के वाटा महापालिकेवर सोपविला होता; परंतु मोदी सरकारने आता तो २0 टक्के केला आहे. त्यामुळे खर्चाचा भार वाढणार असून, तो पालिकेला पेलणार नाही. म्हणून हा १0 टक्क्यांचा अतिरिक्त खर्च राज्य सरकारने सोसावा, अशी मागणी घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच भेटणार आहोत, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा घेतला आणि योजनेचे काम नेमके कोणत्या कारणांनी रेंगाळले आहे, याची माहिती करून घेतली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बाल कल्याण सभापती वृषाली कदम , गट नेते शारंगधर देशमुख यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार व सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. योजना मंजूर झाली त्यावेळी योजनेच्या एकूण खर्चापैकी ८० टक्के रक्कम केंद्र सरकार, १० टक्के रक्कम राज्य सरकार, तर १० टक्के रक्कम महानगरपालिकेने स्वत:च्या फंडातून खर्च करायचे ठरले होते; पण अलीकडे केंद्र सरकारने ६०:२०:२० असा खर्चाचा भार निश्चित केला आहे. केंद्र सरकारने नवीन योजनांसाठी जर असा निर्णय घेतला असेल, तर ठिक आहे; पण जुन्या योजनांच्या खर्चात बदल करण्याची आवश्यकता नाही. जर योजनेच्या २० टक्के रक्कम पालिकेला गुंतवायची झाली, तर ती ९६ कोटींपर्यंत जाणार असून ती परवडणारी नाही. मी पालकमंत्री पाटील यांच्याशी बोललो असून, अतिरिक्त १0 टक्क्यांचा भार राज्य सरकारने सोसावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. आमचेच दुर्लक्ष झाले आपण मोठ्या प्रयत्नातून राजकीय शक्ती पणाला लावून ही ४८५ कोटींची योजना मंजूर करून आणली. राज्यकर्ते म्हणून कर्तव्य पार पाडले. पुढील सर्व जबाबदारी अधिकारी वर्गावर आहे; पण त्यांनी काहीच केले नाही. योजनेकडे आमचेही दुर्लक्ष झाले, अशी कबुली आम. पाटील यांनी दिली. आज सोळांकूरला भेट जलवाहिनी टाकण्यासाठीचे लाईट आऊट देण्याचे काम पूर्ण झाले असून, सोळांकूर येथील प्रश्न सोडविण्यासाठी काही पदाधिकारी, अधिकारी आज, बुधवारी तेथे जाणार आहेत. पदाधिकारी, अधिकारी स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. जादा तज्ज्ञ अधिकारी नेमणार योजनेचे काम दर्जेदार व्हावे, अशीच आमची सर्वांची अपेक्षा आहे; परंतु गेल्या वर्षभरातील आलेला अनुभव वाईट आहे. मनपा प्रशासनाने योजनेच्या पूर्ततेसाठी म्हणावा तितकासा पाठपुरावा केला नाही. काम रेंगाळले आहे. ते कोणत्या टप्प्यांवर रेंगाळले आहे, काय करायला पाहिजे, याची माहिती आयुक्तांनीही कधी आपणाला दिली नाही. त्यामुळे आम्हालाही त्याचा पाठपुरावा करता आला नाही; परंतु कोल्हापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली योजना जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी जादा तज्ज्ञ अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात येतील, असे आमदार पाटील यांनी सांगितले.